शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटात केळी व्यापाऱ्यांनी दिली प्रतिक्विंटल हजार रू.ची शेतकऱ्यांच्या खिशाला चाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 17:41 IST

बाजारभाव समितीच्या भावापेक्षा २०० ते २५० रू. कमी भावाची तडजोड करा म्हणजे व्यापाºयांची गाडी बांधावर उभी राहतेय.

ठळक मुद्देकेळीमालाला उठाव जोमातबाजारभाव समितीच्या भावापेक्षा २०० ते २५० रू. कमी भावाची तडजोड करा म्हणजे व्यापाºयांची गाडी बांधावर उभी राहतेय

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : गत वर्षीच्या दुष्काळाच्या राखेतून अग्नीपंख घेऊन फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्याची आशा उराशी बाळगून असलेल्या केळी उत्पादक शेतकºयांंना यंदा मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन चैत्र नवरात्रोत्सव व रमजान ईदचे पर्व येवूनही व केळीमालाची उपलब्धता अत्यंत कमी प्रमाणात आहे. असे असतानाही केळी व्यापाºयांनी २२ मार्च ते आजतागायत ४७ ते ४८ दिवसात शेतकºयांच्या खिशाला किमान प्रतिक्विंटल एक हजार रूपयांची चाट लावली आहे. या ४७ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये दररोज सरासरी किमान २५० ट्रक तालुक्यातून निर्यात होत असल्याचे गृहित धरता १ लाख ८८ हजार क्विंटल केळीमागे १८८ कोटींची निव्वळ उत्पादनाची चाट केळी उत्पादक शेतकºयांना अखेर बसल्याचे मोठे शल्य बोचणारे ठरले आहे.गत वर्षी अत्यल्प व अनियमित पर्जन्यमानामुळे तालुक्यात दुष्काळाचे सावट होते. भूजल पातळी दररोज १०० मीटरने घसरल्याने हजारो हेक्टरमधील केळीबागा पाण्याअभावी तर ४७ ते ४८ सेल्सियस तापमानाची मजल मारलेल्या उन्हाच्या दाहकतेत होरपळून निघाल्या होत्या. किंबहुना त्याच कारणास्तव केळीची मृगबागेची पूर्वहंगामी लागवडीत कमालीची घट झाली होती.केळीने कायापालट होण्याऐवजी व्यापाºयांनी केले भुईसपाटपरिणामी त्या घटत्या लागवडीखालील केळीबागांमधील अत्यल्प केळीमालाला यंदाच्या मार्च-एप्रिलपासून सुरू होणाºया केळी हंगामात किमान १२०० ते १३०० रू प्रतिक्विंटल भाव मिळणे अपेक्षित होते. किंबहुना, कोरोनाच्या लॉकडाऊनचा फतवा जारी होताच केळी व्यापाºयांनी ‘अभी नही तो कभी नही’ अशा एकाधिकार शाहीने केळी हे नाशवंत फळ असल्याने अवघ्या २५० ते ३०० रू प्रतिक्विंटल भावात केळीबागांच्या बख्खी (विळा) लावून केळीबागा आडव्या केल्या. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यामार्फत लॉकडाऊनमधील मार्ग मोकळा केल्यानंतरही उत्तर भारतात केळी भरून गेलेले ट्रक खाली करायला मजूर उपलब्ध नाहीत, तिकडे गेलेल्या गाड्या परत येत नाहीत, रस्त्यात गॅरेज वा ढाबे उपलब्ध नाहीत. अशा एकनाविविध बहाण्यांनी किमान प्रतिक्विंटल एक हजार रुपये कमी दराने केळी बागांची सर्रास कत्तल सुरू होती.पश्चिम बंगाल तथा सोलापूर स्थित असलेल्या केळी पॅकेजिंगचे तंत्रकुशल केळी कामगारांचा ताफा असता तर दरदिवशी १५ ते २० कंटेनर आखाती राष्ट्रात रवाना करून केळी उत्पादकांना अपेक्षित असलेल्या दीड हजार रू प्रतिक्विंटल केळीभाव पदरात टाकण्याची धन्यता लाभली असती-सदानंद महाजन, केळी निर्यातदार शेतकरी, तांदलवाडी, ता.रावेर

टॅग्स :FarmerशेतकरीRaverरावेर