शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

सायकलवीरांनी २४ तासात ४०० किमी अंतर पार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 23:01 IST

चाळीसगावच्या टोनी पंजाबी, रवींद्र पाटील आणि अरुण महाजन या तिघा सायकलवीरांनी २४ तासातच ४०० किमी अंतर पार केले.

ठळक मुद्देचाळीसगावच्या तिघांनी कडाक्याच्या थंडीत साध्य केले लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : हाडं गोठवणाऱ्या गारठ्यात तिघांनी पहाटे ६ वाजता औरंगाबादच्या क्रांती चौकातून देवघाटकडे जाण्यासाठी सायकलींना पायडल मारले. पुढे २४ तास त्यांच्या सायकलीचे चाक फिरतच होते. लक्ष्य होते २७ तासांचे. मात्र चाळीसगावच्या टोनी पंजाबी, रवींद्र पाटील आणि अरुण महाजन या तिघा सायकलवीरांनी २४ तासातच ४०० किमी अंतर पार करून बीआरएम स्पर्धेत आपल्या यशाची लखलखीत मुद्रा कोरली. ४५ वर्षीय टोनी खैरातीलाल पंजाबी, ५९ वर्षीय रवींद्र पाटील आणि ४२ वर्षीय अरुण हिरामण महाजन हे तिघे हौशी सायकलिस्ट. दरदिवशी पहाटे उठून सायकलफेरी आवर्जून करतातच. हौशेला स्पर्धेचा आयामही त्यांनी दिला आहे. शनिवारी त्यांनी जगप्रसिद्ध एडॉक्स सायकल ग्रुपतर्फे आयोजित ४०० किमी सायकलिंग स्पर्धेत सहभाग घेऊन लक्ष्य साध्य केले. या तिघांवरही काैतुकाचा वर्षाव होत आहे.

टार्गेट ६०० किमीचे, १३ला सायकली धावणार

१३ रोजी ६०० किमी अंतराची स्पर्धा होत असून यासाठी ४० तासांचा अवधी ठेवण्यात आला आहे. तिघेही सायकलवीर सध्या यासाठी कसून सराव करीत आहे. धुळे ते टिकरी (मध्य प्रदेश) पुन्हा धुळे येथे येऊन नाशिकला जायचे. पुन्हा तेथून धुळे येथे परत यायचे, असे स्पर्धेचे टार्गेट आहे. 

औरंगाबाद-देवघट ते मांजरसुंभा परत औरंगाबाद

शनिवारी कडाक्याच्या थंडीत स्पर्धेतील सायकलवीरांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली. औरंगाबादहून देवघट ते मांजरसुंभा आणि परत औरंगाबाद, असे एकूण ४०० किमीचे अंतर २७ तासात पार करावयाचे होते. चाळीसगावच्या या तिघा सायकलवीरांनी हे अंतर २४ तासातच पूर्ण केले. यात पूर्ण रात्रीची १२ तासही त्यांची सायकल स्पर्धेच्या अंतिम लक्ष्यापर्यंत झेपावत होती. थंडीच्या गारठ्याचे कडे भेदत त्यांचे प्रत्येक पायडल कसोटी पाहणारे ठरले. मात्र तिघांची जिद्द सायकलच्या चाकाप्रमाणेच न थांबता फिरत राहिली. रविवारी पहाटे ६ वाजता त्यांनी पुन्हा क्रांती चौक गाठला. त्यावेळी तिघांच्या नावापुढे यशाची पताका रोवली गेली होती. 

२०० व ३०० किमी स्पर्धेतही यशाचे तोरण

टोनी पंजाबी, रवींद्र पाटील, अरुण महाजन हे दरदिवशी ५० किमी सायकल चालवतात. ४०० किमी स्पर्धेच्या आधीदेखील २०० किमीच्या धुळे ते मालेगाव आणि धुळे ते शिरपूर हे लक्ष्य त्यांनी साडेनऊ तासात गाठले. यासाठी साडेतेरा तासांंचा अवधी निर्धारीत केला होता.

यशाचे तोरण 

धुळे ते नाशिक आणि नाशिक ते धुळे हे ३०० किमी अंतर १५ तासात पार करून या स्पर्धेतही तिघांनी यशाचे तोरण बांधले. टोनी पंजाबी हे व्यवसाय करतात. रवींद्र पाटील हे स्टेट बँकेच्या कृषी शाखेत गाडी चालक असून अरुण महाजन पिलखोड येथील पेट्रोलपंपावर व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. 

सायकलफेरी पर्यावरणस्नेही आहे. नियमित सायकल चालविल्याने शरीर बळकट होते. इम्युनिटी वाढते. गुडघ्यांचेही आजार उद‌्भवत नाही. शरीराचे मसल्स बिल्ड होतात. दिवसभर प्रसन्न वाटते. नियमित सायकल चालविण्याचे असे अनेक फायदे आहेत.- टोनी पंजाबी, रवींद्र पाटील, अरुण महाजनसायकलवीर, चाळीसगाव

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावCyclingसायकलिंग