शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

Congress: जळगाव जिल्हा काँग्रेसमध्ये भाकरी फिरेना आणि पक्षही वाढेना, राजीनाम्याच्या इशाऱ्यामुळे टळला निर्णय?

By अमित महाबळ | Updated: September 20, 2022 14:24 IST

Congress: गटबाजी आणि पदे मिरविणाऱ्यांमुळे जळगाव जिल्हा काँग्रेसची दारुण अवस्था झाली असून, भाकरी फिरविताना आपल्याच हाताला चटके बसू नयेत म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते जळगावपासून लांब राहण्याच्या मानसिकतेत आहेत

- अमित महाबळ जळगाव - गटबाजी आणि पदे मिरविणाऱ्यांमुळे जळगाव जिल्हा काँग्रेसची दारुण अवस्था झाली असून, भाकरी फिरविताना आपल्याच हाताला चटके बसू नयेत म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते जळगावपासून लांब राहण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे भाकरी फिरेना आणि पक्ष वाढेना, अशी स्थिती पक्षाची झाली आहे.जिल्हा काँग्रेसने एकेकाळी एकाचवेळी साडेतीन मंत्री राज्याला दिले आहेत. पण ते वैभव आता राहिले नाही. आता तर पक्षाचा एकच आमदार आहे. पुढील निवडणुकीत संख्याबळ घटण्याची साशंकता पक्षात आहे. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व माजी जिल्हाध्यक्ष जी. एन. पाटील यांचा पहिला, आमदार शिरीष चौधरी यांचा दुसरा आणि असंतुष्टांचा तिसरा मोठा गट पक्षात आहे. कोणत्या गटाने पक्षासाठी किती व काय केले याची जी चर्चा कानावर येते ती पक्षाच्या वाढीसाठी फारशी आशादायी नाही. संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी अस्तित्वात नाही. नियुक्त्या रखडल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत जिल्हा बँक व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला फटका बसला आहे. निष्ठावंत पक्षापासून दूर गेले आहेत. कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

वेगळ्याच कारणांची चर्चामहापालिका, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपा, शिंदे गट, शिवसेना, राष्ट्रवादी यांची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेसमध्ये मात्र काहीच हालचाल दिसत नाही. जळगावचे प्रभारी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर पक्षात भाकरी फिरेल, असे म्हटले जात होते. देशमुख यांच्या दौऱ्याची तारीख आली, पण लागलीच तो रद्दही झाला.

नियंत्रणाचा अट्टहासपक्ष वाढावा म्हणून असंतुष्टांचा मोठा गट आग्रही असताना, त्यांच्या विरोधातला गट आपल्याकडेच नियंत्रण हवे म्हणून अट्टहास करत आहे. भाकरी फिरू नये म्हणून ‘महत्त्वा’च्या पदाचा राजीनामा देण्याचा इशारा प्रदेशला देण्यात आला आहे. त्यामुळे प्रदेशचे पदाधिकारी ठोस निर्णय घेण्यास धजावत नसल्याचे कळते.

‘उत्तम’होईल पण संधी केव्हा?पक्षाचे काम उत्तम होण्यासाठी इच्छुक अनेक आहेत. मात्र, त्यांना संधी मिळणार केव्हा, या प्रश्नाचे उत्तर प्रदेशकडून मिळत नसल्याने पक्षात निराशा आहे. जो सर्वार्थाने ताकद देईल तोच पक्षाचे भले करू शकेल हे प्रदेशने लक्षात न घेतल्यास पक्षाची आणखी वाताहात व्हायला वेळ लागणार नाही. जो काम करेल, त्याला संधी मिळायला हवी. पुढच्या सहा महिन्याने भाकरी फिरविण्याचा प्रयत्न केल्यास तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल, असाही सूर आहे.

प्रदेश प्रतिनिधींच्या निवडीवर प्रश्नचिन्हप्रदेश प्रतिनिधी निवडणुकीद्वारे नियुक्त होतात. परंतु, निवडणुका प्रत्यक्षात झाल्या आहेत का, केव्हा घेतल्या गेल्या, त्यासाठी निरीक्षक केव्हा आले होते, ज्या तालुक्यात रहिवास आहे त्या भागाचे प्रतिनिधित्व किती जणांना मिळाले आहे, पक्षवाढीसाठी व सदस्य नोंदणीसाठी योगदान देणाऱ्या किती जणांना संधी मिळाली आहे, प्रोसिडिंगवर स्वाक्षरी करणाऱ्यांचे पक्षातील योगदान काय या सर्वांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पक्षातून जोर धरत आहे. या निवडणुकीची प्रक्रिया कागदावर पार पाडण्यात आल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात आहे. प्रदेशने याची शहानिशी केली पाहिजे, असाही सूर पक्षात आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव