शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
4
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
5
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
6
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
7
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
8
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
9
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
10
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
11
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
12
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
13
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
14
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
15
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
16
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
17
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
18
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
19
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
20
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल

७५ दिवस मनपाच्या घंटागाड्या पडणार धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:33 AM

नवीन घंटागाड्यांच्या वापरासाठी ठेक्याची गरजच काय ?

ठळक मुद्दे दैनंदिन वापर करण्याची आवश्यकता

जळगाव : महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ३२ कोटी रुपयांच्या डीपीआरमधून मनपाने ७ कोटी रुपयांमध्ये ८५ घंटागाड्या घेतल्या असून, सर्व गाड्या या मनपाच्या आवारात काही दिवसांपासून पडून आहेत. तसेच आचारसंहितेचा बहाण्याने या गाड्या आता तब्बल ७५ दिवस मनपाच्या आवारात धुळखात पडणार आहेत.शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची समस्या ही आचारसंहिता आहे किंवा नाही ? यावर अवलंबून नाही. त्यामुळे मनपाला या नव्या घंटागाड्याचा वापर करण्यासाठी आचारसंहिता संपण्याची वाट का पहावी लागत आहे ? असा प्रश्न नगारिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरात खासगी मक्तेदार व मनपा प्रशासनाकडून कचरा संकलनाचे काम सुरु आहे. त्यामुळे नव्याने प्राप्त झालेल्या घंटागाड्याचा वापरासाठी मनपाला मुहूर्त काढण्याची गरजच काय आहे ? ७५ दिवस या गाड्या मनपाच्या आवारात धुळखात ठेवण्यापेक्षा त्या गाड्यांचा वापर दैनंदिन कचरा संकलनासाठी करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.एकमुस्त सफाईच्या ठेक्याला अजून लागतील तीन महिेनेसंपूर्ण शहरासाठी एकच ठेका दिला जाणार असून, यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र, यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे निविदा अंतीम होवू शकलेली नाही. तसेच हा ठेका दिल्यानंतरच या वाहनांचा वापर केला जाणार असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी दिली. मात्र, या ठेक्याची प्रक्रियेला आचारसंहितेनंतरच सुरुवात होईल यासाठी जवळपास तीन महिन्यांचा काळ जाणार आहे. दरम्यान, ८५ घंटागाड्याचा वापर एकमुस्त ठेका दिल्यानंतरच होणार असेल तर मोबाईल टॉयलेट, जेसीबीचा वापर का केला जात नाही ? हे देखील सुटणारे कोडं आहे. मनपा प्रशासनाच्या आवारात लावण्यात आलेल्या जेसीबी व मोबाईल टॉयलेटचा वापर तरी मनपाने करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.आधीच ७ महिने उशिराने राबविली खरेदीची प्रक्रियामनपा प्रशासनाला मार्च २०१८ मध्येच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी ३२ कोटी रुपयांचा डिपीआर मंजूर होवून, एप्रिल २०१८ मध्ये ९ कोटी रुपयांचा निधी मनपा प्रशासनाला प्राप्त देखील झाला होता. मात्र, मनपा प्रशासनाकडून वाहन खरेदीसाठी किंवा डिपीआरची अंमलबजावणीसाठी कोणतीही प्रक्रिया राबविण्यात आली नाही. जी प्रक्रिया मनपाच्या वाहन विभागाने करायला हवी होती. ती प्रक्रिया मनपा आरोग्य विभागाकडून राबविण्यात आली. तब्बल सात महिन्यानंतर वाहन खरेदीचा प्रस्ताव जीईएम पोर्टलवर करण्यात आला. त्यानंतर ही वाहने मनपाला प्रस्ताव पाठविल्यानंतर दोन महिन्यांचा अवधीनंतर दोन टप्प्यात प्राप्त झाली असून, त्याचा देखील वापर होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.आचारसंहिता लागणार हे माहित असतानाही उशिर का ?मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागणार होती. हे जगजाहीर होते. त्यामुळे मनपा प्रशासनाने त्याआधीच वाहन खरेदीचा प्रस्ताव पाठविण्याचे नियोजन करणे गरजेचे होते. आता वाहने प्राप्त झाल्यानंतर घंटागाड्यांचा वापरासाठी आचारसंहितेचा खोडा आणला जात आहे. त्यामुळे या घंटागाड्या खरेदी करण्यासाठी मुद्दामहून आचारसंहितेची वाट पाहण्यात आली का ? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. तसेच सर्व वाहने मनपाच्या पार्किंगमध्ये ठेवण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत या वाहनांच्या सुरक्षेविषयी देखील प्रश्न उपस्थित होतो. हे वाहने अडथळीचेही ठरु लागले आहेत.