शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

जळगावमध्ये वीज निर्मितीसाठी ७७५ हेक्टर क्षेत्राचा करारनामा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 16:47 IST

राज्यातील२९ लाख ग्राहकांपैकी सुमारे ४५ लाख ग्राहक हे कृषी ग्राहक आहेत आणि २२ टक्के कृषी ग्राहक वीज वापरतात.

कुंदन पाटील

जळगाव : मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजनेच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्यासाठी जिल्ह्यातील ७५ क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ५२ दस्त नोंदविण्यात आले आहेत.

राज्यातील२९ लाख ग्राहकांपैकी सुमारे ४५ लाख ग्राहक हे कृषी ग्राहक आहेत आणि २२ टक्के कृषी ग्राहक वीज वापरतात. सध्या कृषी ग्राहकांना दिवसा आणि रात्री आवर्तन तत्त्वावर वीज पुरवठा केला जातो. रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. शेतकर्‍यांना दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. दुसरीकडे, राज्यातील उद्योग-व्यवसायांना त्यांची स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्यासाठी माफक दरात वीज पुरवठा करावा, अशीही जोरदार मागणी होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या योजनेला बुस्टर दिले आहे. शुक्रवारी त्यांनी जिल्ह्यातील ७५ क्षेत्रांची निवड केली आहे. ७७४.८४ हेक्टर जमीनीवर ही योजना विस्तारण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यानुसार ७५ पैकी ५२ क्षेत्रांची दस्तनोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

दिवसा मिळणार वीज

सदर जागांचा उपयोग सौर ऊर्जा निर्मिती करीता करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज मिळणे अपेक्षित आहे. ७५ जागांमध्ये महावितरण पहिल्या प्रकल्प समुहामध्ये 37  दस्त नोंदणीकृत करण्यात आले. दुसऱ्या प्रकल्प समुहामध्ये एकूण १५ दस्त नोंदणी कृत करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून ३८५ मेगाव्हॅट प्रदूषण मुक्त  वीज निर्मिती होऊ शकणार आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा पुरेशी वीज उपलब्ध करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच या योजनेला आकार दिला जात आहे. लवकरच वीज निर्मीतीची प्रक्रिया सुरु होणार आहे.-आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.

टॅग्स :Jalgaonजळगाव