शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मनपाकडून आठवडाभरात गाळेधारकांकडून पाच कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क (व्हॅल्यू ॲडेड) जळगाव : महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून गेल्या नऊ वर्षांपासून थकीत भाड्याची वसूल करण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

(व्हॅल्यू ॲडेड)

जळगाव : महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून गेल्या नऊ वर्षांपासून थकीत भाड्याची वसूल करण्याची मोहीम मनपाकडून आठवडाभरापासून सुरू करण्यात आली आहे. आठवडाभरात मनपाकडून तब्बल पाच कोटी रुपयांची वसुली गाळेधारकांकडून करण्यात आली आहे. मनपाने गाळेधारकांकडे थकीत असलेल्या २४० कोटींपैकी १०० कोटी वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

गाळेधारकांप्रकरणी आता मनपा प्रशासनाने काहीअंशी आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे गाळेधारक शासनाच्या भूमिकेवर विश्वास ठेवून आहेत तर दुसरीकडे मनपा प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वसुली मोहीम व सोबत गाळे सील करण्याची प्रक्रियादेखील सुरू केली आहे. मनपा उपायुक्त प्रशांत पाटील व संतोष वाहुळे या दोन्ही अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून, दररोज विविध मार्केटमध्ये जाऊन ही वसुलीची मोहीम सुरू केली आहे.

तीन आयुक्तांनी वसुलीसाठी केले प्रयत्न

मनपाचा मुदत संपलेला मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित आहे. हा विषय अनेकवेळा पदाधिकाऱ्यांमुळे रखडला तर गाळेधारक न्यायालयात गेल्यामुळेदेखील मनपाकडून वसुलीची प्रक्रिया थांबली होती. मात्र, वेगवेगळ्या न्यायालयाने निर्णय दिल्यापासून मनपाकडूनदेखील वसुलीसाठी किंवा कारवाईसाठी फारसे प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. मात्र, गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात सहा आयुक्तांपैकी तीन आयुक्तांनी वसुलीवर भर दिला. यामध्ये प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, उदय टेकाळे व सतीश कुलकर्णी यांच्या कार्यकाळातच गाळेधारकांकडून थकीत भाड्याची रक्कम वसुल झाली आहे, तर प्रभारी आयुक्त म्हणून रुबल अग्रवाल यांच्यासह जीवन सोनवणे व चंद्रकांत डांगे यांच्या कार्यकाळात मात्र वसुलीदेखील झाली नाही व कारवाईदेखील झाली नाही.

आयुक्तांच्या कार्यकाळात झालेली वसुली

१. किशोरराजे निंबाळकर -२२ कोटी

२. उदय टेकाळे - ८५ कोटी

३. सतीश कुलकर्णी - ५ कोटी

दंड व शास्तीच्या रकमेत मिळू शकतो दिलासा

मनपाकडून सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत गाळेधारकांवर थकीत भाड्यापोटी लावण्यात आलेला पाचपट दंडाची रक्कम व २ टक्के शास्ती अशी रक्कम टाळून वसुली केली जात आहे. जेणेकरून गाळेधारकांनादेखील थकीत रक्कम भरताना जास्त अडचण निर्माण होणार नाही. तसेच ५ पट दंडाबाबत शासनाकडून निर्णय घेण्यात येऊ शकतो. त्यामुळेच मनपाने दंड व शास्तीची रक्कम वगळून वसुली मोहीम सुरू केली आहे.