शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संपला ना साहेब, शहरातील शाळा सुरू करा हो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : कोरोनाचा शेवटचा रुग्ण सापडून २१ दिवस झाले आता तरी शहरातील शाळा सुरू कराव्यात. ऑनलाईनमुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : कोरोनाचा शेवटचा रुग्ण सापडून २१ दिवस झाले आता तरी शहरातील शाळा सुरू कराव्यात. ऑनलाईनमुळे मुलांचे नुकसान होत असल्याच्या भावना पालक आणि मुलांनी व्यक्त केल्या आहेत.

ग्रामीण भागात कोरोना संपला म्हणून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. आठवी ते बारावीची मुले शाळेत जाऊ लागली आहेत. ज्या शाळेतील शिक्षक किंवा कर्मचारी पॉझिटिव्ह आले तेथेदेखील शाळा चार दिवस बंद ठेवून शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मग शहरात रुग्ण नसतानादेखील शाळा का सुरू करण्यात येत नाहीत, असा सवाल आता पालक आणि विद्यार्थी विचारू लागले आहेत.

ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिक दररोज शहरात बाजार, कामासाठी अमळनेर येत असतात.

जर लागण व्हायचीच होती तर आतापर्यंत ग्रामीण भागात लोण पसरले असते. मात्र तशी परिस्थिती नसल्याने शहरातील मुलांचे शैक्षणिक नुकसान का करीत आहेत, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.

शहरात प्रत्येक मुलांकडे अँड्रॉइड मोबाईल असला तरी मुले ऑनलाईन येऊन इतरत्र लक्ष केंद्रित करीत आहेत. दोन वर्षांपासून त्यांच्यातील शिस्त हरवली आहे. क्रियाशीलता शिथिल होत चालली आहे. काहींच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याने आता तरी शाळा सुरू करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ग्रामीण भागात शाळा खुल्या करण्यात आल्या परंतु शहरी भागात अजून एकही शाळा उघडली नाही. मी इयत्ता दहावीत शिकतो. तसे तर ऑनलाईन क्लास तर चालू आहे आणि तेही खूप चांगल्याप्रकारे, पण जी मजा शिक्षणात आली पाहिजे ती ऑनलाईन शाळेत येणे कठीण आहे.

- कृष्णा पाटील, विद्यार्थी, अमळनेर

ग्रामीण आणि शहरातील शाळाबाबत विषमता निर्माण झाली आहे. मुलांमध्ये हेवा निर्माण झाला आहे. एकाग्रता भंग होऊ लागली आहे. यामुळे त्यांच्या आयुष्यावर निश्चित परिणाम होतील. शाळा सुरू केल्याच पाहिजेत.

- डी.ए. धनगर, शिक्षक, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, अमळनेर

मुलांवाचून शाळा दोन वर्षांपासून सुन्या-सुन्या आहेत. त्यांच्यातील स्पर्धा, जिज्ञासा यामुळे शिक्षकदेखील सक्रिय असत. आता शिक्षकदेखील आळशी होत आहेत. त्यामुळे शाळा सुरूच केल्या पाहिजेत.

-एम. ए. पाटील, मुख्याध्यापक, शिवाजी हायस्कूल, अमळनेर

मुले घरात बसून ऑनलाईन अभ्यासामुळे घरकोंडे होत आहेत. त्यांच्यातील मूल्यांचा विकास थांबला आहे. त्यासाठी जेथे कोरोना नाही तेथे शाळा सुरू केल्याच पाहिजेत.

- एस. पाटील, पालक, अमळनेर