शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

दिवाळी अंधारात, रब्बीचा खर्च कसा करावा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:14 IST

खरीप हंगाम पाण्यात : मेहनतीने वाढवलेल्या पीकांचे नुकसान पाहण्याची शेतकऱ्यांवर वेळ

अजय पाटील ।जळगाव : सप्टेंबर महिन्यापर्यंत झालेल्या दमदार पावसामुळे यंदाचा खरीप हंगाम जोरदार होईल, अशा विचारात असलेल्या बळीराजाचा स्वप्नांवर २० आॅक्टोबर पासून सुरु झालेल्या अवकाळी पावसाने पाणी फिरवले आहे. संपुर्ण खरीप हंगाम पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारातच गेली. त्यामुळे आता रब्बीसाठी खर्च तरी कसा करावा ? असा प्रश्न बळीराजाला सतावत आहे.‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी जळगाव तालुक्यातील आव्हाणे, नांदगाव, कठोरा, ममुराबाद या भाागातील शेतशिवार व बांधावर जावून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला असता, अनेक शेतकºयांची शेतीच्या-शेतीवरील संपूर्ण पीक वाया गेले असून, शेतकरी कोम फुटलेल्या ज्वारी, मका व सोयाबीनच्या पीकाकडे हतबल नजरेने पाहत भविष्यात येणाºया अडचणींचा विचारात बसलेला दिसून आला. शेतीशिवारात मेहनत करून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने बळीराजासमोर अडचणींचा डोंगर उभा ठाकल्याचे चित्र पहायला मिळाले.दिवाळीत ना कपडे नाही फराळआव्हाणे येथील दीपक मंगल पाटील या शेतकºयाचा १० हेक्टरवरील कापूस, सोयाबीन व दादरीचे पीक पूर्ण वाया गेले आहे. चांगला हंगाम येईल अशी अपेक्षा होती, त्यामुळे घराचे बांधकाम काढले होते.मात्र, संपुर्ण हंगामच वाया गेल्याने व घराच्या बांधकामालाही खर्च लागल्याने यंदाची दिवाळी अंधारात गेल्याची दीपक पाटील सांगतात.आता रब्बीसाठी शेत तयार करायचे आणि पुन्हा निसर्गाने घात केला तर ..? अशी भिती मनात आहे. त्यामुळे रब्बीची लागवड करावी की नाही ? असा प्रश्न मनात येत असल्याचेही दीपक पाटील यांनी सांगितले. हेच चित्र खेडी, वडनगरी, फुपनगरी, कानळदा शिवारात देखील पहायला मिळाले. या पावसामुळे शेतकºयांचे पार होत्याचे नव्हते झाले आहे.उन्हाने केळी तर पावसाने कापूसही गेला1 आव्हाणे, खेडी शिवारात पाहणी असता आव्हाणे येथील दिलीप पंढरीनाथ चौधरी यांची ५ एकरवर लावण्यात आलेला कापूस पुर्णपणे खराब झाल्याचे दिसून आले. चौधरी यांनी नोव्हेंबर-डिसेंबर २०१८ मध्ये लागवड केलेली ६ एकरवरील केळीचे पीक जबरदस्त उन्हामुळे व ट्यूबवेल्स आटल्यामुळे संपुर्ण केळी उपटून फेकून द्यावी लागली होती. त्यानंतर ५ हेक्टरवर कापसाची तर एका हेक्टरवर उडीदची लागवड त्यांनी केली. उडीदाचे पीक बºयापैकी आले. मात्र, अवकाळी पावसामुळे कापसाचे पीक वाया गेले आहे.2 तालुक्यातील नंदगाव येथील चंद्रकांतजिजाबराव पाटील यांच्याकडे जेमतेत साडे तीन हेक्टर जमीन आहे. त्यातही ती जमीन संपूर्ण पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यावर्षी त्यांनी काही भागात सोयाबीन व ज्वारीची लागवड केली होती. मात्र, पीक वाया गेले असून, खरीप हंगामातून त्यांना एकाही रुपयाचा आर्थिक फायदा होणार नसून, बियाणे, मजुरीवर लावलेला खर्चही वाया गेला आहे.निसर्गाने साथ नाकारली, प्रशासनही ढूकंून पाहिनानिसर्गाने यंदा शेतकºयांची साथ नाकारली आहे. संपूर्र्ण पिकावर नांगर व ट्रॅक्टर चालविण्याची वेळ शेतकºयांवर आली असताना, प्रशासन देखील ढूंकून पहायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यातला त्यात मका, ज्वारी, दादर देखील वाया गेल्याने गुरांसाठी चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सहा महिन्यांपुर्वी ऊन व पाण्याचा अभावामुळे गुरं विक्री करण्याची वेळ आमच्यावर आली होती, आता चाºयाअभावी गुरं पाडायचे कसे असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाल्याची खंत शेतकºयांनी व्यक्त केली.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव