शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

देवकाआई ठरली खरीखुरी प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 12:11 IST

धुळ्याच्या धुळीत माखलेल्या शाळा क्रमांक नऊमध्ये १९६५ च्या काळात एक शिक्षक ज्यांच्या नावातच धार्मिक सलोखा होता, ते शब्बीर मियाँ देशपांडे आम्हाला गाणे शिकवित. ‘हमे गांधी क्षमा करना, हमे गौतम क्षमा करना... आज हमने अहिंसा को, धीर तलवार दे दी है ।या देशपांडे सरांनी, माझ्या जोरदार, दमदार माझ्यापुरताच मर्यादित असलला आवाज ...

धुळ्याच्या धुळीत माखलेल्या शाळा क्रमांक नऊमध्ये १९६५ च्या काळात एक शिक्षक ज्यांच्या नावातच धार्मिक सलोखा होता, ते शब्बीर मियाँ देशपांडे आम्हाला गाणे शिकवित. ‘हमे गांधी क्षमा करना, हमे गौतम क्षमा करना... आज हमने अहिंसा को, धीर तलवार दे दी है ।या देशपांडे सरांनी, माझ्या जोरदार, दमदार माझ्यापुरताच मर्यादित असलला आवाज ऐकून म्हटले. ‘जगदीश तू देशभक्तीपर गाणे लिही.’ मी पाचव्या गल्लीच्या धाब्याच्या मातीच्या घरावर गेलो आणि गाणे लिहिले.‘देशासाठी करू बलिदान, या भारताचे आम्ही नौजवान’. मी तेव्हा माझ्या शाळेपुरता कवी झालो... धुळ्याचे जिल्हाधिकारी शशिकांत दैठणकर होते. ‘त्या वेळी जि.प. सभागृहात’ ‘काळ चालला पुढे’ हे विधान दिले आणि कविता करायला सांगितली. मी गुरुवर्य नागेश मोगलाईकरांच्या ओट्यावर बसलो आणि ‘कोण म्हणतं, काळ चालला पुढे?’ ही कविता लिहिली. तेव्हापासून ‘मी गावाचा कवी झालो’. भुसावळला वीज मंडळात नोकरीला लागलो. अमळनेरचे वा.रा.तात्या सोनार यांच्या घरात बसून दिवाळीच्या दिवशी एक कविता लिहिली.भैया उपासनी यांनी जळगाव आकाशवाणीच्या उगवतीचे रंग या कार्यक्रमाची सुरुवात केली. तेव्हा मी खान्देशचा कवी म्हणून परिचित झालो. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात नाशिक येथे प्रथमच अहिराणीत कथाकथन सादर करण्याचा मान मला देशपातळीवर मिळाला. हे मी फक्त कॉमर्सचा विद्यार्थी असून, माझी पातळी ओळखून केलेला माझा लेखन प्रवास आहे आणि लहानपणी मी रडताना माझी आई देवकाबाई अहिराणीत अंगाईगीत म्हणायची, ‘येवं येवं गाई, भाऊ मना निजी जाई’ म्हणणारी माझी देवकाआई माझ्या लेखनाची खरीखुरी प्रेरणा आहे.- जगदीश देवपूरकर

टॅग्स :Jalgaonजळगाव