शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
3
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
4
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
5
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
6
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
7
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
8
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
9
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
10
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
11
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
12
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
13
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
14
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
16
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
17
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
18
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
19
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
20
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?

भाव असूनही ज्वारी खरेदी १३ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 19:14 IST

महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येणाऱ्या शासकीय भरड धान्य खरेदीवर अति पाऊस व कमी हमी भावाचे यंदा प्रचंड परिणाम झाला आहे.

ठळक मुद्देभाव नसल्याने मका, बाजरी शून्यावरशासकीय खरेदीवर अति पाऊस व कमी हमीभावाचे परिणाम

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येणाऱ्या शासकीय भरड धान्य खरेदीवर अति पाऊस व कमी हमी भावाचे यंदा प्रचंड परिणाम झाला असून ३१ डिसेंबर या अंतिम मुदतीअखेर तालुक्यात मका व बाजरी खरेदी शून्य टक्के झाली असून, ज्वारीचे प्रमाण फक्त १३ टक्के आहे.यंदा अति पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकावर दुष्परिणाम झाला होता. शेतातच कणसांवर कोंब फुटल्याने ज्वारी, मका, बाजरी यांचे उत्पन्न घटले होते. मोजक्या शेतकºयांना थोड्या फार प्रमाणात उत्पन्न आले. त्यात शासनाची भरड धान्य खरेदी आॅनलाईन असल्याने अडचणी आल्या. शासन फक्त एफएक्यू माल खरेदी करत असल्याने आणि हमीभावदेखील कमी जाहीर केल्याने शेतकºयांनी खुल्या बाजारात माल विकणे सोयीस्कर ठरवले. बाजरीला बाहेर बाजारात २५०० रुपये भाव मिळत होता आणि विशेष म्हणजे मालाची आर्द्रता मोजली जात नव्हती. तेच शासकीय खरेदीत फक्त १९०० रुपये प्रति क्विंटल जाहीर झाला. त्यात चाळणी आणि आर्द्रता मोजली जात असल्याने एकही शेतकºयाने आपला माल शेतकी संघामार्फत होणाºया खरेदीकडे आणला नाही. ज्वारीला शासनाने २५५० रुपये हमीभाव दिला. मात्र आर्द्रता आणि गुणवत्तेमुळे फक्त ८७ शेतकºयांनी ८२६ क्विंटल माल विकला. गेल्या वर्षी ३७५ शेतकºयांनी ६ हजार १८ क्विंटल माल विकला होता ज्वारी काळी पडल्याने शेतकºयांना जादा भाव असूनही आपला माल खुल्या बाजारात फक्त १४०० ते १८०० रुपये प्रति क्विंटल या भावाने विकावा लागला.मात्र मक्याबाबत उलट परिस्थिती झाली. मक्याला बाजारात १८०० ते २००० भाव व्यापारी देत होते आणि शासनाचा हमीभाव १७६० रुपये प्रति क्विंटल जाहीर झाला होता. त्यात मालाची गुणवत्ता ग्रेडरकडून तपासली जात असल्याने मक्याची शासकीय खरेदीदेखील शून्य टक्के झाली. गेल्या वर्षी १० शेतकºयांचा २०० क्विंटल मका खरेदी करण्यात आला होता.यंदा फक्त ११० शेतकºयांनी ज्वारी खरेदीसाठी नोंदणी केली. पैकी फक्त ८७ शेतकºयांची खरेदी झाली तर मक्यासाठी फक्त १५ शेतकºयांनी नोंदणी केली. मात्रही एकही खरेदी झाली नाही. बाजरीची नोंदी झाली नाही.-संजय पाटील, व्यवस्थापक, शेतकी संघ, अमळनेरखरेदी केलेल्या धान्याबाबत शासन धोरण ठरवते. खरेदी केलेला माल कोणत्या राज्यात पाठवायचा की स्थानिक रेशनमध्ये वाटायचा, अद्याप धोरण ठरलेले नाही. शासनाच्या आदेशानुसार अंमलबाजवणी केली जाईल.-मिलिंद वाघ, तहसीलदार, अमळनेर

टॅग्स :TahasildarतहसीलदारAmalnerअमळनेर