शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

डिप्लोमा अंतिम वर्षाचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:22 IST

जळगाव : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत नुकताच उन्हाळी परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील अंतिम ...

जळगाव : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत नुकताच उन्हाळी परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची उन्हाळी परीक्षा जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात आली होती. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होऊन ती सुरळीत पार पडली होती. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रथम श्रेणी प्राप्त करून उत्तीर्ण होणाऱ्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ ९५ टक्के आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ़ पराग पाटील, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

असा आहे निकाल

यंत्र अभियांत्रिकी विभागात रितेश पाटील हा ९६.२६ टक्के मिळवून पहिला आला आहे. द्वितीय नीरज झोपे (९६.०५ टक्के), तृतीय वैभवी चंदनकर (९५.७९ टक्के) ठरली आहे. अंतिम वर्ष (द्वितीय पाळी) - गौरव जैन (९५.१५ टक्के), समीर शाह (९४.६७ टक्के), मोहित राणे ९४. १० टक्के मिळवून उत्तीर्ण झाला आहे. तसेच स्थापत्य अभियांत्रिकी विभागात (पहिली पाळी) प्रथम - उमेश विश्वासराव बोरसे (९७.३७ टक्के), द्वितीय मिताली टोके (९७.२६ टक्के), तृतीय रोहित भामरे (९७.२१ तृतीय), अंतिम वर्ष द्वितीय पाळीमध्ये प्रथम - समृद्धी बावसकर (९५.७९ टक्के), द्वितीय तेजस्विनी मोरे (९५.४२ टक्के), तृतीय जानव्ही पाटील (९५.३२ टक्के) ठरली आहे. संगणक अभियांत्रिकी विभागात प्रथम आदित्य बोधनकर (९५.८३ टक्के), द्वितीय अजिंक्य महाजन (९५. ६० टक्के), तृतीय शिवानी महाजन (९५. ३३ टक्के) ठरली आहे़ अणुविद्युत अभियांत्रिकी विभागातील मंदार पाटील (९५.३४ टक्के), प्रथमेश सराफ (९५.१२ टक्के), महेश खडसे (९५ टक्के), विद्युत अभियांत्रिकी विभागातील गणेश पाटील (९७.३३ टक्के), प्रियदर्शिनी असमार (९७.२२ टक्के), प्रथमेश अत्रे (९६.२८ टक्के), माहिती व तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागातील साक्षी तिवारी (९३. ९४ टक्के), आर्यन पाटील (९४. ३१ टक्के), परेश अपराज (९३. ५० टक्के) तसेच फार्मसी विभागातील रूपाली काळे (९६.८० टक्के), निर्मला वराडे (९६.७०टक्के) तर दीपक मधुकर चौधरी (९६.५० टक्के) मिळवून उत्तीर्ण झाला आहे.