शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

घरकुल अडकले आॅनलाइनच्या लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 00:47 IST

दोन वर्षांपासून मंजूर होऊनही प्रतीक्षाच : अखेर अमळनेर पंचायत समितीसमोर उपोषण

ठळक मुद्दे विशेष म्हणजे यात अमळनेर पंचायत समितीच्या सभापती वजाबाई भिल यांचे जवखेडा येथील जावई आणि मुलीचेदेखील घरकुल आहे. या सर्व लाभार्थिंना न्याय मिळण्यासाठी त्यांनीही फेब्रुवारी २०१८ मध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्र दिले आहे, परंतु अजूनही अशा परिस्थितीत सर्व लाभार्थी असलेले आदिवासी बांधव एकलव्य आदिवासी क्रांती दलाच्या माध्यमातून १६ जुलैपासून अमळनेर पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषणास बसणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी व लोकप्रतिनिधी

अमळनेर, जि.जळगाव : अमळनेर तालुक्यात २०१५-१६ या वर्षापासून शबरी आवास योजनेंतर्गत मंजूर झालेले २० गोरगरीब आदिवासी बांधवांचे घरकुल गेल्या दोन वर्षांपासून आॅनलाइनच्या लालफितीत अडकले आहेत. पंचायत समितीसह संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी करून आदिवासी बांधवाना घरकुलापासून वंचित ठेवल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहे. याप्रश्नी संबधित लाभार्थिंनी १६ जुलैपासून पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहेआदिवासी विकास विभागाने २०१५-१६ साली घरकुलाची ही योजना राबवली. जिल्हा प्रकल्प अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करत गटविकास अधिकाºयांमार्फत घरकुले देण्यात आली. यातून अमळनेर तालुक्यातील अनेक लाभार्थिंना घरकुले मंजूर होऊन प्रत्यक्ष लाभदेखील मिळाला. परंतु २० लाभार्थी यातून वंचित राहिले. प्रत्यक्षात घरकुल आॅनलाइन प्रणालीत अडकले. संबंधित २० लाभार्थिच्या बँक खात्यांची पडताळणी होऊनही आजपर्यंत त्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. संबंधित लाभार्थिंनी अनेकदा गटविकास अधिकाºयांना विचारणा केली. यावर त्यांनी जिल्हा प्रकल्प अधिकाºयांकडे बोट दाखविले, तर प्रकल्प अधिकारी आजपर्यंत आॅनलाइनची अडचण सांगून फिरवाफिरव करीत आहेत. लोकप्रतिनिधीदेखील या प्रश्नी न्याय मिळवून देऊ शकले नाही. जि.प. सदस्या जयश्री अनिल पाटील यांनी मध्यंतरी याचा जाब प्रकल्प अधिकाºयांना विचारला होता. त्यांनी लवकरच हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले, परंतु आजपर्र्यंत लाभ मिळाला नाही.घरकुल मंजूर झाल्याने यातील बºयाच लाभार्थिंनींनी त्यांची आश्रयाची झोपडी पाडून खोदकामदेखील केले आहे, मात्र रक्कमच मिळत नसल्याने ते मोठ्या आशेने वाट पाहत आहेत. घरकुलाचे त्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहते की काय अशीच परिस्थिती आज निर्माण झाली आहे.यासंदर्भात एकलव्य आदिवासी क्रांती दलाचे अमळनेर तालुकाध्यक्ष बापू रावण भिल यांनी वेळोवेळी सतत पाठपुरावा सुरू ठेवला आहे, परंतु यश येत नसल्याने ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अधिकारी आॅनलाइनची अडचण सांगत असले तरी इतक्या दिवसात ही अडचण न सुटण्याचे कारण काय? याचा खुलासा अधिकारी करीत नाहीत. केवळ पत्रव्यवहार सुरू असल्याची उत्तरे देऊन मोकळे होत आहेत, असा लाभार्थिंचा आरोप आहे. 

टॅग्स :HomeघरAmalnerअमळनेर