शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

दुष्काळी तालुक्यात सर्वेक्षणाच्या कार्यवाहीबाबत दुष्काळ देखरेख समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 12:16 IST

खान्देशातील २० तालुक्यांचा समावेश

ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यातील १३, धुळे ३ व नंदुरबार जिल्ह्यातील ४ तालुक्यांचा समावेश प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू

जळगाव : राज्य शासनाने दुष्काळासाठी तयार केलेल्या पद्धतीच्या निकषात खान्देशातील २० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या तालुक्यांमधील गावात पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षणाची कार्यवाही तत्काळ करण्याबाबत राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीचे सदस्य सचिव तथा संचालकांनी (विस्तार व प्रशिक्षण) तीनही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांना १२ रोजी पत्र दिले आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १३ तालुके, धुळे जिल्ह्यातील ३ व नंदुरबार जिल्ह्यातील ३ तालुके गंभीर दुष्काळाच्या तर नंदुरबार जिल्ह्यातील एक तालुका मध्यम स्वरुपाच्या दुष्काळाच्या निकषात पात्र ठरला आहे.खान्देशात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना केंद्र शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्य शासनाने पद्धती तयार केली असल्याने त्याअनुषंगानेच निकष लावून दुष्काळ घोषीत करण्यात येणार आहे. या निकषासाठी वनस्पती निर्देशांक, जलनिर्देशांक, पेरणीक्षेत्र आदी निकषांपैकी किमान तीन निकषांमध्ये पात्र ठरलेल्या तालुक्यांना पात्र धरण्यात आले आहे.जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, रावेर, यावल तर धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, शिंदखेडा व नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा या तालुक्यांचा गंभीर स्वरुपाच्या दुष्काळ असलेल्या तालुक्यांमध्ये समावेश असून नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा या तालुक्याचा मध्यम स्वरुपाच्या दुष्काळी तालुक्यात समावेश करण्यात आला आहे.खान्देशातील या २०ही तालुक्यांमधील गावात पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षणाची कार्यवाही तत्काळ करण्याबाबत राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीचे सदस्य सचिव तथा संचालकांनी (विस्तार व प्रशिक्षण) तीनही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिका-यांना पत्र दिले आहे.दरम्यान, या संदर्भात १२ आॅक्टोबरपासूनच १० टक्के गावांमध्ये प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन माहिती भरण्याची (सत्यमापन) प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी ११ रोजी बैठकीत दिले होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalgaonजळगाव