शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

गिरणा धरणातील आवर्तनाचे पाणी पोहचल्याने दहिगाव बंधारा ‘ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:06 IST

गिरणा धरणातील आवर्तनाचे सोडलेले पाणी दहिगाव बंधाऱ्यात रविवारी पहाटे पोहचल्यानंतर हा बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे गिरणा नदीच्या काठावरील अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देदोन ते तीन महिन्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला गिरणा काठावरील गावांमध्ये समाधान

एरंडोल : गिरणा धरणातून ५ नोव्हेंबर रोजी सोडलेले पाणी जामदा बंधारा, भडगाव बंधारा, पाचोरा व गिरड बंधारा आणि उत्राण येथील बंधारा भरल्यानंतर रविवार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता दहिगाव बंधारा येथे पोहचले. साधारणपणे १२ ते १५ तास हा बंधारा भरायला लागून पहाटे दोन ते तीन वाजेपर्यंत दहिगाव बंधारा ओव्हरफ्लो झाला. सदरचे पाणी गिरणा नदीद्वारे म्हसावद तलाव, लमांजन तलाव, दापोरा तलाव भरून कानळदा गावापर्यंत देण्याचे नियोजन गिरणा पाटबंधारे यंत्रणेचे आहे. पाच ते सात दिवसात सदरचे पाणी कानळदा पर्यंत पोहोचणे अपेक्षीत आहे.या आवर्तनामुळे गिरणेच्या काठावरील व परिसरातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, जळगाव, धरणगाव या तालुक्यामधील सुमारे १० ते १२ लाखाच्यावर लोकसंख्येचा दोन ते तीन महिन्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी दिलेल्या मंजुरीनुसार सदर बिगर सिंचनाचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. गिरणा धरणापासून सुमारे १७० कि.मी.पर्यंत पाणी पोहचणे अपेक्षीत आहे. या आवर्तनाचा कालावधी १० ते १५ दिवसांचा आहे.दहिगाव ४३ दलघफू, लमांजन ४० दलघफू, म्हसावद १५ दलघफू, दापोरा २५ दलघफू, याप्रमाणे या बंधाºयामध्ये पाणी साठविले जाणार असल्याची माहिती विभागाचे उपविभागीय अधिकारी मकरंद अत्तरदे यांनी ‘लोकमत’ला दिली .पाणी चोरी रोखण्यासाठी उपाययोजनापाण्याचा अवैध वापर किंवा पाणीचोरी होवू नये म्हणून स्थानिक व विभागीय स्तरावर दक्षता पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पाटबंधारे यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी हे देखील कार्यरत आहेत. याशिवाय गिरणा नदीकाठावरील गावांचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, विद्युत मंडळ प्रशासन इत्यादींना अवगत करून पाण्याचा दुरुपयोग होणार नाही याबाबत दक्षता घेतली जात आहे.

टॅग्स :Waterपाणी