शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जळगावमध्ये वीज निर्मितीसाठी ७७५ हेक्टर क्षेत्राचा करारनामा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 16:47 IST

राज्यातील२९ लाख ग्राहकांपैकी सुमारे ४५ लाख ग्राहक हे कृषी ग्राहक आहेत आणि २२ टक्के कृषी ग्राहक वीज वापरतात.

कुंदन पाटील

जळगाव : मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजनेच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्यासाठी जिल्ह्यातील ७५ क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ५२ दस्त नोंदविण्यात आले आहेत.

राज्यातील२९ लाख ग्राहकांपैकी सुमारे ४५ लाख ग्राहक हे कृषी ग्राहक आहेत आणि २२ टक्के कृषी ग्राहक वीज वापरतात. सध्या कृषी ग्राहकांना दिवसा आणि रात्री आवर्तन तत्त्वावर वीज पुरवठा केला जातो. रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. शेतकर्‍यांना दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. दुसरीकडे, राज्यातील उद्योग-व्यवसायांना त्यांची स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्यासाठी माफक दरात वीज पुरवठा करावा, अशीही जोरदार मागणी होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या योजनेला बुस्टर दिले आहे. शुक्रवारी त्यांनी जिल्ह्यातील ७५ क्षेत्रांची निवड केली आहे. ७७४.८४ हेक्टर जमीनीवर ही योजना विस्तारण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यानुसार ७५ पैकी ५२ क्षेत्रांची दस्तनोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

दिवसा मिळणार वीज

सदर जागांचा उपयोग सौर ऊर्जा निर्मिती करीता करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज मिळणे अपेक्षित आहे. ७५ जागांमध्ये महावितरण पहिल्या प्रकल्प समुहामध्ये 37  दस्त नोंदणीकृत करण्यात आले. दुसऱ्या प्रकल्प समुहामध्ये एकूण १५ दस्त नोंदणी कृत करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून ३८५ मेगाव्हॅट प्रदूषण मुक्त  वीज निर्मिती होऊ शकणार आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा पुरेशी वीज उपलब्ध करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच या योजनेला आकार दिला जात आहे. लवकरच वीज निर्मीतीची प्रक्रिया सुरु होणार आहे.-आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.

टॅग्स :Jalgaonजळगाव