शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

विजेच्या लंपडावाने आनंदावर विरजण

By admin | Updated: September 21, 2015 00:51 IST

विजेच्या लंपडावाने आनंदावर विरजण ऐन आरतीच्यावेळी वीजपुरवठा खंडित : रविवारच्या सुट्टीमुळे आरास पाहण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

जळगाव : गणेशोत्सवाच्या काळात शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा, असे स्पष्ट आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिले आहेत, असे असताना गेल्या तीन दिवसांपासून शहरात सायंकाळी ऐन आरतीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने गणेश मंडळाचे कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत. याबाबत महावितरणकडे तक्रार करुनही दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, रविवारच्या सुटीमुळे आज आरास पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.

ऐन गर्दीच्यावेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने चेंगराचेंगरी होण्याची भीती असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तत्पूर्वीच जिल्हाधिका:यांची दखल घ्यावी अशी मागणी मंडळांनी केली आहे.

नवीपेठेत पाच तास वीज गुल

गणेशोत्सव सुरू असताना रात्रीच्या वेळी फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर शहरातील जुने जळगाव, सराफ बाजार, दाणा बाजार, महाबळ कॉलनी, त्र्यंबक नगर, शिव कॉलनी व गणेश कॉलनीच्या काही भागात गेल्या तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. रविवारीही सकाळी साडेनऊ ते दुपारी अडीचर्पयत नवीपेठ भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने मंडळाच्या कार्यकत्र्यानी तीव्र संताप व्यक्त केला.

सोमवारी महावितरणवर धडक

जिल्हापेठ भागात शनिवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने मंडळाच्या कार्यकत्र्यानी महावितरण कार्यालयात तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतरही रविवारी विजेचा लपंडाव सुरुच होता. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी सोमवारी सकाळी 11 वाजता महावितरणच्या अधिका:यांची औद्योगिक वसाहत कार्यालयात भेट घेऊन व्यथा मांडणार आहेत.

आरास पाहण्यासाठी गर्दी

विविध गणेश मंडळाच्या कार्यकत्र्यानी नवीपेठ, जिल्हापेठ व रेल्वे स्टेशन रोडवर अमरनाथ, शिर्डीचे साईबाबा, वैष्णवी देवी, आयोध्यातील श्रीराम मंदिरचा देखावा साकारला आहे. तो पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. बुधवार, गुरुवार व शुक्रवारी पाऊस असल्याने भाविकांचा हिरमोड झाला होता.

सायंकाळी सहा वाजेपासून गर्दी

रविवारी सुट्टीचे औचित्य साधत सायंकाळी सहा वाजेपासूनच भाविकांची आरास पाहण्यासाठी नवी पेठ, नेहरू चौक, मित्र मंडळ, बळीराम पेठ, शनी पेठ, बालजी पेठ व गणेश कॉलनी भागात गर्दी केली होती. ती रात्री 11 वाजेर्पयत कायम होती.

गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर नवी पेठ परिसर व गोलाणी मार्केटच्या परिसरात विक्रेत्यांनी विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी दुकाने थाटलेली होती. आरास पाहिल्यानंतर भाविक दुकानांवरील वस्तू खरेदी करीत होते. तसेच प्रत्येक गणेश मंडळाजवळ छोटे पाळणे लावण्यात आल्यामुळे बच्चे कंपनीने पाळण्यात बसून मनमुराद आनंद लुटला.

टॉवर चौक, नेहरू चौक तसेच छत्रपती शिवाजी पुतळा, विसनजी नगर या भागात वाहतुकीची कोंडी होऊ नये, म्हणून सायंकाळी सहा वाजेनंतर नागरिकांना वाहने आणण्यास वाहतूक पोलीस नकार देत होते. प्रत्येक चौकात बॅरीकेट्स लावण्यात आले आहेत.