शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्ह्यात १ मे पर्यंत संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदीचे आदेश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने देखील संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदीचे आदेश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने देखील संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र या काळात आवश्यक वैद्यकीय सेवा, किराणा दुकाने, भाजी विक्री, फळे विक्री डेअरी सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक प्रवासी वाहतूक देखील सुरू राहणार आहे.

सर्व कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना घरूनच काम द्यावे, तसेच त्यातून शासकीय कार्यालये, बँका, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, विमा आणि मेडिक्लेम कंपन्या, औषध वितरणाशी संबधित कार्यालये, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स, सर्व न्यायालये, लवाद, चौकशी समिती कार्यालये, तर वकिलांचे कार्यालय, सुरू राहू शकतात. हॉटेल्स होम डिलिव्हरी करु शकतात. तसेच कोविड नियमावलीचे पालन न केल्यास एक हजार रुपयांचा दंड करण्याचे आदेशात म्हटले आहे.

उद्योगांवर देखील बंधने

अत्यावश्यक सेवेशी संबंधित निर्मिती करणारे उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. ज्यावर निर्यातीचे बंधन आहे. अशा अस्थापना सुरू राहतील. पण त्यांना निर्यातीचे बंधन सिद्ध करावे लागेल. तसेच ज्या युनिटमध्ये उत्पादन प्रक्रिया अचानक थांबवता येत नाही असे कारखाने ५० टक्के कामगार क्षमतेने सुरू राहतील. या आदेशात सूट दिलेल्या कारखान्यांशिवाय इतरांनी या १ मे पर्यंत कारखाने बंद ठेवावे.

शाळा महाविद्यालये बंद, दहावी,बारावीच्या परीक्षेला सूट

जिल्ह्यात सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद असतील. तर दहावी आणि बारावीच्या परीक्षेला यातून सूट देण्यात आली आहे. तसेच राज्याबाहेर घेण्यात येणाऱ्या परीक्षांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधीत विभागाला सूचना देऊन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.