शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
3
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
4
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
5
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
6
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
7
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
8
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
9
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
10
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
11
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
12
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
13
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
14
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
15
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
16
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
17
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
18
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
19
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
20
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार

कोरोना : त्रस्तता नको; संयम हवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 12:18 IST

बंदी आणि सक्तीच्या आदेशांपेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर भर हवा, आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमधील त्रुटी उघड, मंदीच्या वातावरणातून सावरण्यासाठी सरकारी साथ हवी

मिलिंद कुलकर्णीचीनमध्ये उद्भवलेल्या कोरोना व्हायरसचा प्रभाव आणि परिणाम संपूर्ण जगभर जाणवू लागताच जागतिक आरोग्य संघटनेने साथ म्हणून त्याची घोषणा केली. अमेरिकेने राष्टÑीय आणीबाणी जाहीर केली. ज्या वेगाने हा आजार पसरत आहे, ती चिंताजनक अशीच स्थिती आहे. सरकारी पातळीवर उपाययोजना होत आहे. परंतु, या स्थितीत त्रस्त होण्यापेक्षा संयम राखण्याची नितांत आवश्यकता आहे.कोरोनापेक्षा इतर आजारांनी मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या अधिक असताना कोरोनाला महत्त्व का देण्यात येत आहे, त्यामागे काही षडयंत्र तर नाही, अशी शंका समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहे. मात्र इतर आजारांवर प्रतिबंधात्मक लस, औषधी उपलब्ध आहेत. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी अद्याप कोणत्याही औषधाचा शोध लागलेला नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हाच एक पर्याय सरकार आणि जनतेच्या हाती राहिला आहे. पुढे जाऊन औषधी, लस सापडेल तेव्हा भीती कमी होऊ शकते.या आजाराची व्याप्ती आणि परिणामकारकता लक्षात येत नसल्याने सरकारी पातळीवर वेगवेगळे प्रतिबंध लावण्यात येत आहे. समूहपातळीवर लागण होत असल्याने शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह, बाजारपेठा अशा ठिकाणी गर्दी होणार नाही, अशी काळजी घेतली जात आहे.शहर व ग्रामीण भागातील आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांमधील त्रुटी यानिमित्ताने उघड होत आहे. अशा साथरोगाच्या काळात परिपूर्णतेने आम्ही लढू शकत नसू, तर मग सामान्यांचे रक्षण आणि मनोधैर्य वाढविणार कोण? सॅनिटायझर व मास्क वापरा असे आवाहन केले जात असताना त्याची पुरेशा प्रमाणात उपलब्धता होत आहे किंवा नाही, हे बघायला हवे की नको. या दोन्ही वस्तू बाजारपेठेतून गायब झाल्या आहेत. काळाबाजार तरी होत असावा किंवा उत्पादन कमी असावे. यातून सामान्य माणसांमध्ये त्रस्तता वाढते.कोरोनापासून बचावासाठी छोटे-छोटे उपाय आहेत, ते अवलंबले तरी आम्ही त्याला अटकाव करु शकतो. पण आम्ही नागरिक म्हणून त्याचा अवलंब करण्यापेक्षा आमच्या सवयींवर टिकून राहतो. किती गाव आणि शहरे निर्मल आहेत? भूमिगत गटारींची स्थिती कशी आहे? रस्ते आणि परिसराची स्वच्छता राखली जाते काय? कचºयाची विल्हेवाट लावली जाते काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारात्मक अशीच आहे. त्यामुळे आशिया खंडात भारताला सगळ्यात जास्त फटका कोरोनाचा बसला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. तहान लागली की, विहिर खणण्याची आमची मानसिकता आहे. त्याची प्रचिती या काळात पुन्हा एकदा आली. कोरोनामुळे किमान यंत्रणेत सतर्कता आली तरी खूप झाले असे म्हणावे लागेल.कोरोनाने संपूर्ण जगाला भयकंपीत केले आहे. चीनपाठोपाठ युरोप, अमेरिका आणि भारतात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकारी पातळीवर बंदी आणि सक्तीचा सरधोपट मार्ग अवलंबला जात आहे.एकीकडे मास्क आणि सॅनिटायझर वापराअसे आवाहन करायचे आणि या वस्तूच बाजारपेठेतून गायब होत आहेत, त्या जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट होऊनही उपलब्ध होत नाही, यावरुन आपत्कालीन काळाशी मुकाबला करण्यासाठी असलेली आमची मर्यादा उघड होते. प्रतिबंधात्मक उपायांविषयी जनजागृती खूप महत्वाची असली तरी त्यात त्रस्तता नको. भावनिक आधार महत्त्वाचा आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाJalgaonजळगाव