शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

जळगावमध्ये वीज निर्मितीसाठी ७७५ हेक्टर क्षेत्राचा करारनामा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 16:47 IST

राज्यातील२९ लाख ग्राहकांपैकी सुमारे ४५ लाख ग्राहक हे कृषी ग्राहक आहेत आणि २२ टक्के कृषी ग्राहक वीज वापरतात.

कुंदन पाटील

जळगाव : मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजनेच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्यासाठी जिल्ह्यातील ७५ क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ५२ दस्त नोंदविण्यात आले आहेत.

राज्यातील२९ लाख ग्राहकांपैकी सुमारे ४५ लाख ग्राहक हे कृषी ग्राहक आहेत आणि २२ टक्के कृषी ग्राहक वीज वापरतात. सध्या कृषी ग्राहकांना दिवसा आणि रात्री आवर्तन तत्त्वावर वीज पुरवठा केला जातो. रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. शेतकर्‍यांना दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. दुसरीकडे, राज्यातील उद्योग-व्यवसायांना त्यांची स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्यासाठी माफक दरात वीज पुरवठा करावा, अशीही जोरदार मागणी होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या योजनेला बुस्टर दिले आहे. शुक्रवारी त्यांनी जिल्ह्यातील ७५ क्षेत्रांची निवड केली आहे. ७७४.८४ हेक्टर जमीनीवर ही योजना विस्तारण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यानुसार ७५ पैकी ५२ क्षेत्रांची दस्तनोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

दिवसा मिळणार वीज

सदर जागांचा उपयोग सौर ऊर्जा निर्मिती करीता करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज मिळणे अपेक्षित आहे. ७५ जागांमध्ये महावितरण पहिल्या प्रकल्प समुहामध्ये 37  दस्त नोंदणीकृत करण्यात आले. दुसऱ्या प्रकल्प समुहामध्ये एकूण १५ दस्त नोंदणी कृत करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून ३८५ मेगाव्हॅट प्रदूषण मुक्त  वीज निर्मिती होऊ शकणार आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा पुरेशी वीज उपलब्ध करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच या योजनेला आकार दिला जात आहे. लवकरच वीज निर्मीतीची प्रक्रिया सुरु होणार आहे.-आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.

टॅग्स :Jalgaonजळगाव