शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांना पूर येताच वाळू तस्करांची दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:23 IST

रावेर तालुक्यातील केºहाळे - मंगरूळ या दहा किलोमीटरच्या अंतरात असलेल्या भोकर नदीच्या पात्रातून वाळू तस्करांकडून दिवसाढवळ्या वाळूची सर्रास लूट सुरू आहे. गेल्या आठवड्यात सातपुड्यात झालेल्या पावसामुळे नद्यांना पूर आले. त्यामुळे वाळूचा स्तर वरती आल्याने आयती संधी वाळू चोरट्यांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देशेतकºयांनी पदरमोड करून नदीपात्रात खणले होते चरपुराचे पाणी सरळ वाहून जात असल्याने शेतकºयांच्या मेहनतीवर पाणी

केºहाळे ता. रावेर, जि. जळगाव : संपलेल्या आठवड्यात सातपुडा पर्वत रांगेत झालेल्या मुसळधार वृष्टीमुळे तालुक्यातील मंगरूळ ते केºहाळे या भागातील भोकर नदीला आलेल्या पुरामुळे वाळूचा स्तर पालटल्याने ती नदीपात्रात वर आली आहे, त्यामुळे वाळू चोरट्यांनी येथे अक्षरश: धुमाकूळ घातला असून जमिनीत पाणी मुरवण्यासाठी शेतकºयांनी केलेला हजारो रुपयांचा खर्च पाण्यात जाणार आहे. याकडे मात्र संबंधीतांचे दूर्लक्ष होत असल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.तालुक्यातील मंगरूळ ते केºहाळे या भागातून भोकर नदी वाहते. सद्या या नदीला बºयापैकी पाणी आले आहे. त्यामुळे नदीचा स्तर पालटला असून वाळू वर आली आहे. तथापि आठ ते दहा किलोमीटर अंतराच्या नदी पात्रातून आयती वर आलेली वाळू पळविण्यासाठी वाळू चोरटे सक्रीय झाले आहेत. दिवसाढवळ्या वाळूची लूट केली जात असल्याने संतप्त शेतकरी प्रांत किंवा तहसील कार्यालयात धडक देण्याच्या पवित्र्यात आहेत.वरूणाची कृपा पण...गेल्या आठवड्यात वरूण राजाच्या कृपेमुळे सातपुडा पर्वत रांगेत दमदार पाऊस झाल्यामुळे भोकर नदीवरील मंगरूळ धरण पूर्ण भरले आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यातून पाणी ओसंडून वाहत असून मंगरूळ ते तापी नदीच्या पात्रापर्यंत हे पाणी पोहचले आहे.पाण्याच्या प्रवाहामुळे नदीमधील मातीचा खरवा आणि वाळूचा स्तर पालटून वाळू वर आली आहे. जमिनीत पाणी मुरण्याला मदत करणारी वाळू मात्र चोरट्यांकडून लूटून नेली जात आहे. परिणामी नदीतील पाणी जमिनीत न मुरता सरळ तापी नदीमध्ये वाहून जात आहे.महसूल प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वाळू चोरट्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी संतप्त शेतकºयांकडून होत आहे. याबाबत तक्रारीचे निवेदन प्रांत आणि तहसीलदारांना दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.भूगर्भातील जलपातळी वाढीच्या उपक्रमाला वाळू तस्करांचे नखराज्य शासनाच्या ‘जलयुक्त शिवार’ अभियानाचा वसा घेऊन या परिसरातील शेतकºयांनी नदी पात्रात जागोजागी उन्हाळ्याच्या दिवसात पदरमोड करून मोठ मोठे चर खोदले होते. जेणेकरून पावसाळ्यातील पाणी जास्तीत जास्त जमीनीत झिरपून भूजल पातळी वाढावी आणि भविष्यात पिण्याच्या पाण्यासह बागायती पिकांना देखील पाण्याअभावी धोका उद्भवणार नाही यासाठी मोठ्या आशेने मेहनतीसह पैसे खर्च करून भविष्यासाठी केºहाळे येथील शेतकºयांनी नियोजनबद्ध हे काम केले होते. तथापि शेतकºयांच्या आशा- अपेक्षांवर वाळू तस्करांमुळे पाणी फेरले जात असून वाळू तस्करांवर कोणीच नियंत्रण आणत नसल्याने प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :sandवाळू