शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

मनपाकडून आठवडाभरात गाळेधारकांकडून पाच कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क (व्हॅल्यू ॲडेड) जळगाव : महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून गेल्या नऊ वर्षांपासून थकीत भाड्याची वसूल करण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

(व्हॅल्यू ॲडेड)

जळगाव : महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून गेल्या नऊ वर्षांपासून थकीत भाड्याची वसूल करण्याची मोहीम मनपाकडून आठवडाभरापासून सुरू करण्यात आली आहे. आठवडाभरात मनपाकडून तब्बल पाच कोटी रुपयांची वसुली गाळेधारकांकडून करण्यात आली आहे. मनपाने गाळेधारकांकडे थकीत असलेल्या २४० कोटींपैकी १०० कोटी वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

गाळेधारकांप्रकरणी आता मनपा प्रशासनाने काहीअंशी आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे गाळेधारक शासनाच्या भूमिकेवर विश्वास ठेवून आहेत तर दुसरीकडे मनपा प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वसुली मोहीम व सोबत गाळे सील करण्याची प्रक्रियादेखील सुरू केली आहे. मनपा उपायुक्त प्रशांत पाटील व संतोष वाहुळे या दोन्ही अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून, दररोज विविध मार्केटमध्ये जाऊन ही वसुलीची मोहीम सुरू केली आहे.

तीन आयुक्तांनी वसुलीसाठी केले प्रयत्न

मनपाचा मुदत संपलेला मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित आहे. हा विषय अनेकवेळा पदाधिकाऱ्यांमुळे रखडला तर गाळेधारक न्यायालयात गेल्यामुळेदेखील मनपाकडून वसुलीची प्रक्रिया थांबली होती. मात्र, वेगवेगळ्या न्यायालयाने निर्णय दिल्यापासून मनपाकडूनदेखील वसुलीसाठी किंवा कारवाईसाठी फारसे प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. मात्र, गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात सहा आयुक्तांपैकी तीन आयुक्तांनी वसुलीवर भर दिला. यामध्ये प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, उदय टेकाळे व सतीश कुलकर्णी यांच्या कार्यकाळातच गाळेधारकांकडून थकीत भाड्याची रक्कम वसुल झाली आहे, तर प्रभारी आयुक्त म्हणून रुबल अग्रवाल यांच्यासह जीवन सोनवणे व चंद्रकांत डांगे यांच्या कार्यकाळात मात्र वसुलीदेखील झाली नाही व कारवाईदेखील झाली नाही.

आयुक्तांच्या कार्यकाळात झालेली वसुली

१. किशोरराजे निंबाळकर -२२ कोटी

२. उदय टेकाळे - ८५ कोटी

३. सतीश कुलकर्णी - ५ कोटी

दंड व शास्तीच्या रकमेत मिळू शकतो दिलासा

मनपाकडून सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत गाळेधारकांवर थकीत भाड्यापोटी लावण्यात आलेला पाचपट दंडाची रक्कम व २ टक्के शास्ती अशी रक्कम टाळून वसुली केली जात आहे. जेणेकरून गाळेधारकांनादेखील थकीत रक्कम भरताना जास्त अडचण निर्माण होणार नाही. तसेच ५ पट दंडाबाबत शासनाकडून निर्णय घेण्यात येऊ शकतो. त्यामुळेच मनपाने दंड व शास्तीची रक्कम वगळून वसुली मोहीम सुरू केली आहे.