शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

कृषिमंत्र्यांशी ‘सरळ लढा’ आवश्यक

By admin | Updated: September 14, 2015 00:46 IST

धुळे : राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करून निर्माण होणारे नवीन विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी कृषिमंत्री एकनाथराव खडसेंशी सरळ लढा द्यावाच लागेल, असा सूर याप्रश्नी झालेल्या बैठकीत उमटला़

धुळे : राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करून निर्माण होणारे नवीन विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी कृषिमंत्री एकनाथराव खडसेंशी सरळ लढा द्यावाच लागेल, असा सूर याप्रश्नी झालेल्या बैठकीत उमटला़ केवळ निवेदने देत राहिलो, तर विद्यापीठाच्या घोषणेनंतर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते, त्यामुळे विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी ग्रामीण भागातील जनता, सर्व समविचारी संघटना व विद्यार्थी संघटनांना सोबत घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या वेळी घेण्यात आला़

नवीन कृषी विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी आंदोलनाच्या रिंगणात उतरलेल्या परिवर्तन महासंघाची बैठक रविवारी मराठा सेवा संघाच्या मालोजीराव भोसले सभागृहात झाली़ या वेळी माजी आमदार प्रा़शरद पाटील, जयहिंद संस्थेचे संचालक अॅड़ आय़जी़ पाटील, अंधश्रद्धा निमरूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, सत्यजित सिसोदे, मराठा सेवा संघाचे डॉ़ संजय पाटील, साहेबराव देसाई, मूलनिवासी संघाचे राहुल वाघ, चंद्रवीर सावळे, अनिल पाटील, डॉ़सुदाम राठोड, ज्येष्ठ नागरिक संघाचे व्ही़ज़े पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होत़े

कृषी विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी केवळ निवेदन देऊन चालणार नाही, तर संघर्ष करावा लागेल़ जर वेळीच योग्य व कठोर भुमिका घेतली नाही, तर उमविप्रमाणेच कृषी विद्यापीठही पळविले जाऊ शकत़े त्यामुळे तालुका स्तरावर बैठका, ग्रामीण भागातील जनता, शेतकरीवर्ग, विद्यार्थी संघटना यांना या आंदोलनाशी जोडण्यासाठी प्रयत्न केला जाणार आह़े या वेळी माजी आमदार शरद पाटील म्हणाले की, खडसे यांनी विद्यापीठाला चार हजार हेक्टर जमीन लागते असे सांगून जिल्ह्यातील नागरिकांची दिशाभूल केली आह़े कृषी क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या माहितीनुसार एक हजार एकर क्षेत्रात विद्यापीठ होऊ शकत़े बैठकीत अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून या आंदोलनास बळ देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केल़े