शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

परीक्षा संदर्भातील निर्णयाचे विद्यार्थी संघटनांनी केले स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 21:52 IST

जळगाव : इतर वर्गाच्या परीक्षा रद्द करीत फक्त अंतिम वर्षांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ या ...

जळगाव : इतर वर्गाच्या परीक्षा रद्द करीत फक्त अंतिम वर्षांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ या निर्णयाचा जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी संघटनांची स्वागत केले आहे़ दरम्यान, काही बाबींबाबत संभ्रम असल्यामुळे शासनाने समुपदेशकांची नियुक्ती करावी, अशी मागणी अभाविपतर्फे करण्यात आली आहे़राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे़ शाळा, महाविद्यालय बंद आहेत़ तर शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द करण्यात याव्या व फक्त अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती़ अखेर शुक्रवारी शासनाने फक्त अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी संघटनांच्या मागणीला यश आले आहे़- प्रतिक्रियाकोरोना महामारीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा जो निर्णय घेतला आहे़ त्याचे अभाविप स्वागत करते़ सद्य परिस्थती लक्षात घेऊन घेतला असल्यामुळे या निर्णयाबाबतीत अभाविप शासना सोबत आहे. परंतु या निर्णया संदर्भात अनेक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम देखील आहेत़ त्यामुळे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितल्या प्रमाणे जिल्हा स्तरावर समुपदेशन केंद्र लवकर सुरू करण्यात यावे.- सिद्धेश्वर लटपटे, महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री, अभाविप-------------प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रमोट करण्याचा निर्णय योग्य असून तो सध्याची परिस्थती लक्षात घेऊन घेतला आहे़ त्यामुळे या निर्णयाचे युवाशक्ती स्वागत करते़- विराज कावडीया, संस्थापक, युवाशक्ती फाऊंडेशन----------------कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व फार्मसी स्टुडंटस् कौन्सिलतर्फे करण्यात आली होती़ या मागणीला यश आले असल्यामुळे शासनाचे आभार मानतो़ तर सद्यच्या परिस्थिती पाहून परीक्षा घेण्यात याव्यात़- भूषण भदाणे, अध्यक्ष, फार्मसी स्टुडंटस् कौन्सिल---------------------शासनाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला आहे़ परंतु, कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव भविष्यातही कायम राहिल्यास अंतिम वर्षाच्या परीक्षाही रद्द करण्यात याव्या, अशीही मागणी संघटनेकडून करण्यात येणार आहे़- देवेंद्र मराठे, जिल्हाध्यक्ष, एनएसयूआय

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव