शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाच लाख हेरक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर होणार कपाशीची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 23:21 IST

खरिपाचे नियोजन : सोयाबीनच्या क्षेत्रातही होणार वाढज जळगाव : यंदा देखील मान्सून सरासरी एवढा राहणार असल्याचा अंदाज असल्याने बळीराजा ...

खरिपाचे नियोजन : सोयाबीनच्या क्षेत्रातही होणार वाढजजळगाव

: यंदा देखील मान्सून सरासरी एवढा राहणार असल्याचा अंदाज असल्याने बळीराजा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. या वर्षी कापसाच्या लागवड क्षेत्रात पाच टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज असून पाच लाख ३५ हजार क्षेत्रावर कपाशीची लागवड होऊ शकते. यासोबतच सोयाबीनच्या क्षेत्रात देखील वाढ‌ होण्याचा अंदाज आहे.

कृषी विभागाने खरीप हंगामासाठी पीक पेरणी, बी- बियाणे आणि खत नियोजन पूर्ण केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षाच्या तुलनेत चार ते पाच टक्के पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात खरिपाचे मुख्य पीक हे कापसाचे आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात पाच लाख २० हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. यंदा यात वाढ होऊन हे क्षेत्र पाच लाख ३४ हजार हेक्टरपर्यंत कपाशीची लागवड होण्याचा अंदाज आहे.जिल्ह्यात यंदा ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे कृषी विभागाने खरिपाच्या नियोजनात लागवडीखालील क्षेत्रात पाच टक्के वाढ केली आहे. खरिपासाठी गेल्या वर्षी सात लाख ७५ हजार ५५० हेक्टरमध्ये वाढ करून हे क्षेत्र या वर्षी सात लाख ७८ हजार ६०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले आहे.

२६ लाखावर कपाशी बियाणाचे पाकिटेजिल्ह्यात २६ लाख ५२ हजार ६०० पाकिटे कपाशी बियाणाचे नियोजन असून १ लाख ३३ हजार मेट्रीक टन खतांचा साठा उपलब्ध आहेत. शिवाय ११ हजार ९४५ मे. टन खतांचा बफर स्टॉक करण्यात येणार आहे.

१६ भरारी पथकांची स्थापनाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निविष्ठांची सुलभ वाहतूक आणि पुरवठा करण्यासाठी नियंत्रण कक्ष सक्रिय ठेवणे, बियाणे खते व कीटकनाशके यांची गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. यासोबतच जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे एकूण १६ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव