शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

योग्य भाव मिळाल्यावरच जमिनी देण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:10 IST

जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याचे काम सुरु आहे. मात्र, भूसंपादनापोटी रेल्वेतर्फे दिला जाणारा मोबदला ...

जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याचे काम सुरु आहे. मात्र, भूसंपादनापोटी रेल्वेतर्फे दिला जाणारा मोबदला अत्यंत कमी असल्यामुळे योग्य भाव मिळाल्यानंतरच रेल्वेला जमिनी देण्यावर जळगाव व पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी रेल्वे अधिकाºयांची जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.भुसावळ ते मनमाड दरम्यान या तिसºया रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे सुरुवातीला भुसावळ ते जळगाव दरम्यानचे काम करण्यात आले. हे काम पूर्णत्वास आल्यानंतर रेल्वेतर्फे गेल्यावर्षी मे महिन्यापासून जळगाव ते मनमाड दरम्यानच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या १६० किलो मीटरच्या मार्गावर तिसरी रेल्वे मार्ग उभारण्यासाठी रेल्वेला अनेक शेतकºयांच्या जमिनी भूसंपादन कराव्या लागणार आहेत. यासाठी गेल्या वर्षभरापासून भूसंपादनाची प्रक्रियादेखील सुरु आहे. मात्र, जळगाव तालुक्यासह पाचोरा व चाळीसगाव तालुक्यातील शेतकºयांनी जमिनीला योग्य भाव मिळाल्यावरंच जमिनी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे तिसºया रेल्वे मार्गाच्या कामाला दिवसेंदिवस विलंब होत आहे. भूसंपादना पोटी रेल्वेकडून योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे, अनेक ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया रखडली आहे. शेतकºयांंच्या मागण्या संदर्भात प्रातांधिकाºयांमार्फत शेतकºयांची चर्चा करण्यात आली. मात्र, यातुन शेतकºयांच्या हिताचा कुठलाही समाधानकारक तोडगा निघालेला नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनातर्फे सध्या रेल्वेच्या हद्दीतच तिसºया रेल्वे मार्गाचे काम सुरु आहे. यातील जळगाव ते शिरसोली दरम्यान बहुतांश काम पूर्ण झाले आहे.तोडगा काढण्यासाठी उद्या जिल्हाधिकाºयांसोबत बैठकजमिनींचे भूसंपादन न झाल्यामुळे तिसºया रेल्वे मार्गाच्या पुढील कामाला विलंब होत आहे. या मार्गाचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास, रेल्वे मंत्रालयाकडून मंजुर झालेला निधी परत जाण्याची शक्यता आहे. भूसंपादनाबाबत तोडगा काढण्या संदर्भात गुरुवारी रेल्वे अधिकाºयांची जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव