शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

८०० कुलुपे घेऊन गाळे सील करण्यासाठी गेलेले मनपाचे पथक कारवाई न करताच परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांवर कारवाईसाठी गेलेले मनपाचे पथक कारवाई न करताच परत आल्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांवर कारवाईसाठी गेलेले मनपाचे पथक कारवाई न करताच परत आल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. गाळेप्रश्नी मनपा आयुक्तांनी मनपाचे डॅशिंग उपायुक्त संतोष वाहुळे व प्रशांत पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार, दुसऱ्याच दिवशी उपायुक्तांनीही मनपा कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून, गाळे सील करण्यासाठी सोबत ८०० कुलुपे घेऊन थेट जुने बी.जे. मार्केटमध्ये दाखल झाले. मात्र, याठिकाणी गाळेधारकांची संख्या वाढत असल्याचे पाहून मनपाचे पथक कोणतीही कारवाई न करताच परत आले आहे.

मनपाकडून आतापर्यंत अनेकवेळा अशाच प्रकारे मनपाचे पथक मार्केटपर्यंत पाठविण्यात आले आहे. मात्र, केवळ इशारा देऊन खाली हात परतले आहे. यावेळेस वाहुळे व पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपविल्यामुळे हे दोन्ही अधिकारी मनपाची थकीत रक्कम वसूल करतील, अशी अपेक्षा असताना, हे दोन्हीही अधिकारी मात्र कारवाई न करताच परत आले. दरम्यान, मनपाचे पथक परत आल्यानंतर नेहमीप्रमाणे मनपा प्रशासनातील अधिकारी व गाळेधारकांची बैठक झाली. या बैठकीत पुन्हा कोणताही तोडगा निघालेला नाही.

भाडे भरा, अन्यथा कारवाई - मनपा प्रशासन

गाळेधारकांसोबत झालेल्या बैठकीत मनपा उपायुक्त प्रशांत पाटील यांनीही मनपा आयुक्तांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे गाळेधारकांना थकीत भाड्याची रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरली नाही, तर कारवाई ही करावीच लागणार असल्याची जाहीर भूमिका घेतली आहे. तसेच गाळेधारकांनी मनपाला सहकार्य करावे, असेही मनपा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

भाडे भरू, मात्र अवाजवी रक्कम नाही - गाळेधारक

मनपा प्रशासनासोबत बैठक झाल्यानंतर गाळेधारकांनी भाडे भरण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, मनपाने ज्याप्रमाणे अवाजवी स्वरूपात बिलांची रक्कम पाठविली आहे, ती भरणे शक्य नसल्याचे गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी सांगितले. पाचपट दंड रद्द करण्यासोबत दोन टक्के शास्तीची रक्कमदेखील रद्द करण्याची मागणी गाळेधारकांनी केली आहे. तसेच गाळे प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले असून, त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरच कारवाई करा, अशीही भूमिका गाळेधारकांनी घेतली आहे.