शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

उमाळे, धानवड शिवारात पिके गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 12:44 IST

जळगाव : शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील उमाळे व धानवड शिवारात शेतातील पिके वाहून जाण्यासह विजेचे खांब उन्मळून ...

जळगाव : शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील उमाळे व धानवड शिवारात शेतातील पिके वाहून जाण्यासह विजेचे खांब उन्मळून पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतांमध्ये पंचनामे सुरू झाले आहे. कानळदा येथेही विजेच्या धक्क्याने गाय मृत्यूमुखी पडली. जामनेर (८३.५ मि.मी.) व चाळीसगाव (७०.१ मि.मी.) येथे अतिवृष्टी झाली.गेल्या ११ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे शनिवारी रात्री जोरदार पुनरागमन झाले. मध्यरात्री एक वाजेपासून पावसाचा जोर वाढून पहाटेपर्यंत झालेल्या दमदार पावसाने उमाळे व धानवड परिसरात शेतात पाणी शिरले. त्यामुळे शेतातील कपाशी व इथर पिके वाहून गेली. अनेक ठिकाणी शेतातील मातीही वाहून गेली असून दगड-गोटेच शिल्लक आहे.गाय मृत्यूमुखीकानळदा येथे शेतात विजेच्या धक्क्याने एक गाय मृत्यूमुखी पडली. विजेच्या खांबाचा स्पर्श होऊन गायीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.पंचनामे सुरूझालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून तलाठी, कृषी सहायक शेतांमध्ये पोहचले.सुभाषवाडीत वीज पडून बैल जोडी ठारजळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथे २० रोजी रात्री झालेल्या पावसात वीज पडून बैलजोडी ठार झाली. प्रकाश पन्नालाल राठोड यांच्या खळ्यात ही घटना घडली.दरम्यान, नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार वैशाली हिंगे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.बळीराजावर पुन्हा संकटजून महिन्यात उशिरा आलेल्या पावसामुळे लागवड लांबली. कशीबशी लागवड झाली व आहे त्या पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाऊस झाला व पेरण्या वाढल्या. मात्र मध्येच पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल झाला. त्यानंतर शनिवारी रात्री पाऊस आल्याने पुन्हा आशा पल्लवित झाल्या. मात्र जोरदार पावसाने उमाळे, धानवड शिवारातील शेतांमध्ये होत्याचे नव्हते केल्याने बळीराजावर पुन्हा संकट ओढावले आहे.विजेचा खांब कोसळलाशेतात पाणी शिरुन माती वाहून गेल्याने विजेचा खांबही उन्मळून पडला. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठाही खंडीत झाला होता. सुदैवाने विजेचा खांब कोसळला त्या वेळी शेतात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. 

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव