शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

राज्य सरकारच्या निकषांचा लाभ पीक विमा कंपन्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:17 IST

जळगाव : पीक विमा ही महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने लागू केली होती. त्या योजनेत निकष बदलल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना ...

जळगाव : पीक विमा ही महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने लागू केली होती. त्या योजनेत निकष बदलल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्याऐवजी पीक विमा कंपन्यांनाच होत होता; मात्र त्याचा शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारकडे बोट दाखवले, असा आरोप भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केला, तसेच केंद्र सरकारच्या योजनेचा फायदा हा थेट शेतकऱ्यांना होत असल्याचेही ते म्हणाले.

भाजपाच्या किसान मोर्चाच्या शेतकरी संवाद अभियानाला सुरुवात बुधवारपासून करण्यात आली आहे. त्यावेळी भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलताना काळे म्हणाले की, केंद्र सरकारने गेल्या सात वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठीचे धोरण बदलले आहे. त्याचा फायदा नेमका काय झाला आहे, त्याची माहिती देण्यासाठी हे संवाद अभियान सुरू करण्यात आले आहे. यात भाजपा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांना माहिती देणार आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी कायद्यानुसार एपीएमसी मोडीत निघणार नाही, तसेच करार पद्धतीचा फायदाच शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळावी, यासाठीच हे कायदे आहेत.

काळे पुढे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीचे धोरण हे शेतकरी विरोधी आहे. याच सरकारने पीक विम्याचे निकष बदलले होते; मात्र शेतकऱ्यांच्या विरोधानंतर हे निकष राज्य सरकारलाच बदलावे लागले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ८५ लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा मिळाला होता, असेही त्यांनी सांगितले.

किसान मोर्चाच्या पुस्तिकेचे प्रकाशन

राज्यव्यापी शेतकरी संवाद अभियानाच्या पुस्तिकेचे यावेळी वासुदेव काळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत केंद्र सरकारने राबवलेल्या शेतकरीविषयक धोरणांची माहिती दिली आहे.

या पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील, सुरेश धनके, पोपट भोळे, भाजपाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी उपस्थित होते.