शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

कोरोनाने थांबविल्या पुन्हा पोलिसांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 12:31 IST

१० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ : अधिकारी, कर्मचारी ‘रिलॅक्स’

जळगाव : पोलिसांच्या बदल्यांची वेगवान प्रक्रिया सुरु असतानाच या सर्व बदली प्रक्रियेला गुरुवारी शासनाने १० आॅगस्टपर्यंत पुन्हा मुदतवाढ दिली आहे. यंदाच्या वर्षातील ही दुसरी मुदतवाढ आहे. दरम्यान, वारंवार मुदतवाढ मिळत असल्याने कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून ते रिलॅक्स झाले आहेत.कोरोनाचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्वच विभागाच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांना एक वर्ष स्थगिती दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी १५ टक्के बदलीचा आदेश जारी करुन ३० जुलैच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शासनाने दिले होते. या बदल्यांच्या विरोधात काही जणांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली.दरम्यान, बदल्यांची प्रक्रीया सुरु झालेली असतानाच पुन्हा १० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा आदेश गुरुवारी धडकला. सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव गीता कुळकर्णी यांच्या स्वाक्षरीचा हा आदेश आहे.कार्यकाळ पूर्ण झालेल्यांच्याच बदल्याजिल्हा पोलीस दलात कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाली होती. त्याशिवाय काही विनंती बदल्यांचेही अर्ज प्राप्त झाले होते. बदली प्रक्रिया राबविण्यासाठी मंडळ नियुक्त करुन पुढील कार्यवाही सुरु झालेली असताना आता नव्या आदेशाने पुन्हा ब्रेक लागला आहे. दरम्यान, ज्या कर्मचाºयाचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे व अधिकाºयाचाही एका ठिकाणचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशांच्या बदल्या होणार आहेत. ज्यांचा कार्यकाळ बाकी आहे असे व विनंती बदल्यांचा विचार होण्याची शक्यता फारच कमी आहे. कार्यकाळ संपलेल्या कर्मचाºयांना नवीन आदेश दिलासा देणारा असला तरी तो १० आॅगस्टपर्यंतच आहे. त्यापुढे आणखी काय आदेश येतो हे सांगता येत नाही.शासनाने बदल्यांना मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे १० आॅगस्टपर्यंत कोणत्याच कर्मचारी व अधिकाºयाची बदली होणार नाही. नवीन आदेशानुसार पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे. हा आदेश अधिकारी व कर्मचाºयांनाही लागू आहे.-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव