शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे मित्र मादुरोंना तातडीने सोडा, अन्यथा..."; अमेरिका-व्हेनेझुएला संघर्षात किम जोंग उनची एन्ट्री
2
उद्धवसेनेच्या उमेदवारास 'मशाल' चिन्ह नाकारले; निवडणूक अधिकारी- दानवे समोरासमोर
3
ऑपरेशन सिंदूरचा धसका, ब्रह्मोसला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून 'तैमूर' मिसाईलची चाचणी
4
"अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे वर्तन गुंड, मवाल्यासारखे..."; Viral Video वरून काँग्रेसची टीका
5
Hyderabad: मुलांसोबत तलावाजवळ गेली अन्...; आईचं भयानक कृत्य, नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली!
6
हलगर्जीपणाचा कळस! दीडवर्ष असह्य वेदना; ऑपरेशन करताना पोटात विसरले कात्री, महिलेचा मृत्यू
7
Smartphone: थेट ब्लॅकबेरी आणि आयफोनशी स्पर्धा? धमाकेदार अँड्राईड फोन बाजारात, कुणी केला लॉन्च?
8
पालघरजवळच्या खाडीत सहा-सात बगळे मृत अन् अर्धमेल्या अवस्थेत! संसर्ग की घातपात, चर्चांना उधाण
9
Donald Trump : "आमच्या कंपन्यांना बाहेर काढलं..."; व्हेनेझुएला एअर स्ट्राईकनंतर ट्रम्प यांचा जुना Video व्हायरल
10
IND vs NZ ODI: भारताचा संघ जाहीर; अय्यर IN; ऋतुराज, तिलक OUT, बुमराह-पांड्याला विश्रांती
11
"ते तर आता 'लीडर ऑफ पर्यटन'"; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर भाजपाची बोचरी टीका
12
टीम इंडियासाठी 'गुड न्यूज'! Shreyas Iyerला 'कमबॅक'साठी BCCIची मान्यता, 'या' तारखेला खेळणार
13
बांगलादेशात हिंदूंचं जगणं कठीण! एकाला खांबाला बांधून अमानुष मारहाण, प्रकृती चिंतानजक
14
Tarot Card: स्वामींचं नाव घेत एक कार्ड निवडा आणि पुढच्या आठवड्याचे साप्ताहिक भविष्य जाणून घ्या
15
हिवाळ्यात नारळ पाणी प्यावं की नाही? लोक हमखास करतात चूक, विसरु नका ‘ही’ योग्य वेळ
16
सोलापूर: निवडणुका बिनविरोध करण्यासाठीच 'तो' मर्डर! प्रणिती शिंदेंचा भाजपावर गंभीर आरोप
17
अभिनेते आशिष विद्यार्थी यांचा अपघात, भरधाव दुचाकीस्वाराने दिली धडक; पत्नीही जखमी
18
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या मुली असतात निसर्गतः देखण्या आणि आकर्षक
19
Nashik: शिंदेसेनेतील अंतर्गत वाद उफळला, उमेदवाराचा पत्नीसह आत्महत्येचा इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
सोन्यामध्ये ₹१९९९ ची घसरण, चांदीही चमकही झाली कमी; पाहा कशी होती आठवड्याची सराफा बाजाराची स्थिती
Daily Top 2Weekly Top 5

देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 19:06 IST

भारताने संविधान स्वीकारले मात्र देशात आजही जाती, धर्माच्या भिंती कायम आहेत. संविधान जाळण्यापर्यंत काही शक्तींची मजल गेली असून देश हुकूमशाहीकडे वाटचाल करीत असल्याचा आरोप प्रसिद्ध लोकशाहीर, संगितकार संभाजी भगत यांनी केला. 

ठळक मुद्देलोकशाहीर संभाजी भगतसंगिताच्या माध्यमातून जनतेपर्यंत संविधान पोहचविण्याचा प्रयत्नलोकमत मुलाखत

विकास पाटीलजळगाव : भारताने संविधान स्वीकारले मात्र देशात आजही जाती, धर्माच्या भिंती कायम आहेत. संविधान जाळण्यापर्यंत काही शक्तींची मजल गेली असून देश हुकूमशाहीकडे वाटचाल करीत असल्याचा आरोप प्रसिद्ध लोकशाहीर, संगितकार संभाजी भगत यांनी केला. लेवा एज्युकेशन युनियनच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेसाठी ते जळगावात आले असता ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.  

भारतीय नागरिक म्हणून ओळख आजही पूसट ते म्हणाले, देश स्वतंत्र झाला. भारताने संविधान स्वीकारले. मात्र हे संविधान जनतेपर्यंत पोहचू नये यासाठी काही शक्ती प्रयत्न करीत आहेत. त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मी संगिताच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झाली तरी जाती-पातीच्या भिंती कायम आहेत. त्या गळून पडणे आवश्यक होते व भारतीय नागरिक म्हणून आपली ओळख निर्माण झाली पाहिजे होती. मात्र आपले दुदैव. भारतीय नागरिक म्हणून ओळख आजही पूसट आहे. हे अत्यंत भयावह व हादरुन टाकणारे वास्तव आहे. 

धर्मराष्टÑ झाल्यास देशाचे तुकडे होतीलसंभाजी भगत म्हणाले, या देशात काही संविधान विरोधी शक्ती कार्यरत असून संविधान जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. काळाच्या पडद्याआड गेलेल्या काही गोष्टी समोर आणून वातावरण दूषित करण्याचे काम येथे सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचा पाया मजबूत करण्यासाठी खूप प्रयत्न केले. हा पाया उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थान काही देशविघातक शक्तींकडून सुरु आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्यास हे राष्टÑ धर्मराष्टÑ होईल व नंतर ते फुटेल आणि देशाचे मोठे नुकसान होईल.जनतेपर्यंत संविधान पोहचविण्याचा प्रयत्न आपल्या देशात विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने वास्तव्य करीत आहेत. मात्र हे लोक एकत्र राहू नये देशात दूही निर्माण  व्हावी यासाठी काही मंडळींकडून प्रयत्न केले जात आहेत. पाकिस्तानची जी अवस्था आहे, तशीच आपल्या देशाचीही व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. मात्र त्यांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी मी संगिताच्या माध्यमातून एक राष्टÑभक्त म्हणून काम हाती घेतले आहे.  जनतेपर्यंत संविधान पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. संगिताच्या माध्यमातून लवकर जनतेपर्यंत पोहचता येत आहे. नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संभाजी भगत म्हणाले.