शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

मोती बैलाच्या वाट्याला आले भाग्याचे मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 22:42 IST

अशीही कृतज्ञता : २५ वर्षे राबणाऱ्या जितरबाचा महिंदळे येथे साजरा केला मृत्यू सोहळा

भास्कर पाटील ।महिंदळे,ता.भडगाव : आपल्या बरोबरीने खांद्याला खांदा लावत शेतात राबणाºया मोती नावाच्या जिवाभावाच्या मैतराला तो थकला म्हणून कसायाच्या दारात उभा न करता त्याला आपल्या दावणीतल्या खुट्यावरच भाग्याचे मरण येऊ दिले. व त्याच्या मृत्यूनंतर वाजतगाजत अंतीम सोहळा साजरा करीत मैतरा तुज्यासाठी केला हा अट्टाहास...! ची प्रचीती देत त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. जणू काही त्याच्या उपकाराची परतफेडच. बैल पोळा काही दिवसांवर येऊन ठेपला असतांनाच , त्याची आठवण मात्र या कुटुंबाला चिरंतन राहील.येथील शेतकरी धनसिंग रामलाल परदेशी यांना नातलगाकडून पाळण्यासाठी लहान वासरू मिळाले होते. ते वासरू लहानपणापासून गुणी व देखणे होते. त्यांनीही त्याला चांगला खुराक देऊन वाढवले. त्यांनी त्याचे नाव हौसेने मोती, ठेवले. मोतीही नावाप्रमाने गेली २५ वर्षे मोत्यासारखा चमकत राहीला. घरातील सदस्या प्रमाणे त्याचे खान, पान, खुराक अशी त्यांनी दखरेख ठेवली. त्याला वेळेवर धुणे, खरारा करीत मायेने अंगावर हात फिरवणे असा लळा त्यांनी लावला होता. आपल्या धन्याचे ऋण तो आपल्या दुसºया जोडीदाराबरोबर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा तिनही ऋतुत राबत फेडत होता. अंगात रग असली म्हणजे जितरब उगारते. मोती मात्र याला अपवाद ठरला. याने ही रग आपल्या राबण्यात ओतली होती. घरातील लहाणग्यापासुन ते मोठ्यांपर्यत कुणालाही २५ वर्षात ईजा पोहोचवली नाही.दोन वर्षे मोतीला दिला आरामबरोबरीचे चार बैल बदललेत पण मोत्याने सलग २० ते २५ वर्ष बैल गाडी, औताच्या जु (दुशेर) ला लावलेला खांदा तो (धकने) उत्तरोत्तर काढला नाही. महादेवाचा हा नंदी आपल्या पावलानं सुबत्ता आणीत राबला. शेतातुन मोती उगवण्यात मोत्या बैलाने कोणतीच कसर ठेवली नाही..निसर्ग नियमानुसार तो थकला गात्र शिथील झालीत. मालकानं त्याला विश्रांती देण्याचे ठरवले. मागील दोन वषार्पासून त्याला कामाला न जुंपता आपल्या घरातील सदस्या प्रमाणे आजतागायत त्याच्या खानपानाची व औषध उपचाराची व्यवस्था ठेवली.दोन -तीन वर्षाच्या लागोपाठ दुष्काळात चारा टंचाई मोठया प्रमाणात होती. त्याला विकण्याचा अनेकांनी सल्ला दिला.मात्र जिवाभावाच्या जितरबाला कसायाला विकण्याचा विचारही कधी मनात आणला नाही. या काळात तर रिकाम्या माणसाला खाऊ घालणेही जड होते परंतु मोती बैलानं गेली २५ वर्षे आपली सेवा केली. आता आपण त्याची सेवा करायची असे ठरवत त्यांनी दुष्काळातही त्याला चाºयाची कमी पडू दिली नाही. काल त्यानं आळीपाळीनं आपला मालक व सभोवतालच्या शेताकडं शेवटची नजर टाकत आपली मान टाकली. त्याची प्राणजोत मालवली अन् घरातील सदस्य गमवल्याचे दुख: मालकाला झाले.असाही मरण सोहळामोतीच्या निधनानंतर घरातील सदस्य सतीश परदेशी, कैलास परदेशी, कर्तारसिंग परदेशी, प्रकाश परदेशी व कुटुंबातील मंडळींनी त्याची आंघोळ घालून विधिवत पुजाअर्चा केली. नवा कपडा अंगावर टाकून व वाजतगाजत बैलगाडीच्या सहाय्याने गेली २५ वर्षे ज्या शेतात मोती राबला त्या शेतात खड्डा खोदून दफन विधी करून शेवटचा निरोप दिला.