शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

चाऱ्या अभावी गुरे-ढोरे कवडीमोल भावात विकली - पारोळा तालुक्यातील शेतक-यांनी मांडल्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 12:23 IST

दगडीसबगव्हान येथे केंद्रीय समितीकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

पारोळा, जि. जळगाव : या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी नाही, गुरांना चारा नाही. थोडे पार पिक हाती आले असते पण बोण्ड अळीने तोंडचा घास पळविला आणि अशा परिस्थितीत सरकारकडून येणारी बोण्ड अळीची तुटपुंजी मदत तीही अद्याप मिळाली नाही. या मुळे कर्जाच्या ओझा खाली आलेला शेतकरी अर्धमेला झाला आहे, अशा व्यथा पारोळा तालुक्यातील शेतकºयांनी केंद्रीय समितीच्या पथकापुढे मांडल्या.६ रोजी सकाळी ११ वाजता दगडी सबगव्हान ता. पारोळा या दुष्काळी गावाला केंद्रीय समितीच्या पथकाने दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. या पथकात केंद्रीय जल आयोगाचे संचालक आर.डी.देशपांडे, सहसचिव छवी झा, डीपाटमेंट आॅफ पल्ससचे संचालक ए. के.तिवारी एमएनसीएफसीच्या सहायक संचालिका डॉ. शालिनी सक्सेना यांचा समावेश होता. या सदस्यांनी या दगडी सबगव्हान गावाची दुष्काळी परिस्थितीची पाहणी करीत शेतकºयांशी संवाद साधला.या गावातील बाळू नथा पाटील व नारायण श्रीराम पाटील या शेतकºयांच्या शेताची पाहणी केली. या वेळी नारायण पाटील यांना शेतात किती कापूस पिकला, त्याला खर्च किती आला, कापूस कुठे विकला, किती पैसे मिळाले असे प्रश्न केले. या वेळी हेक्टरी १ क्विंटल कापूस आल्याचे शेतकºयाने सांगितले.या नंतर बाळू नथा पाटील यांना कापूसच पीक का घेता असे पथकाने विचारले असता विकासोचे घेतलेले कर्ज फेड फक्त कापूस उत्त्पन्न घेतल्यावर होते असे सांगितले. या वेळी शासनाने आम्हाला बी बियाणे, रासायनिक खते, यासाठी रोख रक्कम दिली पाहिजे असे सांगितले. तर सरपंच संगीता पाटील यांनी गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, त्या साठी उपाययोजना झाल्या पाहिजे अशी मागणी या पथकाकडे केली तर गावात रोहयो ची कामे सुरू झाली पाहिजे असे निवेदन दिले.या वेळी शेतकºयांनी पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरांच्या चाराचा प्रश्न निर्माण झाला आहे, मजुरांना हाताला काम नाही, पंचायत समितीच्या माध्यमातून रोजगार हमी योजनाची कामे नाहीत, शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे, दुष्काळी स्थितीमुळे तो नैराश्याने ग्रस्त झाला आहे. मग या कर्जबाजारीपणाला कंटाळून तो आत्महत्याकडे वळतो, असे या गावातील माजी सरपंच काळू पाटील यांनी सांगितलेया पथका समवेत जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, प्रांताधिकारी विजयनंद शर्मा, अमळनेर प्रांत अधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी जाधवर, कृषी सहायक संचालक रमेश भताने, निवासी नायब तहसीलदार पंकज पाटील, गटविकास अधिकारी आर. के. गिरासे, कृषी अधिकारी एस.पी. तवर, विस्तार अधिकारी सुनील पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव