शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात कापूस उत्पादकांची दिवाळी अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 15:57 IST

शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने यंदा कापूस उत्पादक शेतक-यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास चालढकलखान्देशात फक्त ७ लाख क्विंटल कापसाची खरेदीजानेवारीपर्यंत दर स्थिर राहण्याची शक्यता९० टक्के माल शेतकऱ्यांचा घरातच

जळगाव : शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने यंदा कापूस उत्पादक शेतक-यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीस सुरुवात झाली असली तरी व्यापा-यांकडून कापसाची प्रत तपासताना आडमुठेपणा दाखविला जातो. त्यामुळे ज्या कापसाची गुणवत्ता चांगली आहे. अशा कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणत नसल्याचे चित्र आहे.शासकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यास शासनाने निश्चित केलेल्या ५ हजार ४५० या दरापेक्षा चांगला भाव शेतक-यांना मिळेल, अशी आशा शेतक-यांना लागून आहे.आॅक्टोबर महिन्यात शासनाकडून दरवर्षी कापूस खरेदी केंद्र सुरू होतात. यंदा नोव्हेंबर महिना उजाडला तरी पणन महासंघ किंवा सीसीआयकडून खान्देशात एकही खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. व्यापा-यांकडून कापसाला प्रती क्विंटल ५२०० ते ५८०० इतका दर दिला जात असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात शेतक-यांना ४८०० ते ५४०० पर्यंतच्या दरानेच आपला माल विक्री करावा लागत आहे.व्यापाºयांकडून शेतक-यांच्या मालामध्ये अनेक त्रुटी काढल्या जातात. त्यातच दिवाळी जवळ असल्याने खरेदीसाठी शेतक-यांना पैशांची गरज असल्याने नाईलाजास्तव कमी दरात शेतक-यांना आपला माल व्यापा-यांना विक्री करावा लागत आहे. सीसीआयचे केंद्र सुरू होऊ नये म्हणून जिनिंग असोसिएशनकडून प्रयत्न सुरू असून, हे केंद्र सुरू झाल्यास व्यापा-यांना फटका बसेल म्हणून सीसीआयच्या केंद्रावर व्यापा-यांनी बहिष्कार टाकला असल्याचा आरोप शेतक-यांकडून केला जात आहे.जानेवारीपर्यंत दर स्थिर राहण्याची शक्यतासध्या भारतातील मार्केटमध्ये कापसाचा तुटवडा आहे. त्यामुळे भारताकडून चीन, बांगलादेश या देशांमध्ये होणारी निर्यात देखील कमी झाली असल्याने कापसाचे दर स्थिर आहेत. मात्र, जानेवारीपर्यंत मालाचा तुटवडा कमी होऊन निर्यात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारीतच कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता ललित भुरट यांनी व्यक्त केली.दुष्काळात १३ महिनायंदा दुष्काळामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा फटका शेतकºयांना बसतच आहे. त्यातच शासनाची उदासीनता व व्यापा-यांच्या आडमुठेपणामुळे शेतक-यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या कापूस वेचणी देखील सुरू आहे. दिवाळीनंतर कापसाचे दर वाढतात, अशी अपेक्षा शेतक-यांना आहे. त्यामुळे दिवाळीनंतरच कापूस विक्रीसाठी शेतकरी येतील, अशी शक्यता आहे.

टॅग्स :cottonकापूसdroughtदुष्काळ