शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'स्वदेशी'चं काय झालं..?; लोकपाल सदस्यांना ७० लाखांची BMW देण्यावरून राजकारण तापलं !
2
कठीण काळात आणखी घट्ट होतेय भारत-रशिया मैत्री; प्लॅन जाणून ट्रम्प यांचा आणखी थयथयाट होणार!
3
“आम्हाला राहुल गांधींना PM करायचेय, काँग्रेस मुंबईचे महापौरपद काय घेऊन बसलेय”: संजय राऊत
4
Railway Accident: 'रील'चे वेड जीवावर बेतले; रेल्वेच्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
5
"त्यांचा काहीतरी व्हिडीओ हाताला..."; मुंबईत कमळ फुलणार म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर मनसेचा निशाणा
6
महाआघाडीचं ठरलं, बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, तर उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' नेत्याच्या नावाची घोषणा
7
भ्रष्टाचारावर 'महागडी' नजर! ७० लाखाच्या BMW कारमधून फिरणार लोकपाल; ड्रायव्हर्सनाही ट्रेनिंग
8
"मी सौदी अरेबियात अडकलोय, वाळवंटात उंट...", ढसाढसा रडत तरुणाने मागितली मोदींकडे मदत
9
IND vs AUS : Adam Zampa नं मारलेला 'चौकार' गंभीरचा 'सुंदर' डाव फसवा ठरवणारा?
10
Mumbai Fire: जोगेश्वरीमध्ये अग्नितांडव! जेएमएस बिझनेस सेंटरला भीषण आग, अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु
11
Meta Layoffs: आता AI कर्मचाऱ्यांनाच कपातीचा फटका! Mark Zuckerberg च्या एआय टीममधील शेकडो लोकांना नारळ
12
बॅटिंगवेळी रोहितची अय्यरसमोर 'बोलंदाजी'; "तो सातवी ओव्हर टाकतोय यार..." मैदानात नेमकं काय घडलं (VIDEO)
13
तुमच्या कुंडलीत आहे का महाभाग्य योग? अकल्पनीय यश, अमाप धन; अनपेक्षित लाभ, भाग्योदय-भरभराट!
14
जगातील 'या' देशांत १ लाख रुपये कमवाल तर भारतात येऊन मालमाल व्हाल! तुम्हाला माहीत आहे का?
15
बँकेकडून पर्सनल लोन अप्रुव्ह झालंय? तरी अ‍ॅग्रीमेंटवर सही करण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की तपासा, पाहा डिटेल्स
16
Rohit Sharma Record: हिटमॅन रोहितनं वेळ घेतला; मग पुल शॉटसह बॅक टू बॅक सिक्सर मारत सेट केला महारेकॉर्ड
17
"ते मनापासून बोलले, म्हणूनच..."; मराठी अभिनेत्री मेघा धाडेचा महेश कोठारेंना पाठिंबा, म्हणाली-
18
रशियाच्या अर्थकारणाला थेट धक्का; जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला!
19
Pak General On India: भारताची ताकद बघून पाकिस्तान हादरला! पाकिस्तानी जनरल म्हणाले, "आम्ही एकटे..."
20
Diwali Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! १५० रुपयांची कार्बाइड गन बेतली जीवावर, १२५ जणांनी गमावली दृष्टी

जळगावात कापूस उत्पादकांची दिवाळी अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 15:57 IST

शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने यंदा कापूस उत्पादक शेतक-यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास चालढकलखान्देशात फक्त ७ लाख क्विंटल कापसाची खरेदीजानेवारीपर्यंत दर स्थिर राहण्याची शक्यता९० टक्के माल शेतकऱ्यांचा घरातच

जळगाव : शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने यंदा कापूस उत्पादक शेतक-यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीस सुरुवात झाली असली तरी व्यापा-यांकडून कापसाची प्रत तपासताना आडमुठेपणा दाखविला जातो. त्यामुळे ज्या कापसाची गुणवत्ता चांगली आहे. अशा कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणत नसल्याचे चित्र आहे.शासकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यास शासनाने निश्चित केलेल्या ५ हजार ४५० या दरापेक्षा चांगला भाव शेतक-यांना मिळेल, अशी आशा शेतक-यांना लागून आहे.आॅक्टोबर महिन्यात शासनाकडून दरवर्षी कापूस खरेदी केंद्र सुरू होतात. यंदा नोव्हेंबर महिना उजाडला तरी पणन महासंघ किंवा सीसीआयकडून खान्देशात एकही खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. व्यापा-यांकडून कापसाला प्रती क्विंटल ५२०० ते ५८०० इतका दर दिला जात असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात शेतक-यांना ४८०० ते ५४०० पर्यंतच्या दरानेच आपला माल विक्री करावा लागत आहे.व्यापाºयांकडून शेतक-यांच्या मालामध्ये अनेक त्रुटी काढल्या जातात. त्यातच दिवाळी जवळ असल्याने खरेदीसाठी शेतक-यांना पैशांची गरज असल्याने नाईलाजास्तव कमी दरात शेतक-यांना आपला माल व्यापा-यांना विक्री करावा लागत आहे. सीसीआयचे केंद्र सुरू होऊ नये म्हणून जिनिंग असोसिएशनकडून प्रयत्न सुरू असून, हे केंद्र सुरू झाल्यास व्यापा-यांना फटका बसेल म्हणून सीसीआयच्या केंद्रावर व्यापा-यांनी बहिष्कार टाकला असल्याचा आरोप शेतक-यांकडून केला जात आहे.जानेवारीपर्यंत दर स्थिर राहण्याची शक्यतासध्या भारतातील मार्केटमध्ये कापसाचा तुटवडा आहे. त्यामुळे भारताकडून चीन, बांगलादेश या देशांमध्ये होणारी निर्यात देखील कमी झाली असल्याने कापसाचे दर स्थिर आहेत. मात्र, जानेवारीपर्यंत मालाचा तुटवडा कमी होऊन निर्यात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारीतच कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता ललित भुरट यांनी व्यक्त केली.दुष्काळात १३ महिनायंदा दुष्काळामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा फटका शेतकºयांना बसतच आहे. त्यातच शासनाची उदासीनता व व्यापा-यांच्या आडमुठेपणामुळे शेतक-यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या कापूस वेचणी देखील सुरू आहे. दिवाळीनंतर कापसाचे दर वाढतात, अशी अपेक्षा शेतक-यांना आहे. त्यामुळे दिवाळीनंतरच कापूस विक्रीसाठी शेतकरी येतील, अशी शक्यता आहे.

टॅग्स :cottonकापूसdroughtदुष्काळ