शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारच्या निकषांचा लाभ पीक विमा कंपन्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:17 IST

जळगाव : पीक विमा ही महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने लागू केली होती. त्या योजनेत निकष बदलल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना ...

जळगाव : पीक विमा ही महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने लागू केली होती. त्या योजनेत निकष बदलल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्याऐवजी पीक विमा कंपन्यांनाच होत होता; मात्र त्याचा शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारकडे बोट दाखवले, असा आरोप भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केला, तसेच केंद्र सरकारच्या योजनेचा फायदा हा थेट शेतकऱ्यांना होत असल्याचेही ते म्हणाले.

भाजपाच्या किसान मोर्चाच्या शेतकरी संवाद अभियानाला सुरुवात बुधवारपासून करण्यात आली आहे. त्यावेळी भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलताना काळे म्हणाले की, केंद्र सरकारने गेल्या सात वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठीचे धोरण बदलले आहे. त्याचा फायदा नेमका काय झाला आहे, त्याची माहिती देण्यासाठी हे संवाद अभियान सुरू करण्यात आले आहे. यात भाजपा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांना माहिती देणार आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी कायद्यानुसार एपीएमसी मोडीत निघणार नाही, तसेच करार पद्धतीचा फायदाच शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळावी, यासाठीच हे कायदे आहेत.

काळे पुढे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीचे धोरण हे शेतकरी विरोधी आहे. याच सरकारने पीक विम्याचे निकष बदलले होते; मात्र शेतकऱ्यांच्या विरोधानंतर हे निकष राज्य सरकारलाच बदलावे लागले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ८५ लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा मिळाला होता, असेही त्यांनी सांगितले.

किसान मोर्चाच्या पुस्तिकेचे प्रकाशन

राज्यव्यापी शेतकरी संवाद अभियानाच्या पुस्तिकेचे यावेळी वासुदेव काळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत केंद्र सरकारने राबवलेल्या शेतकरीविषयक धोरणांची माहिती दिली आहे.

या पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील, सुरेश धनके, पोपट भोळे, भाजपाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी उपस्थित होते.