शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

धरणाला मिळाले गौण खनिज अन् गावात होतोय पाझर तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 16:58 IST

खेडी बुद्रूक ग्रामस्थांचा उपक्रम : तीन हेक्टरमध्ये तलाव, टँंकरमुक्तीची आशा

कळमसरे, ता.अमळनेर : दुष्काळाची दाहकता व दिवसेंदिवस खालावत चाललेली पाणी पातळी यामुळे शेतीसाठी पाण्याचे विविध स्रोत आटले आहेत. या स्थितीत पुढील नियोजनाच्या दृष्टीने खेडी बद्रूक येथील ग्रामस्थांनी जलसिंचनाचा उपक्रम हाती घेतला आहे. निम्न तापी प्रकल्पांतर्गत पाडळसे धरणावरील माती बांधसाठी सुमारे तीन हेक्टर पडीक क्षेत्रातून गौण खनिज पुरवून, १५ फूट खोल, तीन हेक्टर लांब असा विशाल पाझर तलाव बांधण्याचे काम सुरू केले आहे.पाडळसे धरणाचे काम करणा-या ठेकेदाराने खेडी बद्रूक गावाआधी असलेल्या कळमसरे गावाच्या हरषा तलावाचे खोलीकरण करून माती बांधसाठी गौण खनिज घेण्याचे ठरविले होते. मात्र, काहींनी ठेकेदाराला मज्जाव केला. खेडी बद्रूक ग्रामस्थांनी ठेकेदाराशी तत्काळ संपर्क साधून गावालगतच्या पडीक तीन हेक्टर जमिनीतून गौण खनिज पुरविण्यास व त्या जागी पाझर तलाव करून देण्यास समंती दर्शविली. खेडीच्या ग्रामस्थांनी विधायक कामासाठी एकजूट होऊन, चालून आलेल्या संधीचे सोने करीत असल्याच्या प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहेत.या तलावाचे अत्याधुनिक पोकलँंड, जेसीबी मशिनद्वारे खोदकाम सुरू असून, ठेकेदार डंपरच्या सहाय्याने कळमसरे गावावरून पाडळसे धरणावर गौणखनिज वाहून नेत आहे.वासरे, खेडी व खर्दे या तीन गावांच्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच ज्योत्स्ना प्रमोद पाटील यांनी ग्रामसभा बोलवून धरण ठेकेदाराला खेडी शिवारातून गौण खनिज उचलण्याची सर्वसंमतीने परवानगी दिली. शिवाय वासरे शिवारात ठेकेदाराकरवी नाला खोलीकरणासंबंधीची कामे करवून घेतली. यंदा पावसाळ्यात पाण्याचा साठा होऊन त्याद्वारे परिसरातील शेतजमिनीला याचा फायदा होऊन टँंकरमुक्ती होऊ शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

या गावांना सिंचनाचा फायदातलावाचे काम पूर्ण झाल्यास वासरे व चौबारी गावांकडून वाहत येणारे दोन्ही नाले या तलावात अडविले जाऊन, मोठ्या प्रमाणात जलसाठा होईल. परिणामी खेडी, वासरे, खर्दे, गोवर्धन व कळमसरे या सीमेवरील गावांच्या बंद पडलेल्या विहिरींना पाणी येऊन सिंचनाचा लाभ होईल, असे जयवंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.