शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

ढिसाळ नियोजनामुळे कोरोनाचा विस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 12:54 IST

प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेकडून गांभीर्य हरपले, शासकीय विभागांमधील समन्वयाच्या अभावाने पडली भर, मदतीच्या नावाखाली राजकीय मंडळींची केवळ चमकोगिरी

मिलिंद कुलकर्णीखान्देशातील नंदुरबार हे आॅरेंज झोनमध्ये तर जळगाव आणि धुळे रेड झोनमध्ये असताना लॉकडाऊनच्या तिसऱ्या पर्वातील ढिसाळ नियोजनामुळे आठवडाभरात कोरोनाचा विस्फोट झाला. नंदुरबारात २१ रुग्ण, त्याच्या अडीचपट धुळ्यात ५४ रुग्ण तर कितीतरी पटीने जळगावात म्हणजे १७२ च्या आसपास रुग्ण आहेत.प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनता अशा तिन्ही घटकांच्या बेपर्वाईने कोरोनाचा विस्फोट झाला. जिल्हा प्रशासनाने दोन टप्प्यात चांगले काम केल्यानंतर तिसºया टप्प्यात कामगिरी घसरली. गोंधळ निर्माण करणारी परिपत्रके, शासकीय विभागांमधील समन्वयाचा अभाव, कर्मचाऱ्यांवर नसलेले नियंत्रण, टाळेबंदीची अंमलबजावणी करताना जनता, लोकप्रतिनिधी यांच्याशी उडालेले खटके याच गोष्टी अधिक गाजल्या. कठोर भूमिका घेऊन प्रसंगी वाईटपणा घ्यावा लागला तरी हरकत नसते. पण वेळ निघून गेल्यावर सक्तीचे लॉकडाऊन केल्यावर हाती काय उरणार हा प्रश्न आहेच.जळगाव जिल्ह्यातील मृत्यूदर अधिक असल्याबद्दल माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीरपणे चिंता व्यक्त केली. संचालक डॉ.तात्याराव लहाने यांच्याशी संपर्क साधून त्यांनी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. अधिष्ठात्यांनी स्थानिक वैद्यकीय अधिकाºयांची समिती नेमून चौकशी केली. पण प्रशासनाची बाजू घेणाराच अहवाल आला. मालेगावला बंदोबस्ताला गेलेले ५ कर्मचारी पळून आले. तर काहींना कोरोनाची लागण झाली. रणछोड कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई झाली.लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाशी समन्वय व जनतेला धीर देणे, समजावून सांगण्याची अपेक्षा होती. परंतु, वेगळेच चित्र समोर आले. काही लोकप्रतिनिधी घरीच थांबले तर काही कार्यकर्त्यांना घेऊन दौरे, फोटोसेशन करताना आढळले. सलग दीड महिन्यापासून अखंडपणे काम करणाºया प्रशासनावर तोंडसुख घेण्याची मर्दुमकीदेखील काहींनी बजावली. तर काहींच्या कुटुंबीयांवर मद्याची हेराफेरी केल्याचे गुन्हे दाखल झाले. दीड महिना लोटल्यानंतर काहींना कोरोनाची आठवण आली आणि मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीट वाटपाचे तालुकास्तरीय कार्यक्रम आणि जोडून शासकीय अधिकाºयांच्या आढावा बैठकांचा धडाका लावण्यात आला.दीड महिन्याच्या लॉकडाऊननंतर हातघाईवर आलेल्या व्यापाºयांनी कहर केला. सिंधी कॉलनीत लॉकडाऊनला न जुमानता दुकाने उघडी होती. बळीराम पेठेत मनपाचे पथक येताच दुकानदाराने ग्राहकांना चक्क कोंडून ठेवले. शासकीय आदेशांचा सोयीचा अर्थ काढून दुकाने उघडण्याचा प्रयत्न झाला. पारोळ्यात नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांमध्ये व्यापाºयांच्या प्रश्नावरुन जुंपली.आणि जनतेचे काय विचारता? कोरोना योध्दयांसाठी टाळ्या वाजविणारे, दिवे उजळविणाºया याच जनतेने परीक्षा संपल्याच्या विद्यार्थ्याच्या आनंदासारखा आनंद थोडी सवलत मिळताच दाखविला. दारु दुकानांसमोर लागलेल्या रांगा पाहून तर ‘स्कायलॅब’ कोसळण्याच्या संकटात मिठाईच्या दुकानासमोर लागलेल्या रांगा आठवल्या. मनोवृत्ती तीच.लॉकडाऊनच्या दोन पर्वामध्ये सर्वच यंत्रणांमध्ये संवाद, समन्वय, शिस्त यांचा अंतर्भाव असल्याने जागतिक संकट असलेल्या कोरोनाला खान्देशात थोपविण्यात यश आले. परंतु, तिसºया पर्वात ढिसाळ नियोजनाचा फटका बसला.आपत्ती व्यवस्थापन कायद्याचीअंमलबजावणी करताना कठोरता आवश्यक आहे. वेळ निघून गेली की, हाती काही राहत नाही. केंद्र, राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकांमुळे गोंधळात भर पडली. त्यात जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील समन्वयाचा अभाव ठळकपणे समोर आला. लोकप्रतिनिधींचा अवास्तव हस्तक्षेप डोकेदुखी ठरला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव