शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पूर्वजांच्या आत्मा तृप्तीसाठी पितृपक्षात कावळे मिळतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : पितृपक्षाला सुरुवात झाली आहे आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून कावळ्यांना घास घालण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : पितृपक्षाला सुरुवात झाली आहे आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून कावळ्यांना घास घालण्याची प्रथा आहे. मात्र, निसर्गातील बदलामुळे कावळे दुर्मीळ झाले आहेत. अशा स्थितीत वर्णेश्वर मंदिराचे विश्वस्त व माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांनी पितृपक्षात कावळे मिळतील, असे आवाहन सोशल मीडियावर केले आहे.

पितृपक्ष सुरू झाला आहे. आता प्रत्येक घरामध्ये आपल्या पितरांना गोडधोड खाऊ घालण्याची परंपरा आहे. कावळ्यांना घास घातला म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि घरात कोणतेही संकट येत नाही, पूर्वजांची अवकृपा होत नाही. मात्र, त्यासाठी कावळे आवश्यक आहेत. सध्या शहरीकरण, यांत्रिकीकरण आणि रासायनिक जग यामुळे दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या दुर्मीळ होत चालली आहे. त्यात कावळे तर दिसेनासे झाले आहेत; परंतु वर्णेश्वर महादेव मंदिर परिसर व अंबऋषी टेकडी परिसरात पक्षीमित्र सुनील भोई, संजय शुक्ला, लोटन पाटील, महेश कोठावदे, संतोष पाटील यांनी अनेक कावळे व पक्षी पाळून ठेवलेले आहेत. नागरिकांनी चिंता करू नये, आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी आता वर्णेश्वर मंदिर व अंबर्शी टेकडी परिसरात काक घास आणावा, असे आवाहन मंदिराचे सुभाष चौधरी यांनी केले आहे. पर्यावरण संवर्धन साधणाऱ्या या आगळ्यावेगळ्या जनसेवेची चर्चा होत आहे.