शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

भाव असूनही ज्वारी खरेदी १३ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 19:14 IST

महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येणाऱ्या शासकीय भरड धान्य खरेदीवर अति पाऊस व कमी हमी भावाचे यंदा प्रचंड परिणाम झाला आहे.

ठळक मुद्देभाव नसल्याने मका, बाजरी शून्यावरशासकीय खरेदीवर अति पाऊस व कमी हमीभावाचे परिणाम

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येणाऱ्या शासकीय भरड धान्य खरेदीवर अति पाऊस व कमी हमी भावाचे यंदा प्रचंड परिणाम झाला असून ३१ डिसेंबर या अंतिम मुदतीअखेर तालुक्यात मका व बाजरी खरेदी शून्य टक्के झाली असून, ज्वारीचे प्रमाण फक्त १३ टक्के आहे.यंदा अति पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकावर दुष्परिणाम झाला होता. शेतातच कणसांवर कोंब फुटल्याने ज्वारी, मका, बाजरी यांचे उत्पन्न घटले होते. मोजक्या शेतकºयांना थोड्या फार प्रमाणात उत्पन्न आले. त्यात शासनाची भरड धान्य खरेदी आॅनलाईन असल्याने अडचणी आल्या. शासन फक्त एफएक्यू माल खरेदी करत असल्याने आणि हमीभावदेखील कमी जाहीर केल्याने शेतकºयांनी खुल्या बाजारात माल विकणे सोयीस्कर ठरवले. बाजरीला बाहेर बाजारात २५०० रुपये भाव मिळत होता आणि विशेष म्हणजे मालाची आर्द्रता मोजली जात नव्हती. तेच शासकीय खरेदीत फक्त १९०० रुपये प्रति क्विंटल जाहीर झाला. त्यात चाळणी आणि आर्द्रता मोजली जात असल्याने एकही शेतकºयाने आपला माल शेतकी संघामार्फत होणाºया खरेदीकडे आणला नाही. ज्वारीला शासनाने २५५० रुपये हमीभाव दिला. मात्र आर्द्रता आणि गुणवत्तेमुळे फक्त ८७ शेतकºयांनी ८२६ क्विंटल माल विकला. गेल्या वर्षी ३७५ शेतकºयांनी ६ हजार १८ क्विंटल माल विकला होता ज्वारी काळी पडल्याने शेतकºयांना जादा भाव असूनही आपला माल खुल्या बाजारात फक्त १४०० ते १८०० रुपये प्रति क्विंटल या भावाने विकावा लागला.मात्र मक्याबाबत उलट परिस्थिती झाली. मक्याला बाजारात १८०० ते २००० भाव व्यापारी देत होते आणि शासनाचा हमीभाव १७६० रुपये प्रति क्विंटल जाहीर झाला होता. त्यात मालाची गुणवत्ता ग्रेडरकडून तपासली जात असल्याने मक्याची शासकीय खरेदीदेखील शून्य टक्के झाली. गेल्या वर्षी १० शेतकºयांचा २०० क्विंटल मका खरेदी करण्यात आला होता.यंदा फक्त ११० शेतकºयांनी ज्वारी खरेदीसाठी नोंदणी केली. पैकी फक्त ८७ शेतकºयांची खरेदी झाली तर मक्यासाठी फक्त १५ शेतकºयांनी नोंदणी केली. मात्रही एकही खरेदी झाली नाही. बाजरीची नोंदी झाली नाही.-संजय पाटील, व्यवस्थापक, शेतकी संघ, अमळनेरखरेदी केलेल्या धान्याबाबत शासन धोरण ठरवते. खरेदी केलेला माल कोणत्या राज्यात पाठवायचा की स्थानिक रेशनमध्ये वाटायचा, अद्याप धोरण ठरलेले नाही. शासनाच्या आदेशानुसार अंमलबाजवणी केली जाईल.-मिलिंद वाघ, तहसीलदार, अमळनेर

टॅग्स :TahasildarतहसीलदारAmalnerअमळनेर