शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

नद्यांना पूर येताच वाळू तस्करांची दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:23 IST

रावेर तालुक्यातील केºहाळे - मंगरूळ या दहा किलोमीटरच्या अंतरात असलेल्या भोकर नदीच्या पात्रातून वाळू तस्करांकडून दिवसाढवळ्या वाळूची सर्रास लूट सुरू आहे. गेल्या आठवड्यात सातपुड्यात झालेल्या पावसामुळे नद्यांना पूर आले. त्यामुळे वाळूचा स्तर वरती आल्याने आयती संधी वाळू चोरट्यांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देशेतकºयांनी पदरमोड करून नदीपात्रात खणले होते चरपुराचे पाणी सरळ वाहून जात असल्याने शेतकºयांच्या मेहनतीवर पाणी

केºहाळे ता. रावेर, जि. जळगाव : संपलेल्या आठवड्यात सातपुडा पर्वत रांगेत झालेल्या मुसळधार वृष्टीमुळे तालुक्यातील मंगरूळ ते केºहाळे या भागातील भोकर नदीला आलेल्या पुरामुळे वाळूचा स्तर पालटल्याने ती नदीपात्रात वर आली आहे, त्यामुळे वाळू चोरट्यांनी येथे अक्षरश: धुमाकूळ घातला असून जमिनीत पाणी मुरवण्यासाठी शेतकºयांनी केलेला हजारो रुपयांचा खर्च पाण्यात जाणार आहे. याकडे मात्र संबंधीतांचे दूर्लक्ष होत असल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.तालुक्यातील मंगरूळ ते केºहाळे या भागातून भोकर नदी वाहते. सद्या या नदीला बºयापैकी पाणी आले आहे. त्यामुळे नदीचा स्तर पालटला असून वाळू वर आली आहे. तथापि आठ ते दहा किलोमीटर अंतराच्या नदी पात्रातून आयती वर आलेली वाळू पळविण्यासाठी वाळू चोरटे सक्रीय झाले आहेत. दिवसाढवळ्या वाळूची लूट केली जात असल्याने संतप्त शेतकरी प्रांत किंवा तहसील कार्यालयात धडक देण्याच्या पवित्र्यात आहेत.वरूणाची कृपा पण...गेल्या आठवड्यात वरूण राजाच्या कृपेमुळे सातपुडा पर्वत रांगेत दमदार पाऊस झाल्यामुळे भोकर नदीवरील मंगरूळ धरण पूर्ण भरले आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यातून पाणी ओसंडून वाहत असून मंगरूळ ते तापी नदीच्या पात्रापर्यंत हे पाणी पोहचले आहे.पाण्याच्या प्रवाहामुळे नदीमधील मातीचा खरवा आणि वाळूचा स्तर पालटून वाळू वर आली आहे. जमिनीत पाणी मुरण्याला मदत करणारी वाळू मात्र चोरट्यांकडून लूटून नेली जात आहे. परिणामी नदीतील पाणी जमिनीत न मुरता सरळ तापी नदीमध्ये वाहून जात आहे.महसूल प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वाळू चोरट्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी संतप्त शेतकºयांकडून होत आहे. याबाबत तक्रारीचे निवेदन प्रांत आणि तहसीलदारांना दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.भूगर्भातील जलपातळी वाढीच्या उपक्रमाला वाळू तस्करांचे नखराज्य शासनाच्या ‘जलयुक्त शिवार’ अभियानाचा वसा घेऊन या परिसरातील शेतकºयांनी नदी पात्रात जागोजागी उन्हाळ्याच्या दिवसात पदरमोड करून मोठ मोठे चर खोदले होते. जेणेकरून पावसाळ्यातील पाणी जास्तीत जास्त जमीनीत झिरपून भूजल पातळी वाढावी आणि भविष्यात पिण्याच्या पाण्यासह बागायती पिकांना देखील पाण्याअभावी धोका उद्भवणार नाही यासाठी मोठ्या आशेने मेहनतीसह पैसे खर्च करून भविष्यासाठी केºहाळे येथील शेतकºयांनी नियोजनबद्ध हे काम केले होते. तथापि शेतकºयांच्या आशा- अपेक्षांवर वाळू तस्करांमुळे पाणी फेरले जात असून वाळू तस्करांवर कोणीच नियंत्रण आणत नसल्याने प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :sandवाळू