शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

याद्यांच्या घोळामुळे कर्जमाफी पुन्हा लांबणीवर: तिसºयांदा केला प्रक्रियेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:00 IST

जिल्हा बँकांना खात्यांची माहिती पुन्हा अपलोड करण्याचे आदेश

ठळक मुद्देघोळ मिटण्याची चिन्ह दिसेनानियमात सातत्याने बदल८७७ विकासोंची माहिती असलेल्या सीडी रद्द

जळगाव: शासनाने आधी दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्याचे आश्वासन खोटे ठरल्यानंतर पालकमंत्र्यांनी ९ नोव्हेंबर रोजी जिल्'ातल १५ हजार पात्र शेतकºयांची यादी जाहीर झाली असून ३०६ कोटी बँकांकडे जमा केले असल्याची दिलेली माहितीही खोटी ठरली आहे. त्यात आता शासनाने बँकांकडून शेतकºयांच्या १ ते ६६ खात्यांच्या माहितीच्या अपलोड केलेल्या सर्व ८७७ विविध कार्यकारी सोसायट्यांची माहिती असलेल्या सीडी रद्द करीत सुधारीत पद्धतीने ही माहिती पुन्हा अपलोड करण्याचे तोंडी आदेश मुंबईत यासंदर्भात सोमवार दि.१३ रोजी झालेल्या बैठकीत दिले आहेत. त्यामुळे आता तिसºयांदा ही माहिती अपलोड करण्याची वेळ जिल्हा बँकांवर आली असून कर्जमाफीस आणखी १५ दिवस ते महिनाभराचा विलंब होणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात कर्जमाफी योजनेत जिल्'ातील २ लाख ९० हजार ५०१ शेतकºयांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. या शेतकºयांच्या १ ते ६६ कर्जखात्यांची सहकार विभागाच्या लेखापरिक्षण विभागातर्फे तपासणी करून ही माहिती जिल्हा बँकेमार्फत अपलोड करण्यात आली. त्याची छाननी शासनस्तरावर विशेष सॉफ्टवेअरद्वारे करण्यात येऊन त्यानुसार पात्र शेतकºयांची यादी जाहीर केली जाणार आहे. मात्र पहिल्यांदा माहिती अपलोड केल्यावर शासनाने टीका टाळण्यासाठी घाईगर्दीत दिवाळीपूर्वी कर्जमाफी देत असल्याचे दर्शविण्यासाठी  १८ आॅक्टोबरपासून प्रारंभ होत असल्याचे जाहीर केले. त्यात ३२ शेतकºयांना प्रातिनिधीक स्वरूपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्रही देण्यात आले. मात्र अद्यापही या शेतकºयांची कर्जमुक्ती झालेली नाही. दरम्यान याचवेळी उर्वरीत पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाकडून लगेचच जाहीर करून कर्जमाफी दिली जाईल, असे सांगण्यात आले. मात्र १ ते ६६ खात्यांच्या अपलोड केलेल्या माहितीबाबत अडचण आल्याने जिल्हा बँकेला ही माहिती सुधारीत करून अपलोड करण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार हे काम गुरूवार, दि.९ नोव्हेंबरपर्यंत सुरूच होते. असे असताना पालकमंत्र्यांनी मात्र १५ हजार पात्र शेतकºयांची यादी जाहीर झाली असून ३०६ कोटी बँकेकडे जमा केले असल्याचे परस्पर जाहीर करून टाकले. प्रत्यक्षात त्यावेळी केवळ ११७९ शेतकºयांचीच यादी जिल्हा बँकेला प्राप्त झालेली होती. त्यासाठी ६ कोटी ७७ लाख ८१ हजार २९६ रूपयांची कर्जमाफी देण्याचे नमूद होते. ती यादी देखील शुक्रवार दि.१० रोजी बदलून नवीन यादी घेण्याची अजब सूचना शासनाने केली.  आधीची यादी रद्द करून सुधारीत ११५४ लोकांचीच सुधारीत यादी पाठविण्यात आली. त्यांची केवळ ६ कोटी ६१ लाख ४६ हजार ४६० रूपयांची कर्जरक्कम खात्यावर वळती करण्याचे सूचित करण्यात आले. तसेच शासनाने बँकेकडे पात्र शेतकºयांची नावे व पैसे जमा करणे सुरू केले असले तरीही विकासो निहाय यादीच दिलेली नसल्याने अडचण निर्माण झाली.पुन्हा नियमात बदलहे घोळ सुरू असताना सोमवार दि.१३ रोजी पुन्हा मुंबई येथील बैठकीत शेतकºयांच्या कर्ज खात्यांच्या १ ते ६६ खात्याची माहिती पुन्हा सुधारीत पद्धतीने अपलोड करण्याचे तोंडी आदेश देण्यात आले.घोळ मिटण्याची चिन्ह दिसेनाकर्जमाफी योजनेत आयटी विभागाच्या चुकांमुळे अधिक घोळ निर्माण होत असून सातत्याने माहिती भरण्यात बदल सुचविले जात आहे. त्यामुळे आता तिसºयांदा माहिती भरण्यात पुन्हा पंधरा दिवस ते महिनाभराचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा घोळ मिटण्याची चिन्ह नसून कर्जमाफी कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.