शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

सायकलवीरांनी २४ तासात ४०० किमी अंतर पार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 23:01 IST

चाळीसगावच्या टोनी पंजाबी, रवींद्र पाटील आणि अरुण महाजन या तिघा सायकलवीरांनी २४ तासातच ४०० किमी अंतर पार केले.

ठळक मुद्देचाळीसगावच्या तिघांनी कडाक्याच्या थंडीत साध्य केले लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : हाडं गोठवणाऱ्या गारठ्यात तिघांनी पहाटे ६ वाजता औरंगाबादच्या क्रांती चौकातून देवघाटकडे जाण्यासाठी सायकलींना पायडल मारले. पुढे २४ तास त्यांच्या सायकलीचे चाक फिरतच होते. लक्ष्य होते २७ तासांचे. मात्र चाळीसगावच्या टोनी पंजाबी, रवींद्र पाटील आणि अरुण महाजन या तिघा सायकलवीरांनी २४ तासातच ४०० किमी अंतर पार करून बीआरएम स्पर्धेत आपल्या यशाची लखलखीत मुद्रा कोरली. ४५ वर्षीय टोनी खैरातीलाल पंजाबी, ५९ वर्षीय रवींद्र पाटील आणि ४२ वर्षीय अरुण हिरामण महाजन हे तिघे हौशी सायकलिस्ट. दरदिवशी पहाटे उठून सायकलफेरी आवर्जून करतातच. हौशेला स्पर्धेचा आयामही त्यांनी दिला आहे. शनिवारी त्यांनी जगप्रसिद्ध एडॉक्स सायकल ग्रुपतर्फे आयोजित ४०० किमी सायकलिंग स्पर्धेत सहभाग घेऊन लक्ष्य साध्य केले. या तिघांवरही काैतुकाचा वर्षाव होत आहे.

टार्गेट ६०० किमीचे, १३ला सायकली धावणार

१३ रोजी ६०० किमी अंतराची स्पर्धा होत असून यासाठी ४० तासांचा अवधी ठेवण्यात आला आहे. तिघेही सायकलवीर सध्या यासाठी कसून सराव करीत आहे. धुळे ते टिकरी (मध्य प्रदेश) पुन्हा धुळे येथे येऊन नाशिकला जायचे. पुन्हा तेथून धुळे येथे परत यायचे, असे स्पर्धेचे टार्गेट आहे. 

औरंगाबाद-देवघट ते मांजरसुंभा परत औरंगाबाद

शनिवारी कडाक्याच्या थंडीत स्पर्धेतील सायकलवीरांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली. औरंगाबादहून देवघट ते मांजरसुंभा आणि परत औरंगाबाद, असे एकूण ४०० किमीचे अंतर २७ तासात पार करावयाचे होते. चाळीसगावच्या या तिघा सायकलवीरांनी हे अंतर २४ तासातच पूर्ण केले. यात पूर्ण रात्रीची १२ तासही त्यांची सायकल स्पर्धेच्या अंतिम लक्ष्यापर्यंत झेपावत होती. थंडीच्या गारठ्याचे कडे भेदत त्यांचे प्रत्येक पायडल कसोटी पाहणारे ठरले. मात्र तिघांची जिद्द सायकलच्या चाकाप्रमाणेच न थांबता फिरत राहिली. रविवारी पहाटे ६ वाजता त्यांनी पुन्हा क्रांती चौक गाठला. त्यावेळी तिघांच्या नावापुढे यशाची पताका रोवली गेली होती. 

२०० व ३०० किमी स्पर्धेतही यशाचे तोरण

टोनी पंजाबी, रवींद्र पाटील, अरुण महाजन हे दरदिवशी ५० किमी सायकल चालवतात. ४०० किमी स्पर्धेच्या आधीदेखील २०० किमीच्या धुळे ते मालेगाव आणि धुळे ते शिरपूर हे लक्ष्य त्यांनी साडेनऊ तासात गाठले. यासाठी साडेतेरा तासांंचा अवधी निर्धारीत केला होता.

यशाचे तोरण 

धुळे ते नाशिक आणि नाशिक ते धुळे हे ३०० किमी अंतर १५ तासात पार करून या स्पर्धेतही तिघांनी यशाचे तोरण बांधले. टोनी पंजाबी हे व्यवसाय करतात. रवींद्र पाटील हे स्टेट बँकेच्या कृषी शाखेत गाडी चालक असून अरुण महाजन पिलखोड येथील पेट्रोलपंपावर व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. 

सायकलफेरी पर्यावरणस्नेही आहे. नियमित सायकल चालविल्याने शरीर बळकट होते. इम्युनिटी वाढते. गुडघ्यांचेही आजार उद‌्भवत नाही. शरीराचे मसल्स बिल्ड होतात. दिवसभर प्रसन्न वाटते. नियमित सायकल चालविण्याचे असे अनेक फायदे आहेत.- टोनी पंजाबी, रवींद्र पाटील, अरुण महाजनसायकलवीर, चाळीसगाव

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावCyclingसायकलिंग