शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हवामानाच्या धोक्याच्या कालमर्यादेत अंशतः तडजोड करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:45 IST

आगामी सन २०२२ वर्षातील केळी फळपीक विमा योजना पुनर्गठित करण्यासाठी केंद्रीय फलोत्पादन आयुक्तांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शेतकरी प्रतिनिधींची भूमिका जाणून ...

आगामी सन २०२२ वर्षातील केळी फळपीक विमा योजना पुनर्गठित करण्यासाठी केंद्रीय फलोत्पादन आयुक्तांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शेतकरी प्रतिनिधींची भूमिका जाणून घेतली.

गतवर्षीची हवामानावर आधारित सुधारित त्रैवार्षिक केळी फळपीक विमा योजना केळी उत्पादक शेतकऱ्यांवर अन्यायाचा आसूड ओढणारा ठरल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांनी एल्गार मांडल्याने राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्या अनुषंगाने राज्य फलोत्पादन आयुक्त डॉ. के. पी. मोते यांनी आगामी वर्षांत केळी फळपीक विमा योजना पुनर्गठित करण्यासाठी त्यांचे अध्यक्षतेखाली आगामी वर्षांत केळी फळपीक विमा योजना पुनर्गठित करण्यासाठी त्रिची येथील अ. भा. केळी संशोधन केंद्रांतील शास्त्रज्ज्ञ डॉ. श्रीमती उमा, राज्य फलोत्पादन विभागाचे संचालक शिरीष जमदाडे, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी व स्कायमेट तथा महावेध या हवामान केंद्रातील तज्ज्ञ यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव येथील तज्ज्ञ शेतकरी डॉ. सत्त्वशील जाधव, तर तालुक्यातील बलवाडी येथे अ. भा. केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील, केळी फळपीक विमा योजनेतील अन्याय निवारण समितीचे समन्वयक राहूल पाटील (बलवाडी) , विकास महाजन (ऐनपूर) , स्वप्नील पाटील व अमोल पाटील (बलवाडी ) या शेतकरी प्रतिनिधींसोबत आज ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून केळी उत्पादकांची भूमिका जाणून घेतली.

शासनाकडे गत १० वर्षांच्या कालखंडात १५ दिवसांपर्यंत कमी व जास्त तापमानाची लहर राहत असल्याचा सबळ पुरावा उपलब्ध असल्याने हवामानाचे धोक्यांचा कालखंड योग्य असल्याचा व एकूण संरक्षित विम्याचे कमाल ३० टक्के प्रमाणात शासनाचा विमा हप्त्याचा हिस्सा असावा, असा शासन निर्णय असल्याची भूमिका राज्य फलोत्पादन आयुक्त डॉ. के. पी. मोते यांनी मांडली.

त्यावेळी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे खंडन करीत आठ सेल्सिअंशपेक्षा सतत तीन दिवस कमी तपमान राहिल्यास चिलिंग एन्ज्युरीचा प्रकोप होऊन तर कमाल तापमान ४२ सेल्सिअंशपेक्षा सतत चार-पाच दिवस राहिल्यास केळीबागा होरपळून उद्ध्वस्त होत असल्याचे गत २० वर्षांपासूनचा नुकसानीचे पंचनाम्यांसह आमच्याकडेही पुरावे उपलब्ध असल्याची आक्रमक भूमिका मांडली.

दरम्यान, शेतकरी प्रतिनिधींची बाजू ध्यानात घेऊन केंद्र व राज्य सरकारसह विमा कंपनीची संयुक्त बैठक घेऊन अंतिम स्वरूप देण्यासाठी पुन्हा शेतकरी प्रतिनिधींशी ऑनलाइन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संरक्षित विम्यासाठी चार हेक्टरची मर्यादा शिथिल करणार.

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या या प्रतिनिधींनी यावर्षी केळी फळपीक विमा योजनेतील संरक्षित विम्याची रक्कम केवळ चार हेक्टरपर्यंत मर्यादित राहणार असल्याची अट शिथिल करण्याबाबत त्यांनी सहमती दर्शविली असून, केळी उत्पादक शेतकऱ्यांऐवजी शासन यंत्रणेकडूनच जिओ टॅगिंग करण्यासाठी त्यांनी सहमती दर्शविली आहे.

बलवाडी येथून ऑनलाइन कॉन्फरन्समध्ये सहभागी झालेले केळी उत्पादक शेतकरी राहूल पाटील, विकास महाजन, भागवत पाटील, स्वप्नील पाटील व अमोल पाटील दिसत आहेत.