शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जळगावातील शासकीय आदिवासी वसतिगृहाच्या अडचणी दूर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:16 IST

आश्वासनानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आमरण उपोषण मागे

ठळक मुद्दे आश्वासनांची पूर्तता न झाल्याने आंदोलनखासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आंदोलकांची भेट

जळगाव: शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातील अडचणी दूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी गुरूवार, ११ आॅक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. तसेच सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यापूर्वी शासकीय आदिवासी वसतिगृहांमधील अडचणींबाबत २१ सप्टेंबर २०१८ रोजी तर २८ सप्टेंबर रोजी प्रकल्प अधिकारी यांना निवेदन दिले होते. प्रकल्प अधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी वरिष्ठ अधिकाºयांश्ी चर्चा करून तत्काळ प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र प्रकल्प अधिकाºयांकडून मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रकल्प अधिकारी यांनी तेव्हा केलेल्या आवाहनामुळेच आमरण उपोषण मागे घेण्यात आले होते. मात्र मागण्यांचा विचार झालेला नाही. त्यामुळे गुरूवार, ११ आॅक्टोबरपासून आमरण उपोषण करीत असल्याचा इशारा दिला.सुप्रिया सुळेंनी घेतली आंदोलकांची भेटखासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. दिवसभर बसूनही कोणीही अधिकारी फिरकला नसल्याचे समजल्याने त्यांनी जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधला. त्यानंतर प्रकल्प अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्या शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. मात्र विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. रात्रीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर उघड्यावर बसून राहणार असल्याचे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी जाहीर केले. मात्र सायंकाळी जिल्हाधिकाºयांनी या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.-----या आहेत मागण्या१) शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह, जळगाव येथे वाढीव जागा उपलब्ध करून द्याव्या.२) ज्या मुला-मुलींनी या शैक्षणिक वर्षात सन २०१८-१९ मध्ये ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहाची त्वरित व्यवस्था करण्यात यावी.३)ज्या विद्यार्थ्यांनी खास बाब म्हणून अर्ज सादर केलेला आहे, त्यांची तत्काळ यादी जाहीर करावी.