शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलनामाच्या जयघोषात अमळनेरच्या दिंडीचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 18:05 IST

पाऊले चालती पंढरीची वाट : २१ जुलै रोजी दिंडी पंढरपुरात पोहोचणार

ठळक मुद्देदिंडीला निरोप देण्यासाठी जमलेल्या भाविकांमुळे तुळशीबागेचा परिसर फुलून गेला होता. प्रत्येकाच्या मुखी विठ्ठल-रुख्मिणी, संत सखाराम महाराजांचा जप सुरू होता.पांढरे कपडे, कपाळी गंध, गळ्यात तुळशीची माळ व खांद्यावर भगवा ध्वज, व मुखी विठ्ठलाचा जप करीत वारकरी दिंडीसाठी सज्ज झालेले होते. याचवेळी ढोलताशाच्या तालावर अनेक वारकºयांंनी ठेका धरला. महिलांनी फुगड्या खेळल्या. त्यामुळे उत्साहात भर पडली होती. सर्वत्र वातावरण भक्तिमय झाले होते.

अमळनेर, जि.जळगाव : संत सखाराम महाराजांचा जयजयकार, विठ्ठल नामाचा जयघोष करीत संत सखाराम महाराज विठ्ठल-रुख्मिणी संस्थानच्या दिंडीचे शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता तुळशी बागेतून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी भाविकांचा उत्साह अमाप होता.वारीत सहभागी होण्यासाठी भाविकांची सकाळपासूनच वाडी संस्थानमध्ये गर्दी होऊ लागली होती. पहाटेपासूनच वाडीत टाळमृदुंगाचा आवाज निनादू लागला होता. सकाळी प्रसाद महाराजांचे वाडीत विठ्ठलासमोर कीर्तन झाले. त्यानंतर समाधीचे दर्शन घेतल्यानंतर प्रसाद महाराज पैलाडमधील तुळशी बागेत आले. या ठिकाणी महाराजांच्या हस्ते तुळशीपत्र अर्पण करण्यात आले.पूजा आटोपल्यानंतर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. भाविकांसाठी येथे शामियाना टाकण्यात आला होता. ओसरीवर बसून महाराज भाविकांना खडीसाखरेचा प्रसाद व आशीर्वाद देत होते. दिंडी निघण्याची वेळ समीप येत होती. तसतशी भाविकांची गर्दी वाढू लागली होती.दुपारी ठीक १२.३० वाजता आरती झाली. प्रसाद महाराजांनी भाविकांना आशीर्वाद देताच भाविकांनी संत सखाराम महाराज की जय असा जयघोष केला. महाराजांनी डोक्यावर पांढरी घोंगडी घेतली अन् महाराज व वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले. दिंडीत शेकडो भाविक सहभागी झाले होते.२३ दिवसांचा प्रवास केल्यानंतर अमळनेरची पायी दिंडी शनिवार, २१ जुलै रोजी पंढरपूरला पोहचेल.दिंडीचा पहिला मुक्काम पारोळ्याला आहे. तेथून आडगाव, भडगाव, नगरदेवळा, नेरी, नागद, बिलखेडा, नागापूर, पिशोर, चिखलठाण, टाकळी, दौलताबाद, वाळूंज, महारूळ, पैठण, शेवगांव, पाथर्डी, धामणगांव, कडा, आष्टी, अरणगांव, जवळा, करमाळा, निंभोरा, वडशिवणे, सापटणे, करकंबमार्गे २१ जुलैला पंढरपुरात दाखल होईल.या वेळी महेश कोठावदे, राजू महाले, विजय प्रभाकर पाटील, पवार, बी.आर.बोरसे, पी.एस.कुलकर्णी, संदीप मल्हारी पाटील, मोतीलाल अहिरे, पवन शेटे, गोपी कासार, सुरेश पिरन पाटील, उमेश देशमुख, राजकुमार बित्राई, विठोबा महाजन, अजबराव पाटील, रघू कंखरे, बापू झुलाल, अ‍ॅड.लाठी, नितीन निळे, कमल दलाल, विजय शुक्ल, प्रांत संजय गायकवाड, दिनेश सोनवणे, उदय देशपांडे, संजय एकतारे आदी उपस्थित होते.