शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

१२ कार्याध्यक्ष निवडीचा काँग्रेसचा प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यानंतर सुरू झालेल्या संघटनात्मक बदलांच्या वाऱ्याची दिशा काहीशी बदलली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यानंतर सुरू झालेल्या संघटनात्मक बदलांच्या वाऱ्याची दिशा काहीशी बदलली असून, आता एक-दोन नव्हे, तर जिल्ह्यासाठी १२ कार्याध्यक्ष निवडीचे नियोजन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आखले जात आहे. चोपड्याच्या बैठकीत हा विषय असल्यानेच या बैठकीतून दोन गट समोर आले आहेत.

अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी १२ कार्याध्यक्ष निवडीच्या निर्णयाला विरोध दर्शविला असून याचेच पडसाद चोपडा येथे आयोजित बैठकीवर पडले. काँग्रेसमध्ये शहराध्यक्षपद अडीच वर्षांपासून रिक्त आहे. शिवाय संघटना वाढविण्यासाठी यात बदल करण्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चाही झाल्या असून जिल्हाध्यक्ष पदासाठी नावेही मागविण्यात आली आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर होणाऱ्या हालचालींमुळे काँग्रेसमध्ये गट पडले आहेत.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी यांनी चोपडा येथे बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डी. जी. पाटील आदी उपस्थित होते. मात्र, निमंत्रण दिलेले माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांच्यासह जवळपास सर्वच प्रमुख पदाधिकारी या बैठकीला गैरहजर होते. यामागे १२ कार्याध्यक्ष निवडीच्या निर्णयाला विरोध असल्याचे सांगितले जात आहे.

असे आहे नियोजन...

जळगाव शहरासाठी ४ कार्याध्यक्ष, जळगाव लोकसभा मतदारसंघ व रावेर मतदारसंघ यांच्यासाठी प्रत्येकी स्वतंत्र चार कार्याध्यक्ष, असे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. आहेत ती पदे रिक्त ठेवून इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्याध्यक्ष निवड करून नेमकी संघटना वाढणार कशी, असा प्रश्न उपस्थित करून या निर्णयाला विरोध केला जात आहे. मात्र, वरिष्ठ या निर्णयावर ठाम असल्याची माहिती आहे.

शहराध्यक्ष निवड दूर, कार्याध्यक्षांची निवड?

जळगाव शहराध्यक्ष निवड न करता इच्छुकांना कार्याध्यक्ष पद देण्याची तयारी पदाधिकारी करीत असून जिल्हा कार्यकारिणीत केवळ तेवढेच बदल करण्याचे संकेत दिले जात आहेत. अशा स्थितीत काही वरिष्ठांकडूनही या निर्णयाला विरोध होत असून एक वरिष्ठ पदाधिकारी हे बैठकीला उपस्थित राहूनही शांतच बसून होते, अशी माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आता अंतर्गत कलह वाढण्याची चिन्हे आहेत.