शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

चाळीसगावच्या दिंडीचे पंढरीच्या वाटेवर प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 4:37 PM

गेल्या ३० वर्षांपासून बेलदारवाडीच्या सिद्धेश्वर आश्रम ते पंढरपूर पायी जाणाऱ्या दिंडीने यंदाही सोमवारी सकाळी १० वाजता गावक-यांना वेशीवर प्रेमालिंग देत पंढरीकडे आगेकूच केली. यावेळी वारकरी आणि गावकरी यांना अश्रू अनावर झाले होते.

ठळक मुद्दे५०० वारकरी सहभागी ४० विद्यार्थीही विठूनामाच्या शाळेतबहुतांशी विद्यार्थी आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातीलयंदा हे दिंडीचे ८० वे वर्षवारकरी आणि गावकरी यांना अश्रू झाले अनावर

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : गेल्या ३० वर्षांपासून बेलदारवाडीच्या सिद्धेश्वर आश्रम ते पंढरपूर पायी जाणाऱ्या दिंडीने यंदाही सोमवारी सकाळी १० वाजता गावक-यांना वेशीवर प्रेमालिंग देत पंढरीकडे आगेकूच केली. यावेळी वारकरी आणि गावकरी यांना अश्रू अनावर झाले होते. मोठ्या भक्तीभावाने गावकऱ्यांनी दिंडीत सहभागी ३०० महिला व २०० पुरुष अशा ५०० वारकºयांना निरोप दिला.ज्ञानेश्वर माऊली यांच्या नेतृत्वाखाली निघणाºया दिंडीचे हे यंदाचे ३१वे वर्ष आहे. चाळीसगाव शहरातून गेल्या ७९ वषार्पासून निघणाºया कै.हभप मोतीराम महाराज यांच्या पायी दिंडीचे प्रस्थान मंगळवारी बलराम व्यायाम शाळेच्या पटांगणावरुन होणार आहे. गतवर्षाप्रमाणे यावषीर्ही दिंडीत ४० विद्यार्थ्यांसह एकूण ८५ वारकरी सहभागी होणार असल्याचे दिंडीचे प्रमुख हभप कृष्णा महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सिद्धेश्वर आश्रमात गेल्या १५ दिवसांपासून दिंडीचे नियोजन करण्यात येत होते. परिसरातील बहुतांशी वारकरी रविवारीच मुक्कामी सिद्धेश्वर आश्रमात पोहचले.सोमवारी पहाटेपासूनच आश्रमात वारकºयांची लगबग सुरू झाली होती. ज्ञानोबा - माऊलीचा गजरही सुरु होता. सर्व तयारी झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली यांनी वारकºयांना मार्गदर्शन केले. यावेळी बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील, युवा उद्योजक मंगेश चव्हाण, किशोर पाटील ढोमणेकर, भूषण पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते. टाळ - मृदुंगाचा गजर आणि मुखी हरिनाम घेतपायी दिंडी खडकी बुद्रूक, तांबोळे, बोलठाण मार्गे २२ दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी पोहचणार आहेत. दिंडीच्या अग्रभागी पालखी असून यावर्षी पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता जलसाक्षतेवर दिंडी मार्गात प्रबोधन करण्यात येणार आहे. गेल्या काही वषार्पासून सामाजिक दायित्व म्हणून दिंडी मार्गात येणाºया गावातील ग्रामस्थांना उदबोधन केले जाते.यंदाचा दुष्काळ भयावह असून पाणीटंचाईची दाह मोठा आहे. दिंडीत यावरच प्रबोधन करुन झाडे लावण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. विठूरायाला दुष्काळाच्या आरिष्टातून महाराष्ट्र मुक्त होऊ दे, असे साकडे घालणार असल्याचे हभप ज्ञानेश्वर माऊली यांनी सांगितले.४० विद्यार्थी विठूनामाच्या शाळेत !‘विठ्ठल नामाची शाळा भरली... शाळा शिकताना तहान-भूक हरली...’ असं म्हणत चाळीसगावहून मंगळवारी पंढरपुरकडे प्रस्थान करणाºया कृष्णा महाराज यांच्या पायी दिंडीत यावर्षीदेखील ४० विद्यार्थी सहभागी होत आहे. गेल्या चार वर्षांपासून कृष्णा महाराज यांनी आपल्या शिवाजी चौकातील घरातच पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना आश्रय दिला आहे. यातील बहुतांशी विद्यार्थी आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील आहे. या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत वारकरी शिक्षणही दिले जाते. दरवर्षी तिसहून अधिक विद्यार्थी पंढरपुरची वारी करतात. यंदा हे दिंडीचे ८० वे वर्ष आहे. गेल्यावर्षी ४५ विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते.

टॅग्स :SchoolशाळाChalisgaonचाळीसगाव