शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

कंटेनर महामंडळाचे आगार बंद, जिल्ह्यातील निर्यात ४० टक्क्यांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:38 IST

उद्योगांना मोठा फटका : आर्थिक भुर्दंडामुळे वाढली चिंता

जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख पिक असलेल्या केळीसह डाळ, मसाले, फळांचे रस यांच्या निर्यातीसह वेगवेगळ््या कच्च्या मालाच्या आयातीसाठी खान्देशावासीयांना सोयीचे असलेले भुसावळ येथील भारतीय कंटेनर महामंडळाचे आगार (डेपो) बंद करण्यात आल्याने जिल्ह्यातून निर्यात होणाऱ्या मालावर परिणाम होऊन ४० टक्के निर्यात घटली आहे. यामुळे उद्योगांना मोठा फटका बसत असून सध्या माल निर्यात करायचा झाल्यास कंटेनर मुंबई येथे पाठवावे लागत आहे. त्यामुळे प्रति कंटेनर १० हजाराचा खर्च वाढला आहे.१९९१पासून भुसावळ येथे असलेल्या भारतीय कंटेनर महामंडळाच्या आगाराचा जळगावातील केळीला परदेशवारी घडविण्यात मोठा वाटा राहिला. तसेच डाळ, मसाले, फळांचा रस, निर्जलीकरण केलेला कांदा व इतर बरेच पदार्थ ३० ते ३५ देशात निर्यात होऊ लागले. मात्र रेल्वेच्या जागेत असलेल्या या अगाराचे अचानक रेल्वेने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र हे परवडणारे नसल्याचे सांगत भारतीय कंटेनर महामंडळाने येथील कामकाज गुंडाळण्याचा निर्णय एप्रिल महिन्याच्या अखेरीस घेतला. तशी नोटीस रेल्वेला दिली व या विषयी आयात-निर्यातदारांनाही कळविले.त्यानंतर ‘लोकमत’ने या संदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर दोन वेळा माल स्वीकारण्याची आगाराने तयारी दाखविली. ३१ मेपर्यंत हा माल स्वीकारण्यात आला. मात्र १ जूनपासून माल घेणे बंद केले.कंटेनर आणले तर वाढीव १५ हजार रुपये द्या३१ मेपर्यंत वेगवेगळ््या मालाचे कंटेनर स्वीकारल्यानंतर १ जूनपासून माल न घेण्याचे महामंडळाने ठरविल्याने या संदर्भात उद्योजकांना पत्र देऊन कंटेनर आणले तरी वाढीव १५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी अट घालण्यात आली. आगारच बंद करायचे असल्याने ही अट टाकून माल येऊच नये, या उद्देशाने ही पत्र देण्यात आली, असा आरोप उद्योजकांकडून करण्यात येत आहे.निर्यात घटलीखान्देशातील उद्योग-व्यावसायिकांकडून होणाºया व्यवहारांमुळे या आगारात दरवर्षी आयातीचे एक हजार कोटी तर निर्यातीचे ७०० कोटी रुपये अशी एकूण १७०० कोटी रुपयांची उलाढाल होत असे. मात्र आता आगार बंद झाल्याने जिल्ह्यातून निर्यात होणाºया मालात ४० टक्क्याने घट झाल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात येत आहे. एक तर लॉकडाऊनच्या झळा बसलेले उद्योग आता अनलॉक -१ मध्ये सुरू होत नाही तोच आता निर्यातीवर परिणाम होऊ लागल्याने उत्पादनही जास्त करण्यास उद्योजक धजावत नसल्याचे सांगण्यात येत आहे.आर्थिक भुर्दंंड, जादा पैसे देऊनही कंटनर मिळेनाभुसावळ येथील आगार बंद झाल्याने निर्यातदारांना आता आपला माल मुंबई येथे पाठवावा लागत आहे. यात मुंबई येथूनच रिकामे कंटेनर मागवून ते भरल्यानंतर मुंबई येथे पाठवावे लागत आहे. त्यात आता कोरोनाच्या धास्तीने अनेक चालक येण्यास तयार होत नसल्याने जादा पैसे देण्याची तयारी दाखवून पाहिजे त्या प्रमाणात कंटेनर उपलब्ध होत नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. त्यात जे कंटेनर मिळाले त्यातही प्रति कंटेनर १० हजार रुपयांचा खर्च वाढला आहे.लोकप्रतिनिधी आता गप्पखान्देशसाठी महत्त्वाचे असलेले हे आगार बंद झाले तरी एकाही लोकप्रतिनिधीने आवाज उठविला नसल्याबद्दल उद्योजकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला हा विषय ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर माल स्वीकारण्यास मुदतवाढ मिळाली. यात काही लोकप्रतिनिधींनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आपण यासाठी चर्चा केल्याचा दावा केला. मात्र आता हे आगार बंद पडले तरी याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.भारतीय कंटेनर महामंडळाने आपले भुसावळातील आगार बंद केल्याने त्याचा आयात-निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. विविध देशात होणारी निर्यात जवळपास ४० टक्के कमी झाली आहे.- डी.आय. देसर्डा, वरिष्ठ उपाध्यक्ष, जीएसटी विभाग, जैन उद्योग समूह.भुसावळ येथील भारतीय कंटेनर महामंडळामुळे निर्यातवाढीस चालना मिळाली. मात्र जिल्ह्यासाठी सोयीचे असलेले हे आगार बंद केल्याने माल मुंबई येथे पाठवावा लागत आहे. यामुळे खर्च वाढला आहे.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन, जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव