शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 19:06 IST

भारताने संविधान स्वीकारले मात्र देशात आजही जाती, धर्माच्या भिंती कायम आहेत. संविधान जाळण्यापर्यंत काही शक्तींची मजल गेली असून देश हुकूमशाहीकडे वाटचाल करीत असल्याचा आरोप प्रसिद्ध लोकशाहीर, संगितकार संभाजी भगत यांनी केला. 

ठळक मुद्देलोकशाहीर संभाजी भगतसंगिताच्या माध्यमातून जनतेपर्यंत संविधान पोहचविण्याचा प्रयत्नलोकमत मुलाखत

विकास पाटीलजळगाव : भारताने संविधान स्वीकारले मात्र देशात आजही जाती, धर्माच्या भिंती कायम आहेत. संविधान जाळण्यापर्यंत काही शक्तींची मजल गेली असून देश हुकूमशाहीकडे वाटचाल करीत असल्याचा आरोप प्रसिद्ध लोकशाहीर, संगितकार संभाजी भगत यांनी केला. लेवा एज्युकेशन युनियनच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेसाठी ते जळगावात आले असता ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.  

भारतीय नागरिक म्हणून ओळख आजही पूसट ते म्हणाले, देश स्वतंत्र झाला. भारताने संविधान स्वीकारले. मात्र हे संविधान जनतेपर्यंत पोहचू नये यासाठी काही शक्ती प्रयत्न करीत आहेत. त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मी संगिताच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झाली तरी जाती-पातीच्या भिंती कायम आहेत. त्या गळून पडणे आवश्यक होते व भारतीय नागरिक म्हणून आपली ओळख निर्माण झाली पाहिजे होती. मात्र आपले दुदैव. भारतीय नागरिक म्हणून ओळख आजही पूसट आहे. हे अत्यंत भयावह व हादरुन टाकणारे वास्तव आहे. 

धर्मराष्टÑ झाल्यास देशाचे तुकडे होतीलसंभाजी भगत म्हणाले, या देशात काही संविधान विरोधी शक्ती कार्यरत असून संविधान जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. काळाच्या पडद्याआड गेलेल्या काही गोष्टी समोर आणून वातावरण दूषित करण्याचे काम येथे सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचा पाया मजबूत करण्यासाठी खूप प्रयत्न केले. हा पाया उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थान काही देशविघातक शक्तींकडून सुरु आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्यास हे राष्टÑ धर्मराष्टÑ होईल व नंतर ते फुटेल आणि देशाचे मोठे नुकसान होईल.जनतेपर्यंत संविधान पोहचविण्याचा प्रयत्न आपल्या देशात विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने वास्तव्य करीत आहेत. मात्र हे लोक एकत्र राहू नये देशात दूही निर्माण  व्हावी यासाठी काही मंडळींकडून प्रयत्न केले जात आहेत. पाकिस्तानची जी अवस्था आहे, तशीच आपल्या देशाचीही व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. मात्र त्यांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी मी संगिताच्या माध्यमातून एक राष्टÑभक्त म्हणून काम हाती घेतले आहे.  जनतेपर्यंत संविधान पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. संगिताच्या माध्यमातून लवकर जनतेपर्यंत पोहचता येत आहे. नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संभाजी भगत म्हणाले.