शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

मृत्यू ममुराबादला, अंत्यसंस्कार जळगावला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:38 IST

ग्रामस्थांचे हाल : गावात स्मशानभूमीला शेड नाही

ममुराबाद, ता. जळगाव : गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी योग्य स्मशानभूमि नसल्याने गावकऱ्यांची गैरसोय होत आहे. गावकऱ्यांना जळगाव शिवाजीनगर येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.सुमारे १५ हजारावर लोकसंख्या असलेल्या ममुराबाद येथे आजमितीस वापरात असलेली एकही अद्ययावत स्मशानभूमी नाही. परिणामी ग्रामस्थ गावालगतची शेती तसेच जळगाव-विदगाव रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेतच मृतदेहांवर अंत्यसंस्काराची वेळ निभावून जात असली तरी खरे हाल पावसाळ्यात सुरू होतात.पावसाची झडी सुरू असल्यास बºयाचवेळा ओली लाकडे पेट घेत नसल्याने मृतदेह अर्धवट जळण्याचे प्रकार घडतात. याशिवाय चिखलामुळे प्रचंड अस्वच्छता निर्माण झाल्याने मृतांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांना खूप हाल सहन करावे लागतात.पाऊस थांबायचे नावच घेत नसल्यास मृतदेह दिवसभर किंवा त्यापेक्षा जास्तवेळ घरात ठेवण्याचा प्रसंग येत असतो.अशा परिस्थितीत शेवटी नाईलाज म्हणून मृतदेह मालवाहू वाहनातून अंत्यसंस्कारासाठी जळगाव शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीकडे रवाना केला जातो.तिथेही काहीवेळा जागा नसल्यास बराचवेळ ताटकळावे लागते. या सर्व प्रकाराबद्दल नेहमीच तीव्र नाराजीचा सूर उमटत असताना ग्रामपंचायतीने स्मशानभूमीच्या प्रश्नाकडे अजुनही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. निव्वळ मोक्याची जागा नाही म्हणून रखडलेला स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांनी त्यामुळे पुन्हा एकदा केली आहे.अंत्यसंस्कारासाठी लागतात घरची लाकडेएकसारखा पाऊस सुरू असताना ममुराबादच्या ग्रामस्थांकडून जळगाव शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीचा पर्याय निवडला जात असला तरी महापालिकेकडून त्यांना कोणतेच सहकार्य मिळत नाही. अंत्यसंस्कारासाठी वापरली जाणारी लाकडेसुद्धा तिथे पुरविण्यात येत नाहीत. संबंधितांना त्यामुळे मृतदेहासोबत कोरडी लाकडेही घरून नेण्याची व्यवस्था करावी लागते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव