शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ढिसाळ नियोजनामुळे कोरोनाचा विस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 12:54 IST

प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेकडून गांभीर्य हरपले, शासकीय विभागांमधील समन्वयाच्या अभावाने पडली भर, मदतीच्या नावाखाली राजकीय मंडळींची केवळ चमकोगिरी

मिलिंद कुलकर्णीखान्देशातील नंदुरबार हे आॅरेंज झोनमध्ये तर जळगाव आणि धुळे रेड झोनमध्ये असताना लॉकडाऊनच्या तिसऱ्या पर्वातील ढिसाळ नियोजनामुळे आठवडाभरात कोरोनाचा विस्फोट झाला. नंदुरबारात २१ रुग्ण, त्याच्या अडीचपट धुळ्यात ५४ रुग्ण तर कितीतरी पटीने जळगावात म्हणजे १७२ च्या आसपास रुग्ण आहेत.प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनता अशा तिन्ही घटकांच्या बेपर्वाईने कोरोनाचा विस्फोट झाला. जिल्हा प्रशासनाने दोन टप्प्यात चांगले काम केल्यानंतर तिसºया टप्प्यात कामगिरी घसरली. गोंधळ निर्माण करणारी परिपत्रके, शासकीय विभागांमधील समन्वयाचा अभाव, कर्मचाऱ्यांवर नसलेले नियंत्रण, टाळेबंदीची अंमलबजावणी करताना जनता, लोकप्रतिनिधी यांच्याशी उडालेले खटके याच गोष्टी अधिक गाजल्या. कठोर भूमिका घेऊन प्रसंगी वाईटपणा घ्यावा लागला तरी हरकत नसते. पण वेळ निघून गेल्यावर सक्तीचे लॉकडाऊन केल्यावर हाती काय उरणार हा प्रश्न आहेच.जळगाव जिल्ह्यातील मृत्यूदर अधिक असल्याबद्दल माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीरपणे चिंता व्यक्त केली. संचालक डॉ.तात्याराव लहाने यांच्याशी संपर्क साधून त्यांनी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. अधिष्ठात्यांनी स्थानिक वैद्यकीय अधिकाºयांची समिती नेमून चौकशी केली. पण प्रशासनाची बाजू घेणाराच अहवाल आला. मालेगावला बंदोबस्ताला गेलेले ५ कर्मचारी पळून आले. तर काहींना कोरोनाची लागण झाली. रणछोड कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई झाली.लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाशी समन्वय व जनतेला धीर देणे, समजावून सांगण्याची अपेक्षा होती. परंतु, वेगळेच चित्र समोर आले. काही लोकप्रतिनिधी घरीच थांबले तर काही कार्यकर्त्यांना घेऊन दौरे, फोटोसेशन करताना आढळले. सलग दीड महिन्यापासून अखंडपणे काम करणाºया प्रशासनावर तोंडसुख घेण्याची मर्दुमकीदेखील काहींनी बजावली. तर काहींच्या कुटुंबीयांवर मद्याची हेराफेरी केल्याचे गुन्हे दाखल झाले. दीड महिना लोटल्यानंतर काहींना कोरोनाची आठवण आली आणि मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीट वाटपाचे तालुकास्तरीय कार्यक्रम आणि जोडून शासकीय अधिकाºयांच्या आढावा बैठकांचा धडाका लावण्यात आला.दीड महिन्याच्या लॉकडाऊननंतर हातघाईवर आलेल्या व्यापाºयांनी कहर केला. सिंधी कॉलनीत लॉकडाऊनला न जुमानता दुकाने उघडी होती. बळीराम पेठेत मनपाचे पथक येताच दुकानदाराने ग्राहकांना चक्क कोंडून ठेवले. शासकीय आदेशांचा सोयीचा अर्थ काढून दुकाने उघडण्याचा प्रयत्न झाला. पारोळ्यात नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांमध्ये व्यापाºयांच्या प्रश्नावरुन जुंपली.आणि जनतेचे काय विचारता? कोरोना योध्दयांसाठी टाळ्या वाजविणारे, दिवे उजळविणाºया याच जनतेने परीक्षा संपल्याच्या विद्यार्थ्याच्या आनंदासारखा आनंद थोडी सवलत मिळताच दाखविला. दारु दुकानांसमोर लागलेल्या रांगा पाहून तर ‘स्कायलॅब’ कोसळण्याच्या संकटात मिठाईच्या दुकानासमोर लागलेल्या रांगा आठवल्या. मनोवृत्ती तीच.लॉकडाऊनच्या दोन पर्वामध्ये सर्वच यंत्रणांमध्ये संवाद, समन्वय, शिस्त यांचा अंतर्भाव असल्याने जागतिक संकट असलेल्या कोरोनाला खान्देशात थोपविण्यात यश आले. परंतु, तिसºया पर्वात ढिसाळ नियोजनाचा फटका बसला.आपत्ती व्यवस्थापन कायद्याचीअंमलबजावणी करताना कठोरता आवश्यक आहे. वेळ निघून गेली की, हाती काही राहत नाही. केंद्र, राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकांमुळे गोंधळात भर पडली. त्यात जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील समन्वयाचा अभाव ठळकपणे समोर आला. लोकप्रतिनिधींचा अवास्तव हस्तक्षेप डोकेदुखी ठरला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव