शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसाने सडून कपाशीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 16:01 IST

गेल्या १० दिवसांपासून सततच्या पावसाने उडीद, मूग, शेंगा सडून कपाशीची फुलपाती गळत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

ठळक मुद्देदहिगाव भागात शेतकरी चिंतातूरपिकांचे पंचनामे करण्याची मागणी

दहिगाव, ता.यावल, जि.जळगाव : येथे व परिसरासह तालुक्यात गेल्या १० दिवसांपासून सततच्या पावसाने उडीद, मूग, शेंगा सडून कपाशीची फुलपाती गळत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. या पिकांचे पंचनामे त्वरित करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.परिसरात गेल्या आठवड्यापासून सतत पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र जोरदार पावसाची अपेक्षाच आहे. परिसरातील नागादेवी तलाव, निंबादेवी धरण अद्यापही भरलेले नाही. त्यामुळे जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र रिपरिप पावसाने शेत शिवारातील कांदा पीक रोप, उडीद व मूग यांच्या शेंगा सडून त्यावर कोंब आलेले आहेत. त्यामुळे येणारे उत्पन्न पूर्णपणे हातून जाणार आहे.दरम्यान, कपाशीची फुलपातीही गळण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचा झालेला खर्च या उत्पन्नात निघणे अवघड आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी असून त्यात आणखी भर पडलेली आहे. कोरोनाच्या महामारीत सर्वच बाजारभाव महागले आहेत. त्यामुळे सर्वसाधारण शेतकरी व मजूर व्याकूळ झालेले आहेत. शासनाने या ठिकाणचे त्वरित पंचनामे करावे व शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

 

टॅग्स :RainपाऊसYawalयावल