शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

‘कॉपीमुक्ती’चा असाही परिणाम होणार; दहावी, बारावीचे निकाल १० टक्क्यांनी कमी लागणार

By अमित महाबळ | Updated: February 21, 2023 18:00 IST

कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळेतच परीक्षा केंद्र होती. यंदा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बाहेरची मिळालेली आहेत.

 जळगाव : कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे. बारावीचे यापुढील उर्वरित पेपर आणि दहावीच्या परीक्षेलाही वातावरण असेच टाईट ठेवले गेले तर यंदा दहावी आणि बारावीच्या निकालातील गुणांचा फुगवटा १० टक्केने कमी होणार असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळेतच परीक्षा केंद्र होती. यंदा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बाहेरची मिळालेली आहेत. कॉपीमुक्त परीक्षा अभियानातील बंदोबस्त, भरारी पथके, विविध उपाययोजना या सर्वांचा परिणाम यावर्षीचा दहावी आणि बारावीचा निकाल १० टक्के कमी लागण्यात होणार आहे. थोडक्यात गुणांचा फुगवटा कमी होईल. कडक धोरण, नियमांमुळे हे शक्य होणार आहे. परंतु याचा परिणाम केवळ शहरी भागातच जाणवेल. ग्रामीण भागाचे काय ? अशी प्रतिक्रिया शिक्षण तज्ज्ञ चंद्रकांत भंडारी यांनी दिली.

प्रशासनाने ही केंद्रे बदलावीत -केंद्राचा निकाल चांगला लागावा म्हणून आतमध्ये काय घडते, कोणाकोणाला काय मदत केली जाते हे उघड गुपित आहे. संवेदनशील केंद्र दर्शवून तेथे कॉपी होत असल्याचे एका अर्थी मान्य केले जात आहे. प्रशासनाने ही केंद्रे बदलायला हवीत. बंदोबस्त बाहेर कितीही लावला तरी आतमध्ये जे व्हायचे तेच होते, असेही भंडारी म्हणाले.

विद्यार्थ्यांना आकलन शक्ती कळेल

कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी प्रशासनाने केलेले नियोजन चांगले होते. बारावीचे उर्वरित पेपर आणि दहावीच्या परीक्षेसाठी याच पद्धतीने कडक अंमलबजावणी व्हावी. यामुळे निकालातील गुणांचा फुगवटा कमी होण्यास मदत होईल. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनाही आपली आकलन शक्ती कळून येईल, असे नंदिनीबाई कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. राहुल वराडे यांनी सांगितले. 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीSchoolशाळा