शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

कोरोना संपला ना साहेब, शहरातील शाळा सुरू करा हो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : कोरोनाचा शेवटचा रुग्ण सापडून २१ दिवस झाले आता तरी शहरातील शाळा सुरू कराव्यात. ऑनलाईनमुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : कोरोनाचा शेवटचा रुग्ण सापडून २१ दिवस झाले आता तरी शहरातील शाळा सुरू कराव्यात. ऑनलाईनमुळे मुलांचे नुकसान होत असल्याच्या भावना पालक आणि मुलांनी व्यक्त केल्या आहेत.

ग्रामीण भागात कोरोना संपला म्हणून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. आठवी ते बारावीची मुले शाळेत जाऊ लागली आहेत. ज्या शाळेतील शिक्षक किंवा कर्मचारी पॉझिटिव्ह आले तेथेदेखील शाळा चार दिवस बंद ठेवून शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मग शहरात रुग्ण नसतानादेखील शाळा का सुरू करण्यात येत नाहीत, असा सवाल आता पालक आणि विद्यार्थी विचारू लागले आहेत.

ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिक दररोज शहरात बाजार, कामासाठी अमळनेर येत असतात.

जर लागण व्हायचीच होती तर आतापर्यंत ग्रामीण भागात लोण पसरले असते. मात्र तशी परिस्थिती नसल्याने शहरातील मुलांचे शैक्षणिक नुकसान का करीत आहेत, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.

शहरात प्रत्येक मुलांकडे अँड्रॉइड मोबाईल असला तरी मुले ऑनलाईन येऊन इतरत्र लक्ष केंद्रित करीत आहेत. दोन वर्षांपासून त्यांच्यातील शिस्त हरवली आहे. क्रियाशीलता शिथिल होत चालली आहे. काहींच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याने आता तरी शाळा सुरू करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ग्रामीण भागात शाळा खुल्या करण्यात आल्या परंतु शहरी भागात अजून एकही शाळा उघडली नाही. मी इयत्ता दहावीत शिकतो. तसे तर ऑनलाईन क्लास तर चालू आहे आणि तेही खूप चांगल्याप्रकारे, पण जी मजा शिक्षणात आली पाहिजे ती ऑनलाईन शाळेत येणे कठीण आहे.

- कृष्णा पाटील, विद्यार्थी, अमळनेर

ग्रामीण आणि शहरातील शाळाबाबत विषमता निर्माण झाली आहे. मुलांमध्ये हेवा निर्माण झाला आहे. एकाग्रता भंग होऊ लागली आहे. यामुळे त्यांच्या आयुष्यावर निश्चित परिणाम होतील. शाळा सुरू केल्याच पाहिजेत.

- डी.ए. धनगर, शिक्षक, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, अमळनेर

मुलांवाचून शाळा दोन वर्षांपासून सुन्या-सुन्या आहेत. त्यांच्यातील स्पर्धा, जिज्ञासा यामुळे शिक्षकदेखील सक्रिय असत. आता शिक्षकदेखील आळशी होत आहेत. त्यामुळे शाळा सुरूच केल्या पाहिजेत.

-एम. ए. पाटील, मुख्याध्यापक, शिवाजी हायस्कूल, अमळनेर

मुले घरात बसून ऑनलाईन अभ्यासामुळे घरकोंडे होत आहेत. त्यांच्यातील मूल्यांचा विकास थांबला आहे. त्यासाठी जेथे कोरोना नाही तेथे शाळा सुरू केल्याच पाहिजेत.

- एस. पाटील, पालक, अमळनेर