शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशाभिमान जपण्याची नितांत गरज : कर्नल अरविंद जोगळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:18 IST

इस्त्राईल आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून ७० वर्ष झाली. मात्र इस्राईलने झपाट्याने प्रगती केली, कारण त्या देशातील लहान मुलालादेखील स्वातंत्र्यासाठी मोजलेली किंमत माहीत असल्याचे सेवानिवृत्त सेनाधिकारी कर्नल अरविंद जोगळेकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देअमळनेर येथील शारदीय व्याख्यानमालेत गुंफले पहिले पुष्पमराठी वाङ्मय मंडळातर्फे व्याख्यानमालेचे आयोजनदेशविदेशात दिली ३०० पेक्षा जास्त व्याख्याने

महेंद्र रामोशे।अमळनेर : इस्त्राईल आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून ७० वर्ष झाली. मात्र इस्राईलने झपाट्याने प्रगती केली, कारण त्या देशातील लहान मुलालादेखील स्वातंत्र्यासाठी मोजलेली किंमत माहीत असल्याचे सेवानिवृत्त सेनाधिकारी कर्नल अरविंद जोगळेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.ते शहरातील मराठी वाङ्मय मंडळाच्या शारदीय व्याख्यानमालेसाठी व्याख्याते म्हणून आले होते. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीपर्यत पोहचविण्यासाठी आपण आजपर्यंत देश-विदेशात ३०० च्यावर व्याख्याने दिल्याचे त्यांनी सांगितले.वयाच्या ७० व्या वर्षानंतर लेखनाला सुरुवात कशी झाली याविषयी बोलतांना त्यांनी सांगितले की, ५६ वर्षापर्यंत भारतीय सैन्य दलात सेवा केली.सेवानिवृत्तीनंतर संगणक घेऊन प्रत्यक्ष सेनेत कर्तव्य करीत असताना आलेले अनुभव मांडायला सुरुवात केली आणि त्यानंतर ११ पुस्तके लिहिली. आज साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.ज्येष्ठांविषयी बोलताना ते म्हणाले ज्येष्ठांनी त्यांना जीवनात मिळालेली शिदोरी आजच्या तरुण पिढीसाठी सोडून दिली पाहिजे. तरुण पिढीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन सैन्य दलात भरती व्हावं अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रश्न विचारण्याची शक्ती थांबली तेव्हा माणूस संपतो असेही त्यांनी सांगितले. आयुष्यात आपण एक फार्म भरला, एक परीक्षा दिली, आणि एकच नोकरी केली, असे अभिमानाने सांगत त्यांनी अनेक चित्रपटात काम केल्याचे म्हटले.कर्नल जोगळेकर यांचा १९६५ आणि १९७१ च्या भारत पाक युद्धासह श्रीलंकेत शांतता सेनेत व मालदीव मोहिमेत सहभाग होता. त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.जवळपास १५ चित्रपटातून आणि जाहिरातीतून अभिनय केला आहे. २६ / ११ च्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी ताज हॉटेलमध्ये त्यांचे ‘१९४७ ते एके ४७’ या विषयावर भाषण झाले ते प्रचंड गाजल्याची आठवण त्यांनी सांगितली. देशाभिमान जागविण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.

टॅग्स :Amalnerअमळनेर