शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

कंटेनर महामंडळाचे आगार बंद, जिल्ह्यातील निर्यात ४० टक्क्यांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:38 IST

उद्योगांना मोठा फटका : आर्थिक भुर्दंडामुळे वाढली चिंता

जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख पिक असलेल्या केळीसह डाळ, मसाले, फळांचे रस यांच्या निर्यातीसह वेगवेगळ््या कच्च्या मालाच्या आयातीसाठी खान्देशावासीयांना सोयीचे असलेले भुसावळ येथील भारतीय कंटेनर महामंडळाचे आगार (डेपो) बंद करण्यात आल्याने जिल्ह्यातून निर्यात होणाऱ्या मालावर परिणाम होऊन ४० टक्के निर्यात घटली आहे. यामुळे उद्योगांना मोठा फटका बसत असून सध्या माल निर्यात करायचा झाल्यास कंटेनर मुंबई येथे पाठवावे लागत आहे. त्यामुळे प्रति कंटेनर १० हजाराचा खर्च वाढला आहे.१९९१पासून भुसावळ येथे असलेल्या भारतीय कंटेनर महामंडळाच्या आगाराचा जळगावातील केळीला परदेशवारी घडविण्यात मोठा वाटा राहिला. तसेच डाळ, मसाले, फळांचा रस, निर्जलीकरण केलेला कांदा व इतर बरेच पदार्थ ३० ते ३५ देशात निर्यात होऊ लागले. मात्र रेल्वेच्या जागेत असलेल्या या अगाराचे अचानक रेल्वेने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र हे परवडणारे नसल्याचे सांगत भारतीय कंटेनर महामंडळाने येथील कामकाज गुंडाळण्याचा निर्णय एप्रिल महिन्याच्या अखेरीस घेतला. तशी नोटीस रेल्वेला दिली व या विषयी आयात-निर्यातदारांनाही कळविले.त्यानंतर ‘लोकमत’ने या संदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर दोन वेळा माल स्वीकारण्याची आगाराने तयारी दाखविली. ३१ मेपर्यंत हा माल स्वीकारण्यात आला. मात्र १ जूनपासून माल घेणे बंद केले.कंटेनर आणले तर वाढीव १५ हजार रुपये द्या३१ मेपर्यंत वेगवेगळ््या मालाचे कंटेनर स्वीकारल्यानंतर १ जूनपासून माल न घेण्याचे महामंडळाने ठरविल्याने या संदर्भात उद्योजकांना पत्र देऊन कंटेनर आणले तरी वाढीव १५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी अट घालण्यात आली. आगारच बंद करायचे असल्याने ही अट टाकून माल येऊच नये, या उद्देशाने ही पत्र देण्यात आली, असा आरोप उद्योजकांकडून करण्यात येत आहे.निर्यात घटलीखान्देशातील उद्योग-व्यावसायिकांकडून होणाºया व्यवहारांमुळे या आगारात दरवर्षी आयातीचे एक हजार कोटी तर निर्यातीचे ७०० कोटी रुपये अशी एकूण १७०० कोटी रुपयांची उलाढाल होत असे. मात्र आता आगार बंद झाल्याने जिल्ह्यातून निर्यात होणाºया मालात ४० टक्क्याने घट झाल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात येत आहे. एक तर लॉकडाऊनच्या झळा बसलेले उद्योग आता अनलॉक -१ मध्ये सुरू होत नाही तोच आता निर्यातीवर परिणाम होऊ लागल्याने उत्पादनही जास्त करण्यास उद्योजक धजावत नसल्याचे सांगण्यात येत आहे.आर्थिक भुर्दंंड, जादा पैसे देऊनही कंटनर मिळेनाभुसावळ येथील आगार बंद झाल्याने निर्यातदारांना आता आपला माल मुंबई येथे पाठवावा लागत आहे. यात मुंबई येथूनच रिकामे कंटेनर मागवून ते भरल्यानंतर मुंबई येथे पाठवावे लागत आहे. त्यात आता कोरोनाच्या धास्तीने अनेक चालक येण्यास तयार होत नसल्याने जादा पैसे देण्याची तयारी दाखवून पाहिजे त्या प्रमाणात कंटेनर उपलब्ध होत नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. त्यात जे कंटेनर मिळाले त्यातही प्रति कंटेनर १० हजार रुपयांचा खर्च वाढला आहे.लोकप्रतिनिधी आता गप्पखान्देशसाठी महत्त्वाचे असलेले हे आगार बंद झाले तरी एकाही लोकप्रतिनिधीने आवाज उठविला नसल्याबद्दल उद्योजकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला हा विषय ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर माल स्वीकारण्यास मुदतवाढ मिळाली. यात काही लोकप्रतिनिधींनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आपण यासाठी चर्चा केल्याचा दावा केला. मात्र आता हे आगार बंद पडले तरी याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.भारतीय कंटेनर महामंडळाने आपले भुसावळातील आगार बंद केल्याने त्याचा आयात-निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. विविध देशात होणारी निर्यात जवळपास ४० टक्के कमी झाली आहे.- डी.आय. देसर्डा, वरिष्ठ उपाध्यक्ष, जीएसटी विभाग, जैन उद्योग समूह.भुसावळ येथील भारतीय कंटेनर महामंडळामुळे निर्यातवाढीस चालना मिळाली. मात्र जिल्ह्यासाठी सोयीचे असलेले हे आगार बंद केल्याने माल मुंबई येथे पाठवावा लागत आहे. यामुळे खर्च वाढला आहे.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन, जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव