शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पुण्यातून मित्राच्या लग्नाला आलेल्या अभियंत्याचा भुसावळात उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 12:34 IST

भुसावळ येथे मित्राच्या लग्नासाठी पुणे येथून आलेल्या अभय शरद फेगडे या तरुण अभियंत्याचा उष्माघाताने मृत्यू झाला.

ठळक मुद्देआनंदाने नृत्य करण्यासह जेवणानंतर काळाचा घालाआठवडाभरात उष्माघाताचा चौथा बळी

जळगाव - भुसावळ येथे मित्राच्या लग्नासाठी पुणे येथून आलेल्या अभय शरद फेगडे (२५, रा. साकरी, ता. भुसावळ) या तरुण अभियंत्याचा शुक्रवारी (4 मे) दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. या घटनेने नातेवाईकांसह मित्र परिवारावर शोककळा पसरली. दरम्यान, हा मृत्यू उष्माघाताने झाला आहे की नाही?, हे शवविच्छेदन अहवालानंतरच समजू शकेल, असे वैद्यकीय अधिकरी डॉ. आशिफ शेख यांनी सांगितले.

पुणे येथून आला होता लग्नासाठी मूळ साकरी येथील रहिवासी असलेल्या अभय फेगडे याचे आई-वडील हे साकरी येथेच राहतात. अभियांंत्रिकीच्या शिक्षणासाठी अभय गेल्या 6 वर्षांपासून पुणे येथे राहत होता. शिक्षणानंतर त्याला दीड वर्षापूर्वीच नोकरी लागली आणि माहिती व तंत्रज्ञान अभियंता (आयटी इंजिनिअर) म्हणून तो खाजगी कंपनीत काम करीत होता.

४ रोजी मित्राचे लग्न असल्याने तो भुसावळ येथे आला होता. दुपारी लग्न सोहळ्यात मित्रांसोबत नृत्य केले, गप्पा मारल्या व जेवण केले. त्यानंतर मित्रांसोबत बसलेला असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले व त्याला उलटी झाली आणि तो खाली कोसळला. त्या वेळी त्याला तत्काळ भुसावळ येथेच खासगी रुग्णालयात हलविले. मात्र तेथून जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला.

मित्रांना व नातेवाईकांना शोक अनावरअभयला जिल्हा रुग्णालयात आणले असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. त्या वेळी त्यांच्या मित्रांना व नातेवाईकांना शोक अनावर झाला. घटनेची माहिती मिळताच अभयचे काका जिल्हा रुग्णालयात पोहचले. संध्याकाळी शवविच्छेदन करण्यात आले. अभयचा उष्माघाताने मृत्यू झाला असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

अहवालानंतर कारण स्पष्ट होणारअभयचा मृत्यू उष्माघाताने झाला की अन्य काही कारणामुळे या संदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. आसिफ शेख यांना विचारले असता शवविच्छेदन अहवालानंतरच कारण स्पष्ट होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.

नोकरीसोबत उच्चशिक्षणही घेत होता अभयअभय हा अत्यंत होतकरू व हुशार मुलगा होता, तो पुणे येथे नोकरीला असताना एमबीएचे शिक्षणदेखील घेत होता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. अभयच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ, दोन बहिणी, मेहुणे असा परिवार आहे.

आठवडाभरात उष्माघाताचा चौथा बळीदिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून जिल्ह्यात उष्माघाताच्या बळींची संख्याही वाढत आहे. आठवडाभरात उष्माघाताचा हा चौथा बळी गेला आहे. २८ एप्रिल रोजी पाचोरा तालुक्यातील आसनगाव येथून लग्न सोहळा आटोपून परत येत असताना गजानन केशव टेंभुर्णे (५०, रा. जलाराम नगर, जळगाव) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. ३० एप्रिल रोजी दहा दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या जळगाव तालुक्यातील तुरखेडा येथील विलास काशिनाथ सपकाळे (२४) या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला. ३ मे रोजी भुसावळ तालुक्यातील खडका येथील लक्ष्मण छगन बारेला (२५) या तरुणाचा आणि ४ मे रोजी दुपारी भुसावळ येथे अभय फेगडे याचा उष्माघाताने मृत्यू झाला.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव