शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑवादीत अंतर्गत कलह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:54 IST

महानगरसाठी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीला काही जणांनी ‘गूपचूप’ विरोध केला

चंद्रशेखर जोशीजळगाव : जिल्ह्याच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना आक्रमकपणे तोंड देणारा पक्ष म्हणून तुर्तास राष्टÑवादी कॉँग्रेस या पक्षाकडे बघितले जाते. पक्षात नुकतेच काही बदल होऊन जिल्हाध्यक्ष म्हणून अ‍ॅड. रवींद्र पाटील तर महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून नामदेव चौधरी यांची निवड झाली. निवड झाल्यानंतर महानगर राष्टÑवादी कॉँग्रेसने शहरात संघटन उभे करून सरकार विरोधात काही आंदोलने केली. या आंदोलनांना पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही दाद दिली. मात्र यानंतर महानगरसाठी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीला काही जणांनी ‘गूपचूप’ विरोध केला व संपर्क प्रमुख दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकारिणी स्थगित केली. अंतर्गत कलहातूनच हे प्रकार सुरू असल्याचे आता लक्षात येत आहे.सोनिया गांधींना विरोध करत कॉँग्रेसमधून खासदार शरद पवार यांच्या बरोबर राज्यातील एक मोठा गट बाहेर पडला. जळगाव जिल्ह्यातही मोठी पडझड त्यावेळी झाली. कॉँग्रेसचे म्हणून ओळख असलेल्या बºयाच नेत्यांनी या पक्षाला रामराम करत राष्टÑवादीचे घड्याळ हाताला बांधले. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये या पक्षाने बºयापैकी यश मिळविले. एकेकाळी राजकीय क्षेत्रात दबदबा असलेले अरूणभाई गुजराथींसारखे नेते या पक्षाबरोबर पहिल्यापासून आहेत. यासह भाजपातून दुखावलेली काही मंडळीही या पक्षाबरोबर होती. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाला यश मिळाले. राज्यात सत्ता मिळून पक्षाचे जळगाव ग्रामीण मतदार संघाचे तत्कालीन आमदार गुलाबराव देवकर यांना राज्यमंत्रीपद मिळाले. परिवहन, कृषी राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे होते. यासह जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आली. सत्ता तिकडे वळायचे ही राजकीय क्षेत्रातील अनेकांची भूमिका असते. त्यानुसार सत्ता आल्याने राष्टÑवादी कॉँग्रेसकडे अनेक हौशी मंडळी वळली. पक्षाच्या कार्यालयात पाय ठेवायला जागा नसायची, अशीही परिस्थिती सत्ता होती त्या काळात दिसून येत असे. २०१४ पर्यंच्या निवडणुकीपर्यंत हीच स्थिती होती. त्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या पक्षाला अपयश आले. केवळ पारोळा-एरंडोल विधानसभा निवडणुकीत डॉ. सतीश पाटील हे निवडून आले. त्यानंतर त्यांच्याकडे पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सोपविले. आता येणाºया विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सतीश पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदावर राहण्यास नकार दिला. त्यानंतर पक्षाने जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड. रवींद्र पाटील व महानगर जिल्हाध्यक्षपदी नामदेव चौधरी यांची निवड केली. या दोघांनी पदास साजेशी आंदोलनेही केली. मात्र महानगर कार्यकारिणी जाहीर केल्यावर अंतर्गत कलहाचीच प्रचिती आली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव