शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातून मित्राच्या लग्नाला आलेल्या अभियंत्याचा भुसावळात उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 12:34 IST

भुसावळ येथे मित्राच्या लग्नासाठी पुणे येथून आलेल्या अभय शरद फेगडे या तरुण अभियंत्याचा उष्माघाताने मृत्यू झाला.

ठळक मुद्देआनंदाने नृत्य करण्यासह जेवणानंतर काळाचा घालाआठवडाभरात उष्माघाताचा चौथा बळी

जळगाव - भुसावळ येथे मित्राच्या लग्नासाठी पुणे येथून आलेल्या अभय शरद फेगडे (२५, रा. साकरी, ता. भुसावळ) या तरुण अभियंत्याचा शुक्रवारी (4 मे) दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. या घटनेने नातेवाईकांसह मित्र परिवारावर शोककळा पसरली. दरम्यान, हा मृत्यू उष्माघाताने झाला आहे की नाही?, हे शवविच्छेदन अहवालानंतरच समजू शकेल, असे वैद्यकीय अधिकरी डॉ. आशिफ शेख यांनी सांगितले.

पुणे येथून आला होता लग्नासाठी मूळ साकरी येथील रहिवासी असलेल्या अभय फेगडे याचे आई-वडील हे साकरी येथेच राहतात. अभियांंत्रिकीच्या शिक्षणासाठी अभय गेल्या 6 वर्षांपासून पुणे येथे राहत होता. शिक्षणानंतर त्याला दीड वर्षापूर्वीच नोकरी लागली आणि माहिती व तंत्रज्ञान अभियंता (आयटी इंजिनिअर) म्हणून तो खाजगी कंपनीत काम करीत होता.

४ रोजी मित्राचे लग्न असल्याने तो भुसावळ येथे आला होता. दुपारी लग्न सोहळ्यात मित्रांसोबत नृत्य केले, गप्पा मारल्या व जेवण केले. त्यानंतर मित्रांसोबत बसलेला असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले व त्याला उलटी झाली आणि तो खाली कोसळला. त्या वेळी त्याला तत्काळ भुसावळ येथेच खासगी रुग्णालयात हलविले. मात्र तेथून जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला.

मित्रांना व नातेवाईकांना शोक अनावरअभयला जिल्हा रुग्णालयात आणले असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. त्या वेळी त्यांच्या मित्रांना व नातेवाईकांना शोक अनावर झाला. घटनेची माहिती मिळताच अभयचे काका जिल्हा रुग्णालयात पोहचले. संध्याकाळी शवविच्छेदन करण्यात आले. अभयचा उष्माघाताने मृत्यू झाला असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

अहवालानंतर कारण स्पष्ट होणारअभयचा मृत्यू उष्माघाताने झाला की अन्य काही कारणामुळे या संदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. आसिफ शेख यांना विचारले असता शवविच्छेदन अहवालानंतरच कारण स्पष्ट होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.

नोकरीसोबत उच्चशिक्षणही घेत होता अभयअभय हा अत्यंत होतकरू व हुशार मुलगा होता, तो पुणे येथे नोकरीला असताना एमबीएचे शिक्षणदेखील घेत होता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. अभयच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ, दोन बहिणी, मेहुणे असा परिवार आहे.

आठवडाभरात उष्माघाताचा चौथा बळीदिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून जिल्ह्यात उष्माघाताच्या बळींची संख्याही वाढत आहे. आठवडाभरात उष्माघाताचा हा चौथा बळी गेला आहे. २८ एप्रिल रोजी पाचोरा तालुक्यातील आसनगाव येथून लग्न सोहळा आटोपून परत येत असताना गजानन केशव टेंभुर्णे (५०, रा. जलाराम नगर, जळगाव) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. ३० एप्रिल रोजी दहा दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या जळगाव तालुक्यातील तुरखेडा येथील विलास काशिनाथ सपकाळे (२४) या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला. ३ मे रोजी भुसावळ तालुक्यातील खडका येथील लक्ष्मण छगन बारेला (२५) या तरुणाचा आणि ४ मे रोजी दुपारी भुसावळ येथे अभय फेगडे याचा उष्माघाताने मृत्यू झाला.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव