शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटात केळी व्यापाऱ्यांनी दिली प्रतिक्विंटल हजार रू.ची शेतकऱ्यांच्या खिशाला चाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 17:41 IST

बाजारभाव समितीच्या भावापेक्षा २०० ते २५० रू. कमी भावाची तडजोड करा म्हणजे व्यापाºयांची गाडी बांधावर उभी राहतेय.

ठळक मुद्देकेळीमालाला उठाव जोमातबाजारभाव समितीच्या भावापेक्षा २०० ते २५० रू. कमी भावाची तडजोड करा म्हणजे व्यापाºयांची गाडी बांधावर उभी राहतेय

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : गत वर्षीच्या दुष्काळाच्या राखेतून अग्नीपंख घेऊन फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्याची आशा उराशी बाळगून असलेल्या केळी उत्पादक शेतकºयांंना यंदा मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन चैत्र नवरात्रोत्सव व रमजान ईदचे पर्व येवूनही व केळीमालाची उपलब्धता अत्यंत कमी प्रमाणात आहे. असे असतानाही केळी व्यापाºयांनी २२ मार्च ते आजतागायत ४७ ते ४८ दिवसात शेतकºयांच्या खिशाला किमान प्रतिक्विंटल एक हजार रूपयांची चाट लावली आहे. या ४७ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये दररोज सरासरी किमान २५० ट्रक तालुक्यातून निर्यात होत असल्याचे गृहित धरता १ लाख ८८ हजार क्विंटल केळीमागे १८८ कोटींची निव्वळ उत्पादनाची चाट केळी उत्पादक शेतकºयांना अखेर बसल्याचे मोठे शल्य बोचणारे ठरले आहे.गत वर्षी अत्यल्प व अनियमित पर्जन्यमानामुळे तालुक्यात दुष्काळाचे सावट होते. भूजल पातळी दररोज १०० मीटरने घसरल्याने हजारो हेक्टरमधील केळीबागा पाण्याअभावी तर ४७ ते ४८ सेल्सियस तापमानाची मजल मारलेल्या उन्हाच्या दाहकतेत होरपळून निघाल्या होत्या. किंबहुना त्याच कारणास्तव केळीची मृगबागेची पूर्वहंगामी लागवडीत कमालीची घट झाली होती.केळीने कायापालट होण्याऐवजी व्यापाºयांनी केले भुईसपाटपरिणामी त्या घटत्या लागवडीखालील केळीबागांमधील अत्यल्प केळीमालाला यंदाच्या मार्च-एप्रिलपासून सुरू होणाºया केळी हंगामात किमान १२०० ते १३०० रू प्रतिक्विंटल भाव मिळणे अपेक्षित होते. किंबहुना, कोरोनाच्या लॉकडाऊनचा फतवा जारी होताच केळी व्यापाºयांनी ‘अभी नही तो कभी नही’ अशा एकाधिकार शाहीने केळी हे नाशवंत फळ असल्याने अवघ्या २५० ते ३०० रू प्रतिक्विंटल भावात केळीबागांच्या बख्खी (विळा) लावून केळीबागा आडव्या केल्या. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यामार्फत लॉकडाऊनमधील मार्ग मोकळा केल्यानंतरही उत्तर भारतात केळी भरून गेलेले ट्रक खाली करायला मजूर उपलब्ध नाहीत, तिकडे गेलेल्या गाड्या परत येत नाहीत, रस्त्यात गॅरेज वा ढाबे उपलब्ध नाहीत. अशा एकनाविविध बहाण्यांनी किमान प्रतिक्विंटल एक हजार रुपये कमी दराने केळी बागांची सर्रास कत्तल सुरू होती.पश्चिम बंगाल तथा सोलापूर स्थित असलेल्या केळी पॅकेजिंगचे तंत्रकुशल केळी कामगारांचा ताफा असता तर दरदिवशी १५ ते २० कंटेनर आखाती राष्ट्रात रवाना करून केळी उत्पादकांना अपेक्षित असलेल्या दीड हजार रू प्रतिक्विंटल केळीभाव पदरात टाकण्याची धन्यता लाभली असती-सदानंद महाजन, केळी निर्यातदार शेतकरी, तांदलवाडी, ता.रावेर

टॅग्स :FarmerशेतकरीRaverरावेर