शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

कोरोना नापास ! ७५० पैकी शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST

अमळनेर : प्रशासनाची नाकाबंदी, बाजारपेठेत गस्त आणि कारवाई, आरोग्य विभागाच्या सर्वाधिक चाचण्या आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे दि. २५ रोजी ...

अमळनेर : प्रशासनाची नाकाबंदी, बाजारपेठेत गस्त आणि कारवाई, आरोग्य विभागाच्या सर्वाधिक चाचण्या आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे दि. २५ रोजी कोरोनाचा आकडा शून्यावर आल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र, यासोबत दक्षता घेण्याचे आवाहनदेखील प्रशासनाने केले आहे.

दि. २५ रोजी ग्रामीण भागात २७५ चाचण्या, तर शहरात ४६२ चाचण्या करण्यात आल्या. मात्र, दोन्ही ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या शून्य आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. दुसऱ्या लाटेत २५ मे हा पहिला दिवस उजाडला आहे की, कोरोनाच्या रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीमुळे प्रशासन हतबल झाले होते.

अखेर प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी लोकप्रतिनिधी आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, तसेच डीवायएसपी राकेश जाधव, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे तसेच शासकीय डॉक्टरांची बैठक घेऊन ‘कोरोना हटाव’ मोहीम हाती घेण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आणि कठोर कारवाया सुरू झाल्या. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना दंड, मोटारसायकल चालकांवर गुन्हे, नियम मोडून वारंवार दुकाने सुरू ठेवणाऱ्यांची दुकाने सील करणे, मास्क नसलेल्यांना दंड करणे, विविध भागात जाऊन अँटिजन चाचण्या करणे, बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांच्या भल्या पहाटे चाचण्या करणे, रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या चाचण्या करणे तसेच तातडीने उपचार करणे, नागरिकांतील कोरोनाची भीती दूर करून डॉक्टरांनाही योग्य उपचारांच्या सूचना देऊन कोरोना नियंत्रणात आला आहे. जास्तीत जास्त रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करता यावेत म्हणून लोकसहभाग देखील घेण्यात आला होता. त्यामुळे वेळीच उपचार होऊन संसर्ग रोखण्यात आला. रुग्ण संख्या शून्यावर आली असली तरी मास्क, सोशल डिस्टन्स आणि वारंवार हात धुणे या सूत्रीचा वापर करावाच, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.