शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

जळगावात कापूस उत्पादकांची दिवाळी अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 15:57 IST

शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने यंदा कापूस उत्पादक शेतक-यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास चालढकलखान्देशात फक्त ७ लाख क्विंटल कापसाची खरेदीजानेवारीपर्यंत दर स्थिर राहण्याची शक्यता९० टक्के माल शेतकऱ्यांचा घरातच

जळगाव : शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने यंदा कापूस उत्पादक शेतक-यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीस सुरुवात झाली असली तरी व्यापा-यांकडून कापसाची प्रत तपासताना आडमुठेपणा दाखविला जातो. त्यामुळे ज्या कापसाची गुणवत्ता चांगली आहे. अशा कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणत नसल्याचे चित्र आहे.शासकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यास शासनाने निश्चित केलेल्या ५ हजार ४५० या दरापेक्षा चांगला भाव शेतक-यांना मिळेल, अशी आशा शेतक-यांना लागून आहे.आॅक्टोबर महिन्यात शासनाकडून दरवर्षी कापूस खरेदी केंद्र सुरू होतात. यंदा नोव्हेंबर महिना उजाडला तरी पणन महासंघ किंवा सीसीआयकडून खान्देशात एकही खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. व्यापा-यांकडून कापसाला प्रती क्विंटल ५२०० ते ५८०० इतका दर दिला जात असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात शेतक-यांना ४८०० ते ५४०० पर्यंतच्या दरानेच आपला माल विक्री करावा लागत आहे.व्यापाºयांकडून शेतक-यांच्या मालामध्ये अनेक त्रुटी काढल्या जातात. त्यातच दिवाळी जवळ असल्याने खरेदीसाठी शेतक-यांना पैशांची गरज असल्याने नाईलाजास्तव कमी दरात शेतक-यांना आपला माल व्यापा-यांना विक्री करावा लागत आहे. सीसीआयचे केंद्र सुरू होऊ नये म्हणून जिनिंग असोसिएशनकडून प्रयत्न सुरू असून, हे केंद्र सुरू झाल्यास व्यापा-यांना फटका बसेल म्हणून सीसीआयच्या केंद्रावर व्यापा-यांनी बहिष्कार टाकला असल्याचा आरोप शेतक-यांकडून केला जात आहे.जानेवारीपर्यंत दर स्थिर राहण्याची शक्यतासध्या भारतातील मार्केटमध्ये कापसाचा तुटवडा आहे. त्यामुळे भारताकडून चीन, बांगलादेश या देशांमध्ये होणारी निर्यात देखील कमी झाली असल्याने कापसाचे दर स्थिर आहेत. मात्र, जानेवारीपर्यंत मालाचा तुटवडा कमी होऊन निर्यात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारीतच कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता ललित भुरट यांनी व्यक्त केली.दुष्काळात १३ महिनायंदा दुष्काळामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा फटका शेतकºयांना बसतच आहे. त्यातच शासनाची उदासीनता व व्यापा-यांच्या आडमुठेपणामुळे शेतक-यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या कापूस वेचणी देखील सुरू आहे. दिवाळीनंतर कापसाचे दर वाढतात, अशी अपेक्षा शेतक-यांना आहे. त्यामुळे दिवाळीनंतरच कापूस विक्रीसाठी शेतकरी येतील, अशी शक्यता आहे.

टॅग्स :cottonकापूसdroughtदुष्काळ