शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

गिरणा धरणातील आवर्तनाचे पाणी पोहचल्याने दहिगाव बंधारा ‘ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:06 IST

गिरणा धरणातील आवर्तनाचे सोडलेले पाणी दहिगाव बंधाऱ्यात रविवारी पहाटे पोहचल्यानंतर हा बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे गिरणा नदीच्या काठावरील अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देदोन ते तीन महिन्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला गिरणा काठावरील गावांमध्ये समाधान

एरंडोल : गिरणा धरणातून ५ नोव्हेंबर रोजी सोडलेले पाणी जामदा बंधारा, भडगाव बंधारा, पाचोरा व गिरड बंधारा आणि उत्राण येथील बंधारा भरल्यानंतर रविवार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता दहिगाव बंधारा येथे पोहचले. साधारणपणे १२ ते १५ तास हा बंधारा भरायला लागून पहाटे दोन ते तीन वाजेपर्यंत दहिगाव बंधारा ओव्हरफ्लो झाला. सदरचे पाणी गिरणा नदीद्वारे म्हसावद तलाव, लमांजन तलाव, दापोरा तलाव भरून कानळदा गावापर्यंत देण्याचे नियोजन गिरणा पाटबंधारे यंत्रणेचे आहे. पाच ते सात दिवसात सदरचे पाणी कानळदा पर्यंत पोहोचणे अपेक्षीत आहे.या आवर्तनामुळे गिरणेच्या काठावरील व परिसरातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, जळगाव, धरणगाव या तालुक्यामधील सुमारे १० ते १२ लाखाच्यावर लोकसंख्येचा दोन ते तीन महिन्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी दिलेल्या मंजुरीनुसार सदर बिगर सिंचनाचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. गिरणा धरणापासून सुमारे १७० कि.मी.पर्यंत पाणी पोहचणे अपेक्षीत आहे. या आवर्तनाचा कालावधी १० ते १५ दिवसांचा आहे.दहिगाव ४३ दलघफू, लमांजन ४० दलघफू, म्हसावद १५ दलघफू, दापोरा २५ दलघफू, याप्रमाणे या बंधाºयामध्ये पाणी साठविले जाणार असल्याची माहिती विभागाचे उपविभागीय अधिकारी मकरंद अत्तरदे यांनी ‘लोकमत’ला दिली .पाणी चोरी रोखण्यासाठी उपाययोजनापाण्याचा अवैध वापर किंवा पाणीचोरी होवू नये म्हणून स्थानिक व विभागीय स्तरावर दक्षता पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पाटबंधारे यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी हे देखील कार्यरत आहेत. याशिवाय गिरणा नदीकाठावरील गावांचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, विद्युत मंडळ प्रशासन इत्यादींना अवगत करून पाण्याचा दुरुपयोग होणार नाही याबाबत दक्षता घेतली जात आहे.

टॅग्स :Waterपाणी