शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

दहिगाव, म्हसावद बंधारा ओव्हर फ्लो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 14:59 IST

गिरणेचे पहिले आवर्तन आज कानळद्यात पोहोचणार.

कुंदन पाटील, जळगाव : यंदा पिण्यासाठी गिरणा धरणाचे चार आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार पहिले आवर्तन सोडल्यानंतर जामदा, म्हसावद बंधाऱ्यात आवर्तनाच्या पाणी अनुक्रमे रविवारी सायंकाळी व सोमवारी सकाळी पोहोचले. मंगळवारी आवर्तनाचे पाणी कानळद्यापर्यंत पोहोचेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पहिल्या आवर्तनात १५०० क्यूसेस पाणी सोडण्यात आले आहेत. गुरुवारी आवर्तन सोडल्यानंतर जामदा कालव्यात पाणी पोहोचले. हा कालवा भरुन झाल्यावर पाण्याचा प्रवाह एरंडोल तालुक्यात रविवारी पोहोचले. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता दहिगाव बंधारा पूर्णत: भरला. त्यामुळे ओव्हरफ्लो झालेल्या पाण्याचा प्रवाह सोमवारी सकाळी म्हसावद बंधाऱ्यात पोहोचले. सकाळी साडेदहा वाजता हा बंधारादेखील तुडुंब भरला. त्यानंतर बांभोरीच्या दिशेने पाण्याचा प्रवाह यायला सुरुवात झाली आहे. कांताई बंधारा भरल्यानंतर पाण्याचा प्रवाह कानळद्याच्यादिशेने आगेकूच करणार आहे.

वाळूमाफियांचे खड्डे अडचणीचे

अवैधरित्यात वाळूचा उपसा करणाऱ्या माफियांमुळे गिरणा नदी पात्रात भलेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह या खड्ड्यांना भरल्यानंतर पुढे जात आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत कानळद्यात पोहोचणारे पाणी मंगळवारी दुपारनंतर पोहोचणार आहे. तसेच या खड्ड्यांमुळे गिरणा नदी पात्रात पाणीही तुंबून राहणार  आहे.

पिण्यासाठी सोडलेल्या आवर्तनामुळे ११८ गावांची सोय होणार आहे. या पाण्याचा सिंचनासाठी वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गिरणाकाठी यंत्रणा लक्ष ठेवून आहे.-देवेंद्र अग्रवाल, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग.

टॅग्स :Jalgaonजळगाव