शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील वनदाव्यांच्या फेरतपासणीत हस्तक्षेप न स्वीकारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 12:47 IST

निसर्गसंवर्धन कार्यकर्त्यांची जिल्हाधिकाºयांना निवेदन

ठळक मुद्दे‘लोकसंघर्ष मोर्चा’वर जिल्हाबंदी कराधोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करा

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. ११ - १२-अ अंतर्गत या वनदाव्यांची फेरतपासणी करण्यासाठी प्रशासानावर दबाव आणला जात असून या प्रक्रीयेमध्ये कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप प्रशासनाने स्वीकारू नये, अशी मागणी जिह्यातील निसर्गसंवर्धन चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे. या सोबतच लोकसंघर्ष मोर्चा या संघटनेवर जिल्हाबंदी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.वनहक्क कायद्याची अमलबजावणी करताना या कायद्याच्या तरतुदीनुसार यावल अभयारण्यासह वडोदा वनक्षेत्राला धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास क्षेत्र घोषित करण्याची प्रक्रिया त्वरित सुरु करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह वनसंवर्धनाच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची शनिवारी पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांनी भेट घेऊन निवेदन दिले.न्यू कॉन्झर्वरचे अभय उजागरे, पर्यावरण शाळेचे राजेंद्र नन्नवरे, वन्यजीव संरक्षण संस्थेचे वासुदेव वाडे, बाळकृष्ण देवेरे, अमान गुजर ,इम्रान तडवी, राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की,वनहक्क कायद्याच्या सर्वंकष अंमलबजावणीच्या प्रक्रियेत लोक संघर्ष मोर्चा या नंदुरबार जिल्ह्यातील संघटनेने प्रारंभापासून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप केलेला आहे. संघटनेतील कार्यकर्त्यांच्या दाबावामुळे १३ डिसेंबर २००५ नंतर विशेषत: यावल अभयारण्य आणि सभोवतालच्या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वनदावे दाखल करण्यात आले आहेत, यातील सुमारे ४००० वन दावे प्रशासनाने फेटाळले आहेत, आता पुन्हा १२-अ अंतर्गत या वनदाव्यांची फेरतपासणी करण्यासाठी प्रशासानावर दबाव आणला जात आहे, या प्रक्रीयेमध्ये कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप प्रशासनाने स्वीकारू नये, अशी मागणी या वेळी करण्यात आली. महसूल विभाग, वनविभाग आणि संबधित गावातील वनहक्क समितीच्या माध्यमातूनच स्थळ पाहणी करण्यात यावी या साठी सॅटेलाई इमेजचा आधार आवश्यक करण्यात यावा, जेणे करून संबंधित दाव्याची १३ डिसेंबर-२००५ पूर्वीच्या आणि नंतरच्या परिस्थितीचे वस्तुनिष्ठ आकलन होऊ शकेल, बाह्य हस्तक्षेप टाळण्यासाठी कोणत्याही संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधीना या प्रक्रिये पासून लांब ठेवण्यात यावे, १३ डिसेंबर २००५ नंतरचे सर्व दावे अवैध आणि बेकायदेशीर आहेत, अशा सर्व दावे धारकांना त्वरित वन क्षेत्रातून निष्काशीत करण्यात यावे आणि जिल्ह्यातील समृद्ध वन क्षेत्राची जोपासना करण्यात यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या.धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करालोकसंघर्ष मोर्च्याच्या दबावामुळे यावल अभयारण्याची समिती बरखास्त करण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी घेतला होतो, त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे थांबविण्यात आली, आता पुन्हा धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात यावी,अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातील गावांचे अभयारण्यासभोताली पुनर्वसन करण्यात यावे, जळगाव शहरातील सिद्धार्थ नगर येथील वसतिगृहातील १०० आदिवासी विद्यार्थ्यांना जेवण मिळविण्यासाठी यावल प्रकल्प कार्यालयापर्यंत रात्रभर पायी प्रवास करावा लागला होता,या वसतिगृहाचा ठेका प्रतिभा शिंदे यांच्या केनिपाडा बचत गटाकडे आहे, विशेष म्हणजे जळगाव जिल्'ातील गट सोडून नंदुरबार जिल्'ातील बचत गटांकडे हा ठेका का देण्यात आला, या विषयी प्रशासनाने सर्वंकष चौकशी करण्याची आवश्यकता आहे, जिल्'ाबाहेरील संस्था आणि संघटनांना आदिवासी आणि दुर्गम भागात दिले जाणारे ठेके रद्द करून त्यांची सविस्तर चौकशी करण्यात यावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. निवेदनाची प्रत सहाय्यक वनसंरक्षक ,यावल अभयारण्य उप वनसंरक्षक, जळगाव वन विभाग यांना पाठविण्यात आल्या आहेत.वन संवर्धनासाठी सर्वस्तरावर व्यापक प्रयत्न केले जातील आणि जिल्ह्यातील वाघांच्या संवर्धनासाठी सर्व संबधित अधिकाºयांशी चर्चा करून प्रस्ताव तयार करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी या वेळी दिले.

टॅग्स :Jalgaonजळगावforestजंगल