शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

‘त्या’ मातेच्या मृत्यूने वैद्यकीय सेवेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:55 IST

पंधरा दिवसांची चिमुकली पोरकी : अन्य विकारांवर इलाजच नाही, नातेवाईकाची व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : कोरोनामुक्त होऊनही मृत्यूने गाठलेल्या २१ वर्षीय मातेच्या जाण्याने पंधरा दिवसांची चिमुकली पोरकी झाली़ या मातेचा अचानक होणारा मृत्यू आरोग्य यंत्रणेच्या सुविधा व वैद्यकीय सेवेवर असंख्य प्रश्न निर्माण करणारा आहे़ १७ तारखेला महिलेची सुटी होईल असे डॉक्टरांनी सांगितले व दुसऱ्याच दिवशी मृत्यूचा फोन आला़ या महिलेला अन्य काही त्रास होता का? याकडे डॉक्टरांनी लक्षच दिले नाही, असे सांगत कोरोनाबाधित ते कोरानामुक्त व मृत्यू असा आरोग्य यंत्रणेवर ठपका ठेवणारा धक्कादायक प्रवास एका नातेवाईकांनी ह्यलोकमतह्णकडे मांडला आहे़ चिमुकली पोरकी झाली याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़लॉकडाऊनमुळे अडकली महिलाही गर्भवती महिला जळगावला बहिणीकडे २१ मार्चला आलेली होती़ जनताकफर्युनंतर एका दिवसात परत जावू असे ठरले होते़ मात्र, २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाल्याने महिला जळगावात अडकली़ दरम्यान, एप्रिल महिन्यात महिलेची एका खासगी रुग्णालयात प्रसुती झाली व तीने एका मुलीला जन्म दिला़ बाधित आढळल्यानंतर महिलेला कोरोना रुग्णालयातील कक्षात दाखल करण्यात आले होते़ चौदा दिवसानंतर स्वॅब निगेटीव्ह आले मात्र, पंधराव्या दिवशी मृत्यू झाल्याने नातेवाईकांना मोठा धक्का बसला़ या प्रकाराने कोरोना रुग्णालयावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे़ रक्ताच्या गाठी तयार होऊन हृदयाचे ठोके बंद पडून मृत्यू झाल्याचे आम्हाला सांगण्यात येत आहे़ मात्र, कुठलेली मृत्यूचे कारण स्पष्ट करणारे प्रमाणपत्र आम्हाला दिले जात नसल्याचे नातेवाईकाचे म्हणणे आहे़जिल्हा रुग्णालयाबाहेर रात्रभर थांबूनमहिलेची खासगी रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर महिलेला एक दिवस त्रास झाल्याने खासगी रुग्णालयात व्हँटीलेटरची सुविधा नसल्याने महिलेला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी महिलेचे वडिल व काही नातेवाईकांनी महिलेला तिथे हलविले दाखल केले मात्र, डॉक्टरांनी .... तुम्हाला कोरोना चाचणीशिवाय दाखल करू शकत नाही, असे सांगून जायला सांगितले़ रात्री परतण्याची कसलीच व्यवस्था नसल्याने चिमुकल्यासह ही माता व तिच्या नातेवाईकांनी रात्र बाहेरच काढली़ ही अशी आरोग्य सेवा आहे का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे़नेमका मृत्यू कसा झाला याचे कारण विचारल्यानंतर रक्ताच्या गाठींनी हृदय बंद पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले़ मग या आजारावर तुम्ही उपचार का केले नाही? ती महिला नुकतीच सिझेरीयन होऊन आली होती, तिच्या अन्य त्रासांकडे लक्ष का दिले नाही, अशी विचारणा डॉक्टरांना करताच त्यांनी फोन बंद केला़ अंत्यसंस्कार झाले, मात्र, आम्हाला अद्याप मृत्यूचे कारण असणारे प्रमाणपत्र मिळाले नाही, नेमके आम्ही काय समाजावे? सर्व काही कागदावर दिसते, प्रत्यक्षात आरोग्य सेवा शून्य आहे़ महिलेचे दुसरीकडे उपचार सुरू असते तर वाचली असती, पंधरा दिवसाची चिमुकली पोरकी झाली नसती- मृत महिलेचे नातेवाईक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव