शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

सायकलवीरांनी २४ तासात ४०० किमी अंतर पार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 23:01 IST

चाळीसगावच्या टोनी पंजाबी, रवींद्र पाटील आणि अरुण महाजन या तिघा सायकलवीरांनी २४ तासातच ४०० किमी अंतर पार केले.

ठळक मुद्देचाळीसगावच्या तिघांनी कडाक्याच्या थंडीत साध्य केले लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : हाडं गोठवणाऱ्या गारठ्यात तिघांनी पहाटे ६ वाजता औरंगाबादच्या क्रांती चौकातून देवघाटकडे जाण्यासाठी सायकलींना पायडल मारले. पुढे २४ तास त्यांच्या सायकलीचे चाक फिरतच होते. लक्ष्य होते २७ तासांचे. मात्र चाळीसगावच्या टोनी पंजाबी, रवींद्र पाटील आणि अरुण महाजन या तिघा सायकलवीरांनी २४ तासातच ४०० किमी अंतर पार करून बीआरएम स्पर्धेत आपल्या यशाची लखलखीत मुद्रा कोरली. ४५ वर्षीय टोनी खैरातीलाल पंजाबी, ५९ वर्षीय रवींद्र पाटील आणि ४२ वर्षीय अरुण हिरामण महाजन हे तिघे हौशी सायकलिस्ट. दरदिवशी पहाटे उठून सायकलफेरी आवर्जून करतातच. हौशेला स्पर्धेचा आयामही त्यांनी दिला आहे. शनिवारी त्यांनी जगप्रसिद्ध एडॉक्स सायकल ग्रुपतर्फे आयोजित ४०० किमी सायकलिंग स्पर्धेत सहभाग घेऊन लक्ष्य साध्य केले. या तिघांवरही काैतुकाचा वर्षाव होत आहे.

टार्गेट ६०० किमीचे, १३ला सायकली धावणार

१३ रोजी ६०० किमी अंतराची स्पर्धा होत असून यासाठी ४० तासांचा अवधी ठेवण्यात आला आहे. तिघेही सायकलवीर सध्या यासाठी कसून सराव करीत आहे. धुळे ते टिकरी (मध्य प्रदेश) पुन्हा धुळे येथे येऊन नाशिकला जायचे. पुन्हा तेथून धुळे येथे परत यायचे, असे स्पर्धेचे टार्गेट आहे. 

औरंगाबाद-देवघट ते मांजरसुंभा परत औरंगाबाद

शनिवारी कडाक्याच्या थंडीत स्पर्धेतील सायकलवीरांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली. औरंगाबादहून देवघट ते मांजरसुंभा आणि परत औरंगाबाद, असे एकूण ४०० किमीचे अंतर २७ तासात पार करावयाचे होते. चाळीसगावच्या या तिघा सायकलवीरांनी हे अंतर २४ तासातच पूर्ण केले. यात पूर्ण रात्रीची १२ तासही त्यांची सायकल स्पर्धेच्या अंतिम लक्ष्यापर्यंत झेपावत होती. थंडीच्या गारठ्याचे कडे भेदत त्यांचे प्रत्येक पायडल कसोटी पाहणारे ठरले. मात्र तिघांची जिद्द सायकलच्या चाकाप्रमाणेच न थांबता फिरत राहिली. रविवारी पहाटे ६ वाजता त्यांनी पुन्हा क्रांती चौक गाठला. त्यावेळी तिघांच्या नावापुढे यशाची पताका रोवली गेली होती. 

२०० व ३०० किमी स्पर्धेतही यशाचे तोरण

टोनी पंजाबी, रवींद्र पाटील, अरुण महाजन हे दरदिवशी ५० किमी सायकल चालवतात. ४०० किमी स्पर्धेच्या आधीदेखील २०० किमीच्या धुळे ते मालेगाव आणि धुळे ते शिरपूर हे लक्ष्य त्यांनी साडेनऊ तासात गाठले. यासाठी साडेतेरा तासांंचा अवधी निर्धारीत केला होता.

यशाचे तोरण 

धुळे ते नाशिक आणि नाशिक ते धुळे हे ३०० किमी अंतर १५ तासात पार करून या स्पर्धेतही तिघांनी यशाचे तोरण बांधले. टोनी पंजाबी हे व्यवसाय करतात. रवींद्र पाटील हे स्टेट बँकेच्या कृषी शाखेत गाडी चालक असून अरुण महाजन पिलखोड येथील पेट्रोलपंपावर व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. 

सायकलफेरी पर्यावरणस्नेही आहे. नियमित सायकल चालविल्याने शरीर बळकट होते. इम्युनिटी वाढते. गुडघ्यांचेही आजार उद‌्भवत नाही. शरीराचे मसल्स बिल्ड होतात. दिवसभर प्रसन्न वाटते. नियमित सायकल चालविण्याचे असे अनेक फायदे आहेत.- टोनी पंजाबी, रवींद्र पाटील, अरुण महाजनसायकलवीर, चाळीसगाव

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावCyclingसायकलिंग