शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

‘कॉपीमुक्ती’चा असाही परिणाम होणार; दहावी, बारावीचे निकाल १० टक्क्यांनी कमी लागणार

By अमित महाबळ | Updated: February 21, 2023 18:00 IST

कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळेतच परीक्षा केंद्र होती. यंदा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बाहेरची मिळालेली आहेत.

 जळगाव : कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे. बारावीचे यापुढील उर्वरित पेपर आणि दहावीच्या परीक्षेलाही वातावरण असेच टाईट ठेवले गेले तर यंदा दहावी आणि बारावीच्या निकालातील गुणांचा फुगवटा १० टक्केने कमी होणार असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळेतच परीक्षा केंद्र होती. यंदा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बाहेरची मिळालेली आहेत. कॉपीमुक्त परीक्षा अभियानातील बंदोबस्त, भरारी पथके, विविध उपाययोजना या सर्वांचा परिणाम यावर्षीचा दहावी आणि बारावीचा निकाल १० टक्के कमी लागण्यात होणार आहे. थोडक्यात गुणांचा फुगवटा कमी होईल. कडक धोरण, नियमांमुळे हे शक्य होणार आहे. परंतु याचा परिणाम केवळ शहरी भागातच जाणवेल. ग्रामीण भागाचे काय ? अशी प्रतिक्रिया शिक्षण तज्ज्ञ चंद्रकांत भंडारी यांनी दिली.

प्रशासनाने ही केंद्रे बदलावीत -केंद्राचा निकाल चांगला लागावा म्हणून आतमध्ये काय घडते, कोणाकोणाला काय मदत केली जाते हे उघड गुपित आहे. संवेदनशील केंद्र दर्शवून तेथे कॉपी होत असल्याचे एका अर्थी मान्य केले जात आहे. प्रशासनाने ही केंद्रे बदलायला हवीत. बंदोबस्त बाहेर कितीही लावला तरी आतमध्ये जे व्हायचे तेच होते, असेही भंडारी म्हणाले.

विद्यार्थ्यांना आकलन शक्ती कळेल

कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी प्रशासनाने केलेले नियोजन चांगले होते. बारावीचे उर्वरित पेपर आणि दहावीच्या परीक्षेसाठी याच पद्धतीने कडक अंमलबजावणी व्हावी. यामुळे निकालातील गुणांचा फुगवटा कमी होण्यास मदत होईल. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनाही आपली आकलन शक्ती कळून येईल, असे नंदिनीबाई कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. राहुल वराडे यांनी सांगितले. 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीSchoolशाळा