शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

परीक्षा संदर्भातील निर्णयाचे विद्यार्थी संघटनांनी केले स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 21:52 IST

जळगाव : इतर वर्गाच्या परीक्षा रद्द करीत फक्त अंतिम वर्षांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ या ...

जळगाव : इतर वर्गाच्या परीक्षा रद्द करीत फक्त अंतिम वर्षांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ या निर्णयाचा जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी संघटनांची स्वागत केले आहे़ दरम्यान, काही बाबींबाबत संभ्रम असल्यामुळे शासनाने समुपदेशकांची नियुक्ती करावी, अशी मागणी अभाविपतर्फे करण्यात आली आहे़राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे़ शाळा, महाविद्यालय बंद आहेत़ तर शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द करण्यात याव्या व फक्त अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती़ अखेर शुक्रवारी शासनाने फक्त अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी संघटनांच्या मागणीला यश आले आहे़- प्रतिक्रियाकोरोना महामारीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा जो निर्णय घेतला आहे़ त्याचे अभाविप स्वागत करते़ सद्य परिस्थती लक्षात घेऊन घेतला असल्यामुळे या निर्णयाबाबतीत अभाविप शासना सोबत आहे. परंतु या निर्णया संदर्भात अनेक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम देखील आहेत़ त्यामुळे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितल्या प्रमाणे जिल्हा स्तरावर समुपदेशन केंद्र लवकर सुरू करण्यात यावे.- सिद्धेश्वर लटपटे, महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री, अभाविप-------------प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रमोट करण्याचा निर्णय योग्य असून तो सध्याची परिस्थती लक्षात घेऊन घेतला आहे़ त्यामुळे या निर्णयाचे युवाशक्ती स्वागत करते़- विराज कावडीया, संस्थापक, युवाशक्ती फाऊंडेशन----------------कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व फार्मसी स्टुडंटस् कौन्सिलतर्फे करण्यात आली होती़ या मागणीला यश आले असल्यामुळे शासनाचे आभार मानतो़ तर सद्यच्या परिस्थिती पाहून परीक्षा घेण्यात याव्यात़- भूषण भदाणे, अध्यक्ष, फार्मसी स्टुडंटस् कौन्सिल---------------------शासनाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला आहे़ परंतु, कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव भविष्यातही कायम राहिल्यास अंतिम वर्षाच्या परीक्षाही रद्द करण्यात याव्या, अशीही मागणी संघटनेकडून करण्यात येणार आहे़- देवेंद्र मराठे, जिल्हाध्यक्ष, एनएसयूआय

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव