शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील शासकीय आदिवासी वसतिगृहाच्या अडचणी दूर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:16 IST

आश्वासनानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आमरण उपोषण मागे

ठळक मुद्दे आश्वासनांची पूर्तता न झाल्याने आंदोलनखासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आंदोलकांची भेट

जळगाव: शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातील अडचणी दूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी गुरूवार, ११ आॅक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. तसेच सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यापूर्वी शासकीय आदिवासी वसतिगृहांमधील अडचणींबाबत २१ सप्टेंबर २०१८ रोजी तर २८ सप्टेंबर रोजी प्रकल्प अधिकारी यांना निवेदन दिले होते. प्रकल्प अधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी वरिष्ठ अधिकाºयांश्ी चर्चा करून तत्काळ प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र प्रकल्प अधिकाºयांकडून मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रकल्प अधिकारी यांनी तेव्हा केलेल्या आवाहनामुळेच आमरण उपोषण मागे घेण्यात आले होते. मात्र मागण्यांचा विचार झालेला नाही. त्यामुळे गुरूवार, ११ आॅक्टोबरपासून आमरण उपोषण करीत असल्याचा इशारा दिला.सुप्रिया सुळेंनी घेतली आंदोलकांची भेटखासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. दिवसभर बसूनही कोणीही अधिकारी फिरकला नसल्याचे समजल्याने त्यांनी जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधला. त्यानंतर प्रकल्प अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्या शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. मात्र विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. रात्रीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर उघड्यावर बसून राहणार असल्याचे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी जाहीर केले. मात्र सायंकाळी जिल्हाधिकाºयांनी या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.-----या आहेत मागण्या१) शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह, जळगाव येथे वाढीव जागा उपलब्ध करून द्याव्या.२) ज्या मुला-मुलींनी या शैक्षणिक वर्षात सन २०१८-१९ मध्ये ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहाची त्वरित व्यवस्था करण्यात यावी.३)ज्या विद्यार्थ्यांनी खास बाब म्हणून अर्ज सादर केलेला आहे, त्यांची तत्काळ यादी जाहीर करावी.