शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

देशाभिमान जपण्याची नितांत गरज : कर्नल अरविंद जोगळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:18 IST

इस्त्राईल आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून ७० वर्ष झाली. मात्र इस्राईलने झपाट्याने प्रगती केली, कारण त्या देशातील लहान मुलालादेखील स्वातंत्र्यासाठी मोजलेली किंमत माहीत असल्याचे सेवानिवृत्त सेनाधिकारी कर्नल अरविंद जोगळेकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देअमळनेर येथील शारदीय व्याख्यानमालेत गुंफले पहिले पुष्पमराठी वाङ्मय मंडळातर्फे व्याख्यानमालेचे आयोजनदेशविदेशात दिली ३०० पेक्षा जास्त व्याख्याने

महेंद्र रामोशे।अमळनेर : इस्त्राईल आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून ७० वर्ष झाली. मात्र इस्राईलने झपाट्याने प्रगती केली, कारण त्या देशातील लहान मुलालादेखील स्वातंत्र्यासाठी मोजलेली किंमत माहीत असल्याचे सेवानिवृत्त सेनाधिकारी कर्नल अरविंद जोगळेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.ते शहरातील मराठी वाङ्मय मंडळाच्या शारदीय व्याख्यानमालेसाठी व्याख्याते म्हणून आले होते. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीपर्यत पोहचविण्यासाठी आपण आजपर्यंत देश-विदेशात ३०० च्यावर व्याख्याने दिल्याचे त्यांनी सांगितले.वयाच्या ७० व्या वर्षानंतर लेखनाला सुरुवात कशी झाली याविषयी बोलतांना त्यांनी सांगितले की, ५६ वर्षापर्यंत भारतीय सैन्य दलात सेवा केली.सेवानिवृत्तीनंतर संगणक घेऊन प्रत्यक्ष सेनेत कर्तव्य करीत असताना आलेले अनुभव मांडायला सुरुवात केली आणि त्यानंतर ११ पुस्तके लिहिली. आज साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.ज्येष्ठांविषयी बोलताना ते म्हणाले ज्येष्ठांनी त्यांना जीवनात मिळालेली शिदोरी आजच्या तरुण पिढीसाठी सोडून दिली पाहिजे. तरुण पिढीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन सैन्य दलात भरती व्हावं अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रश्न विचारण्याची शक्ती थांबली तेव्हा माणूस संपतो असेही त्यांनी सांगितले. आयुष्यात आपण एक फार्म भरला, एक परीक्षा दिली, आणि एकच नोकरी केली, असे अभिमानाने सांगत त्यांनी अनेक चित्रपटात काम केल्याचे म्हटले.कर्नल जोगळेकर यांचा १९६५ आणि १९७१ च्या भारत पाक युद्धासह श्रीलंकेत शांतता सेनेत व मालदीव मोहिमेत सहभाग होता. त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.जवळपास १५ चित्रपटातून आणि जाहिरातीतून अभिनय केला आहे. २६ / ११ च्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी ताज हॉटेलमध्ये त्यांचे ‘१९४७ ते एके ४७’ या विषयावर भाषण झाले ते प्रचंड गाजल्याची आठवण त्यांनी सांगितली. देशाभिमान जागविण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.

टॅग्स :Amalnerअमळनेर